शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 00:30 IST

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखणार, अशी शक्यता वाटत होती. मात्र, भाजपनेच आव्हाडांना घेरण्यासाठी गनिमी कावा सुरू केला आहे. काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे ६०० हून अधिक स्वयंसेवक कळवा, मुंब्रा पिंजून काढत असून स्थानिकांसोबत गुप्त बैठका घेण्यावरही त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजप दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती, तर शिवसेनेला ३८ हजार ८५० मते मिळाली होती. एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपची मिळून ५१ हजार ६६८ मते मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ६७ हजार ४५५ मते मिळाली. शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना या मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली. परंतु, विधानसभेला आव्हाडांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत नऊ हजार १९७ मतांची घट झाल्याचे दिसून आले. येत्या विधानसभा निवडणुकीत आव्हाडांना घेरण्यासाठी शिवसेनेकडून मागील निवडणुकीप्रमाणे प्रयत्न सुरू होतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु, संघ परिवार व भाजप नेतृत्वावर टीकेचे प्रहार करणाऱ्या आव्हाडांना त्यांच्याच घरात घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची माहिती आहे. रा.स्व. संघ, भाजपविरोधात कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंह, हार्दिक पटेल यांनी मोर्चा उघडला होता. परंतु, त्या सर्वांचे आवाज भाजपने लोकसभा निवडणुकीत बंद करून टाकले. राज्यातील इतर कोणताही नेता हिंदुत्वाविरोधात थेट आवाज उठवत नाही, परंतु आव्हाड हे नेहमी भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात बोलत असल्याने आता त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने उचल खाल्ली आहे.भाजप आणि स्वयंसेवक संघाची मंडळी या भागात गुप्त बैठका घेत असून आव्हाड यांचे कच्चे दुवे हेरत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला १२ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे आता शिवसेनेला हाताशी घेऊन या मतदारसंघावर कब्जा करण्याची भाजपची तयारी आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. एमआयएमचा उमेदवार उभा करून मुस्लिम मतांचे विभाजन करणे शक्य आहे का, याचा आढावा स्वयंसेवक घेत आहेत. परंतु, शिवसेना हा मतदारसंघ सोडेल का, याबाबत चित्र स्पष्ट नाही. प्रस्ताव आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, असे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019