शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार; सर्वाधिक महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:20 IST

भारत निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून, ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत.

ठाणे - भारत निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून, ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यामध्ये ३३ लाख २१ह्जार ७५८ पुरुष, २७ लाख ७० हजार ९४९ महिला त्याचप्रमणे तृतीयपंथी ३४०, अनिवासी भारतीय ४०, सर्विसेसमधील १२२१ अशा मतदारांचा समावेश आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी दिली. 

यामध्ये सर्वाधिक ऐरोली मतदारसंघ ४ लाख ३४ हजार ९३५, मीरा भाईंदर ४ लाख 42 हजार २७९, कल्याण पश्चिम ४ लाख २८ हजार ८१४, ओवळा  माजिवाडा ४ लाख २१ हजार ११८, कल्याण ग्रामीण ४ लाख ३ हजार २०, मुरबाड ३ लाख ७८ हजार ५३०, बेलापूर ३ लाख ६८ हजार ५४३, मुंब्रा कळवा ३ लाख २८ हजार 450, अंबरनाथ ३ लाख २ हजार ५४६, कल्याण पूर्व ३ लाख ३३ हजार ९७१, डोंबिवली ३ लाख ३८ हजार २१७, कोपरी पांचपाखाडी ३ लाख 42 हजार ७९३, ठाणे ३ लाख १८ हजार ६७,  भिवंडी २ लाख ७९ हजार ३४०, शहापूर २ लाख ४४ हजार ९०, भिवंडी पश्चिम २ लाख ६४ हजार ६७८, भिवंडी पूर्व २ लाख ६३ हजार ६७, उल्हासनगर २ लाख २१ हजार ८५० अशी संख्या आहे. 

३४० तृतीयपंथी

३४० तृतीयपंथी यांची नोंदणी असून सर्वाधिक ८१ नोंदणी कल्याण पूर्व, भिवंडी पश्चिम ७०, कल्याण ग्रामीण ५५ , ऐरोली २५ अशी आहे.

सर्वाधिक  महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये

सर्वाधिक २ लाख १ हजार ७८१ महिला मतदार कल्याण पश्चिम मध्ये असून , मीरा भाईंदर १ लाख ९६ हजार ६८४, ओवला माजिवडा १ लाख ९१ हजार ५७७, ऐरोली १ लाख ८५ हजार ८४१ अशी संख्या आहे. सर्वात कमी महिला मतदार ९९ हजार ६८२ उल्हासनगर येथे आहेत.

६ हजार ४८८ मतदान केंद्रे

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ६ हजार ४८८ मतदान केंद्रे असून मुरबाड मध्ये ४५६, ऐरोली 433, मीरा भाईंदर ४१६, कल्याण पश्चिम ४०९, ओवला माजिवडा ४०१, बेलापूर ३८६, मुंब्रा कळवा ३५१, ठाणे ३७७, कोपरी ३६८, कल्याण ग्रामीण 389, डोंबिवली ३०३, कल्याण पूर्व ३४५, अंबरनाथ ३०३ भिवंडी पश्चिम ३११, शहापूर ३२६, भिवंडी ग्रामीण ३४९, भिवंडी पूर्व २८८, उल्हासनगर २७७.

८८ टक्के फोटो ओळखपत्रांचे काम पूर्ण

मतदारांना छायाचित्त्रासह ओळखपत्रांचे काम ८७.३७ टक्के पूर्ण झाले असून १३ .९३ टक्के काम राहिले आहे. जे की लवकरच पूर्ण होईल. सर्वाधिक ९९.९९ टक्के काम भिवंडी पूर्व , ९८.७१ टक्के उल्हासनगर, ९८.५४ टक्के काम शहापूर, अंबरनाथ ९७.६२, मुंब्रा कळवा ९६.८६ टक्के, भिवंडी ग्रामीण ९६.४ टक्के, मीरा भाईंदर ९३.१३ टक्के, मुरबाड ९२.९७ टक्के, भिवंडी पश्चिम ९३.४३ टक्के, ठाणे ९०.३८ टक्के, ८०.७६ कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा ८८.९ टक्के, कोपरी पाचपाखाडी ८७.५० टक्के, बेलापूर ८३.६४ टक्के, ऐरोली ७८.४ टक्के, कल्याण पूर्व ७३.५९ टक्के, कल्याण पश्चिम ७३.42 टक्के येथे झाले आहे.

९ लाख ४३ हजार ३१० तरुण मतदार

युवा मतदारांनी नाव नोंदणीस चांगला प्रतिसाद दिला असून,  १८ ते १९ वयोगटात एकूण ४३ हजार ७५८ मतदार आहेत तर  २० ते २९ वयोगटात ८ लाख ९९ हजार ३५२ मतदार आहेत. ३० ते ३९ या मध्यम वयोगटात १४ लाख ७१ हजार २७९ तर ४० ते ४९ वयोगटात १५ लाख ६३ हजार २१०, ५० ते ५९ वयोगटात १० लाख ८५ हजार ४२६, तसेच ६० ते ६९ वयोगटात ६ लाख १३ हजार ६२९ , ७० ते ७९ वयोगटात २ लाख ७३ हजार ६८३ आणि ८० च्या पुढे १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत.     

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक