शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१५ दिवसांत ९ हजार चाचण्या, ७६८ पॉझिटिव्ह आढळले; मीरा-भाईंदर महापालिकेने वाढवली व्याप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 11:07 IST

मीरा भाईंदर मध्ये सोमवार पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ६०६पर्यंत पोहचली आहे . तर १० हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने आता कोरोना रुग्णांना शोधून काढण्यासाठी अँटीजन चाचणी मोहीम व्यापक स्वरूपात चालवली आहे . शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांसह गृह संकुल , झोपडपट्ट्यां मध्ये मोहीम राबवली जात असून गेल्या १५ दिवसात ९ हजार लोकांची चाचणी केली असता त्यात ७६८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

मीरा भाईंदर मध्ये सोमवार पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ६०६पर्यंत पोहचली आहे . तर १० हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . शहरात कोरोना मुळे ४२१ लोकांचा मृत्यू झाला आहे . कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेने कोरोना रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत म्हणून या आधी घरो घरी जाऊन सर्वेक्षण केले होते . परंतु त्या सर्वेक्षणात प्रत्येकाची ऑक्सिजन लेव्हल व तापमान चाचणी झाली नसल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता.

कोरोना चाचणी तातडीने व्हावी म्हणून अँटीजन किट पालिकेने मागवल्या तर काही शासन कडून मिळाल्या. आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी सुरवातीला  पालिका आरोग्य केंद्रातूनच अँटीजन तपासणी चालवली . नंतर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पेणकरपाडा , विनायक नगर , शांती पार्क , भाईंदर सेकंडरी शाळा परिसर , उत्तन धवगी डोंगरी भागात अँटीजेन टेस्ट साठी शिबिरे सुरु करण्यात आली. आता पालिकेने शहरातील प्रमुख नाके , सार्वजनिक ठिकाणे , गृह संकुले आदी परिसरात देखील कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी मोफत अँटीजन चाचणी करिता शिबीर सुरु केली आहेत . रविवारी ३२ व आज सोमवारी देखील ३२ शिबीरे शहरात घेण्यात आली आहे . 

वैद्यकीय कर्मचारी , प्रभाग अधिकारी व कर्मचारी , पोलीस आदींनी सार्वजनिक ठिकाणी शिबीर लावून तेथे ये जा करणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या सुरु केल्या आहेत . काही ठिकाणी नगरसेवक देखील उपस्थित राहून फोटो सेशन करून घेत आहेत. या शिबिरां मुळे कोरोना चाचणी वा संशया पासून  लोकांना सुद्धा गाठले जात असून त्यांची तपासणी केली जात असल्याने जागेवरच अहवाल कळत असल्याने ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले ते खुश होत आहेत . तर ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यांना पुढील उपचार व तपासणी साठी पालिका रुग्णालय वा कोविड केअर मध्ये नेले जात आहे . 

या बाबत बोलताना पालिकेचे डॉ . संतोष पांडे यांनी सांगितले कि , पालिकेने आता नागरिकां पर्यंत पोहचून अँटीजन चाचणी सुरु केली असून या मोफत चाचणीचा नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे . या शिबिरां मुळे चाचणीची संख्या वाढून कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा शोध घेऊन उपचार करणे सुलभ झाले आहे . ज्यांना स्वतःला कोरोना असल्याची माहिती नव्हती त्यांची चाचणी होऊन कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत मिळणार आहे .  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक