शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

गणेशोत्सवासाठी भक्तांकडून ८५० एसटी बुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:08 IST

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी सुमारे ८५० बस बुक झालेल्या आहेत.

ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी सुमारे ८५० बस बुक झालेल्या आहेत. त्या ठाण्यासह भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, भांडुप, मीरा-भार्इंदर आदी ठिकाणांहून सुटणार असल्याचे एसटी महामंडळ अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत यावेळी सांगितले.यात ठाण्यातून सुमारे ५५० गाड्या सुटणार आहेत. यातील सुमारे २०० बस कॅडबरीनाक्यापासून ते तीनहातनाका, माजिवडा या परिसरातील सर्व्हिस रोडवर उभ्या करण्याची परवानगी यावेळी एसटीला देण्यात आली. मात्र, या गाड्या ज्या ठिकाणी उभ्या करणार, तेथूनच प्रवासी घेऊन शहराबाहेर पडण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजेपासून, तर रात्री १० वाजेपर्यंत या बसेस ठिकठिकाणी धावणार आहेत. यादरम्यान शहरात वाहतूककोंडी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात केली. याशिवाय, महापालिकांना वाहतूक वॉर्डन पुरवण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र येत आहे. यासाठी ठिकठिकाणी शांतता समित्या गठीत केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसमित्रांचेही नियोजन केले. तर, गणेश मंडळांच्या व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन केले.ठाणेप्रमाणेच नवी मुंबई पोलिसांनीदेखील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीचे नियोजन स्पष्ट केले. कोकणात जाणाºया रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस तैनात केल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. सणासुदीच्या या कालावधीत मिठाईचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. यातून कोणत्याही प्रकारची विषबाधा होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. मिठाईच्या दुकानदारांकडून भेसळ होणार नाही, यासाठी सतर्क राहून संभाव्य विषबाधा टाळण्याचे जिल्हाधिकाºयांनी संबंधितांना बजावले.कालावधीत यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियोजनासह राष्टÑीय महामार्ग, एमएसआरडीसी, रेल्वे, बांधकाम, परिवहन आदी विभागांनी यावेळी गणेशोत्सवासाठीचे नियोजन स्पष्ट केले. हे नियोजन करण्यामागे गणेशभक्तांना कमीत कमी त्रास व्हावा, असा उद्देश आहे. तसेच अनेक गाड्यांची देखील सोय केली आहे.>साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्तपोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, पाचही परिमंडळांत पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे.पोलीस उपायुक्त वाहतूक अमित काळे यांनीदेखील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले. ग्रामीण पोलीस हद्दीत १०४० सार्वजनिक आणि ४० हजारांपेक्षा जास्त खासगी गणपती बसवण्यात येतात, अशी माहितीही यावेळी दिली.>महापालिकांचे नियोजनभिवंडी : १० विसर्जन घाट असून राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरु स्तीचे काम १२ ते १५ दिवसांत पूर्ण होईल. व्हीजेटीआयच्या मार्गदर्शनाने आणि देखरेखीखाली हे काम सुरू आहे.कल्याण-डोंबिवली : २१६ मंडळांना परवानग्या दिल्या आहेत. ६८ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था. उल्हासनगर भागातील काही मोठे गणपती कल्याण येथे विसर्जनासाठी येतात, त्यामुळे थोडी समस्या उद्भवते.उल्हासनगर : ६० टक्के रस्ते सिमेंटचे आहेत. तितकीशी खड्ड्यांची समस्या नसल्याचा दावा. पण, जिथे आहेत, ते डांबराने बुजवत आहेत. आॅनलाइन ५४५ अर्ज आले असून १९२ मंडळांना परवानगी दिली आहे. ११ सप्टेंबरला पोलीस आयुक्त उल्हासनगरात मंडळांची बैठक घेतील.नवी मुंबई : २०२ मंडळांना परवानगी दिली असून २३ विसर्जन तलाव, ६७० स्वयंसेवक तैनात आहेत.ठाणे : ३६ विसर्जन तलाव असून आॅनलाइन ३०९ अर्ज आले आहेत.मीरा-भार्इंदर : २१ विसर्जन तलाव असून एक मोठा कृत्रिम तलावही आहे. ७० जीवरक्षक तैनात, ३५ बोटी भाड्याने घेतल्या. २५ लाकडी तराफे तयार ठेवले आहेत. पाच रु ग्णवाहिकांची सोय आहे.