शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कोरोनाकाळात ठाण्यातील ९९ कुपोषित बालके दगावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 5:36 AM

जिल्ह्यातील गावपाड्यांत आजही १४७ बालके तीव्र (सॅम) कुपोषित आहेत. तर मध्यम (मॅम) कुपोषित १ हजार ५४३ बालके आहेत. कोरोनाची तिसरी लाट बालकांच्या दृष्टीने चिंता करणारी असल्याचे ऐकायला मिळत आहे

सुरेश लोखंडे

ठाणे : सध्याचा कोरोना महामारीचा काळ सर्वांसाठीच जीवघेणा ठरला आहे. यातही तग धरून, जीव मुठीत घेऊन जिल्ह्यात आदिवासी, दुर्गम, अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांत १ हजार ६९० कुपोषित बालके जिल्ह्यात जगत आहेत. यातील तब्बल ९९ बालकांचा या महामारीच्या काळातील दीड वर्षात मृत्यू झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

जिल्ह्यातील गावपाड्यांत आजही १४७ बालके तीव्र (सॅम) कुपोषित आहेत. तर मध्यम (मॅम) कुपोषित १ हजार ५४३ बालके आहेत. कोरोनाची तिसरी लाट बालकांच्या दृष्टीने चिंता करणारी असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यात सध्या म्युकरमायकोसिस आणि आता डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूने डोकेवर काढले आहे. यावर मात करीत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार चिंता करायला भाग पाडणारी आहे. तिचा कहर लहानग्यांच्या जिवावर उठणारा असल्यामुळें त्यावर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

गावपाड्यांतील बालकांचे विविध स्वरूपाचे रखडलेले लसीकरण करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी आरोग्य यंत्रणेस तैनात केले आहे. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत ९९ बालकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आहे. यामध्ये मार्चपर्यंत ० ते १ वर्षापर्यंतच्या ६९ बालकांच्या मृत्यू झाला आहे. तर एक ते सहा वयोगटातील १८ बालके दगावली आहेत. याशिवाय मे अखेरपर्यंत १२ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात एक वर्षापर्यंतची नऊ आणि सहा वर्षांची तीन बालके दगावली आहेत. तीन वर्षांच्या तुलनेत दगावलेली ९९ बालके आहेत. यामध्ये २०१७-१८ या वर्षाचा विचार करता ७५ बालके दगावली आहेत, तर २०१९ ला ६६ बालके आणि २०२० या वर्षात ६७ बालके दगावली आहेत.

ही आहेत मृत्यूची कारणेअँसपेक्शिया म्हणजे गुदमरून दगावलेल्या सर्वाधिक १४ बालकांचा समावेश आहे. याखालोखाल ॲस्पिरेशन न्यूमोनियाने नऊ बालके दगावली आहेत. कमी वजनाची आठ बालके व कमी दिवसांची पाच बालके दगावली आहेत. जन्मतः व्यंगाची तीन, हृदय विकाराचे दोन, हायपोथर्मियाची दोन बालके दगावली आहेत. एआरडीएसने दोन, श्वासावरोखाने तीन बालकांचा मृत्यू झाला. सेप्टिसिमियाने सहा बालके, अतिज्वराने एक, एपीलेप्सीने, अपघाताने दोन मयत झाली. हेड इंज्युरी, भाजल्याने, श्वानदंश, सर्पदंश प्रत्येकी एक आणि इतर आजाराने ११ बालके दगावलेली आहेत.

कोरोनाच्या कालावधीत दगावलेल्या बालकांची गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागातील गावपाड्यात आरोग्य यंत्रणा तैनात केली आहे.- डाॅ. मनीष रेंघे,आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे

टॅग्स :thaneठाणे