शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

घोडबंदर खिंडीतील महामार्ग रुंदिकरण व नविन रस्त्यासाठी तब्बल ८२३ झाडांची होणार कत्तल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 12:58 IST

मुंबई - अहमदाबाद महामार्गाचे घोडबंदर खिंडीतील सुमारे दिड कि.मी. रस्त्याचे  रुंदिकरणात ६४७ तर वरसावे येथील प्रस्तावित खाडी पुलाकडे जाण्यासाठीच्या मार्गावरील १७६ अशा तब्बल ८२३ झाडांची तोड केली जाणार आहे.

धीरज परब

मीरारोड : मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे घोडबंदर खिंडीतील सुमारे दिड कि.मी. रस्त्याचे  रुंदिकरणात ६४७ तर वरसावे येथील प्रस्तावित खाडी पुलाकडे जाण्यासाठीच्या मार्गावरील १७६ अशा तब्बल ८२३ झाडांची तोड केली जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिके कडे राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने दिल्या नंतर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने झाडांची संख्या न टाकता त्यास मंजुरी दिली आहे. तर वनविभागाच्या हद्दीतील ६४७ झाडं काढण्यासाठीची बाब वनखात्या कडे वर्ग करणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. झाड्यांच्या तोडी सह खिंडीच्या रुंदिकरणा मुळे या भागात वावरणारया बिबट्यांच्या जीवावर संक्रांत येण्याची भिती निर्माण झाली आहे.गुरुवारी ११ जानेवारी रोजी दुपारी मीरारोड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वरसावे येथील खाडीवर नविन पाचपदरी पुलाचे , वरसावे जंक्शन येथील अंडरपास, महामार्गा वरील घोडबंदर खिंडीचे रस्ता रुंदिकरण, सम्राट हॉटेल जवळ अंडरपास तर लक्ष्मी बाग येथे पादचारी पुल आदी कामांचे भुमिपुजन केले जाणार आहे. घोडबंदर खिंड ही वन विभागाच्या अखत्यारीत असुन संरक्षित वन आहे. या ठिकाणी सद्याच्या असलेल्या महामार्गा वरुन देखील बिबटे ये जा करतात. काही महिन्या आधीच पहाटेच्या वेळी भरधाव वाहनाने खिंडीत एका बिबट्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यु झाला होता.  आजही घोडबंदर गावात व परिसरात बिबटे व त्यांची पिल्लं आढळुन येतात. घोडबंदर किल्लयातील पुरातन टाकीत बिबट्याची पिल्लं पडली होती. वन विभागाने देखील खिंडीत बिबट्यांचा वावर असल्याने वाहनं जपुन चालवण्याचा इशारा देणारे फलक लावले आहेत. पण त्याचे पालन खिंडीत कोणीच वाहन चालक करत नाही. सद्या चौपदरी असलेला हा मार्ग ६ पदरी केल्यावर तर वाहनांच्या वेगावर कुठलेही नियंत्रणच राहणार नाही. जेणे करुन या भागातुन होणारा बिबट्यांचा वावर हा त्यांच्या जीवावर बेतण्याची भिती निर्माण झाली आहे. बिबट्यांसह विविध पशु - पक्षींचा या भागातील वावर देखील नामशेष होणार आहे. रुंदिकरणा मुळे येथील डोंगर आणखी फोडावा लागणार आहे. शिवाय दोन्ही बाजु कडील तब्बल ६४७ झाडांची कत्तल करावी लागणार आहे.  तर वरसावे येथे खाडी पुला पर्यंत जाणारया मार्गा साठी देखील १७६ झाडांची तोड केली जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने ६४७ व १७६ अशी मिळुन तब्बल ८३२ झाडांची तोड करण्यासाठी परवानगी मागीतली होती. नुकत्याच झालेल्या वृक्षप्राधिकरण समिती मध्ये सदस्यांनी पाहणी करण्याचा आग्रह धरतानाच झाडांचे पुर्नरोपण करा अशी भुमिका घेतली. तसे असले तरी झाडांची संख्या न टाकता समितीने झाडं काढण्यास परवानगी देऊन टाकली आहे. त्यामुळे ८२३ झाडांवर कुरहाड चालवण्याचा मार्ग आणखी सुकर झालाय. शिवाय येथील बिबट्यां सह वन्य जीवांवर देखील रुंदिकरण बेतणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. समिती मध्ये झाडं काढण्यास तसेच पुर्नरोपण करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी त्याची पाहणी केली जाणार आहे. पालिकेच्या हद्दीतील झाडं काढताना एकाच्या बदल्यात ५ झाडांची लागवड करुन घ्यावी असा निर्णय घेण्यात आलाय. तर वन विभागाच्या अखत्यारीतील ६४७ झाडं काढण्याचा विषय वन विभागा कडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगीतले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर