शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एमपीएससीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली सात लाख ८० हजारांची फसवणूक: भामटयाला यवतमाळमधून अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: December 5, 2017 19:31 IST

महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे अमिष दाखवित ठाण्यातील तरुणाकडून सात लाख ८० हजार रुपये उकळणा-या अर्जूनकुमार राठोड या भामटयाला ठाणे पोलिसांनी यवतमाळमधून अटक केली आहे.

ठळक मुद्दे ठाण्याच्या नौपाडा पोलिसांची कारवाईपोलीस उपायुक्तांशी सौख्य असल्याची केली बतावणीअनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता

ठाणे: मुंबईतील अनेक पोलीस उपायुक्तांशी आपले सौख्याचे संबंध आहेत. त्यामुळे महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मी सहज उत्तीर्ण करुन देऊ शकतो, अशी बतावणी करुन ठाण्यातील काही तरुणाची सात लाख ८० हजारांची फसवणूक करणा-या अर्जूनकुमार राठोड (रा. पिंपळगाव, जि. यवतमाळ) याला नौपाडा पोलिसांनी यवतमाळ येथून सोमवारी रात्री अटक केली आहे.कळव्याच्या हरपितसिंग चिमा (३०) याने पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस अधिकारी होण्यासाठी ठाण्यातील ‘क्लाईम्ब फस्ट’ या स्पर्धा परीक्षांसाठी असलेल्या खासगी क्लासमध्ये दहा हजार रुपये (तीन महिन्यांसाठी) भरुन प्रवेश घेतला होता. दीड महिना होऊनही शिकवलेले काहीच लक्षात येत नसल्यामुळे त्याने क्लासचे अर्जूनकुमार राठोड या शिक्षकांशी सपर्क साधला. सुरुवातीला राठोडनेच शिकविण्यास सुरुवात करुन घरगुती शिकवणी घेण्याचीही तयारी दर्शविली. त्यामुळे हरपितसिंग याच्यासह त्याचे मित्र बजरंग चौगुले, मन्नु टी आणि मयूर शेळके यांनी आॅक्टोबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ दरम्यान राठोड याच्या बदलापूरच्या मॅरेथॉन सिटी येथील घरी क्लासला सुरुवात केली. कालांतराने दोन महिने अचानक क्लास बंद झाला. पुढे एप्रिल २०१३ मध्ये राठोडने ठाण्याच्या पॅराडाईज टॉवर येथील दुस-या माळयावर ‘तांडा पब्लिकेशन अ‍ॅकेडमी’ नावाने क्लास सुरु केला. तिथे हरपितसिंग आणि त्याच्या मित्रांनी आठ महिन्यांच्या या क्लाससाठी ७५ हजार रुपये रोखीने भरुन प्रवेश घेतला. त्याचवेळी राठोडने मुंबईतील अनेक पोलीस उपायुक्त आपले भाऊबंद आहेत. त्यांच्याकडून मी तुम्हाला एमपीएससी परीक्षा पास करुन देतो, अशी बतावणी केली. त्याबदल्यात हरपितसिंग याच्याकडून जून २०१३ मध्ये एक लाख रुपये त्यापाठोपाठ २६ जुलै २०१३ रोजी ५० हजार रुपये, सप्टेंबर २०१३ आणि आॅक्टोबर २०१३ मध्ये अनुक्रमे दोन लाख आणि ५५ हजार रुपये असे सात लाख ८० हजार रुपये उकळले. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये मात्र राठोडने हा क्लासही बंद केला. पुढे अनेकदा तो पुढच्या महिन्यात तुझे काम नक्की करतो, असे सांगून तो हरपितसिंगला टोलवाटोलवी करीत होता. जानेवारी २०१६ नंतर त्याने फोनसह सर्व प्रकारचा संपर्क तोडला. वारंवार पाठपुरावा करुनही राठोडने पैसे किंवा नोकरीलाही न लावल्याने याप्रकरणी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी हरपितसिंगने राठोडविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर, पोलीस नाईक शब्बीर फरास आणि योगेश चव्हाण यांच्या पथकाने राठोडला अखेर यवतमाळ जिल्हयातील पिंपळगाव येथून ४ डिसेंबर रोजी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याने आणखी अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेcrimeगुन्हेPolice Stationपोलीस ठाणे