शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार; सर्वाधिक महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:20 IST

भारत निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून, ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत.

ठाणे - भारत निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून, ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यामध्ये ३३ लाख २१ह्जार ७५८ पुरुष, २७ लाख ७० हजार ९४९ महिला त्याचप्रमणे तृतीयपंथी ३४०, अनिवासी भारतीय ४०, सर्विसेसमधील १२२१ अशा मतदारांचा समावेश आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी दिली. 

यामध्ये सर्वाधिक ऐरोली मतदारसंघ ४ लाख ३४ हजार ९३५, मीरा भाईंदर ४ लाख 42 हजार २७९, कल्याण पश्चिम ४ लाख २८ हजार ८१४, ओवळा  माजिवाडा ४ लाख २१ हजार ११८, कल्याण ग्रामीण ४ लाख ३ हजार २०, मुरबाड ३ लाख ७८ हजार ५३०, बेलापूर ३ लाख ६८ हजार ५४३, मुंब्रा कळवा ३ लाख २८ हजार 450, अंबरनाथ ३ लाख २ हजार ५४६, कल्याण पूर्व ३ लाख ३३ हजार ९७१, डोंबिवली ३ लाख ३८ हजार २१७, कोपरी पांचपाखाडी ३ लाख 42 हजार ७९३, ठाणे ३ लाख १८ हजार ६७,  भिवंडी २ लाख ७९ हजार ३४०, शहापूर २ लाख ४४ हजार ९०, भिवंडी पश्चिम २ लाख ६४ हजार ६७८, भिवंडी पूर्व २ लाख ६३ हजार ६७, उल्हासनगर २ लाख २१ हजार ८५० अशी संख्या आहे. 

३४० तृतीयपंथी

३४० तृतीयपंथी यांची नोंदणी असून सर्वाधिक ८१ नोंदणी कल्याण पूर्व, भिवंडी पश्चिम ७०, कल्याण ग्रामीण ५५ , ऐरोली २५ अशी आहे.

सर्वाधिक  महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये

सर्वाधिक २ लाख १ हजार ७८१ महिला मतदार कल्याण पश्चिम मध्ये असून , मीरा भाईंदर १ लाख ९६ हजार ६८४, ओवला माजिवडा १ लाख ९१ हजार ५७७, ऐरोली १ लाख ८५ हजार ८४१ अशी संख्या आहे. सर्वात कमी महिला मतदार ९९ हजार ६८२ उल्हासनगर येथे आहेत.

६ हजार ४८८ मतदान केंद्रे

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ६ हजार ४८८ मतदान केंद्रे असून मुरबाड मध्ये ४५६, ऐरोली 433, मीरा भाईंदर ४१६, कल्याण पश्चिम ४०९, ओवला माजिवडा ४०१, बेलापूर ३८६, मुंब्रा कळवा ३५१, ठाणे ३७७, कोपरी ३६८, कल्याण ग्रामीण 389, डोंबिवली ३०३, कल्याण पूर्व ३४५, अंबरनाथ ३०३ भिवंडी पश्चिम ३११, शहापूर ३२६, भिवंडी ग्रामीण ३४९, भिवंडी पूर्व २८८, उल्हासनगर २७७.

८८ टक्के फोटो ओळखपत्रांचे काम पूर्ण

मतदारांना छायाचित्त्रासह ओळखपत्रांचे काम ८७.३७ टक्के पूर्ण झाले असून १३ .९३ टक्के काम राहिले आहे. जे की लवकरच पूर्ण होईल. सर्वाधिक ९९.९९ टक्के काम भिवंडी पूर्व , ९८.७१ टक्के उल्हासनगर, ९८.५४ टक्के काम शहापूर, अंबरनाथ ९७.६२, मुंब्रा कळवा ९६.८६ टक्के, भिवंडी ग्रामीण ९६.४ टक्के, मीरा भाईंदर ९३.१३ टक्के, मुरबाड ९२.९७ टक्के, भिवंडी पश्चिम ९३.४३ टक्के, ठाणे ९०.३८ टक्के, ८०.७६ कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा ८८.९ टक्के, कोपरी पाचपाखाडी ८७.५० टक्के, बेलापूर ८३.६४ टक्के, ऐरोली ७८.४ टक्के, कल्याण पूर्व ७३.५९ टक्के, कल्याण पश्चिम ७३.42 टक्के येथे झाले आहे.

९ लाख ४३ हजार ३१० तरुण मतदार

युवा मतदारांनी नाव नोंदणीस चांगला प्रतिसाद दिला असून,  १८ ते १९ वयोगटात एकूण ४३ हजार ७५८ मतदार आहेत तर  २० ते २९ वयोगटात ८ लाख ९९ हजार ३५२ मतदार आहेत. ३० ते ३९ या मध्यम वयोगटात १४ लाख ७१ हजार २७९ तर ४० ते ४९ वयोगटात १५ लाख ६३ हजार २१०, ५० ते ५९ वयोगटात १० लाख ८५ हजार ४२६, तसेच ६० ते ६९ वयोगटात ६ लाख १३ हजार ६२९ , ७० ते ७९ वयोगटात २ लाख ७३ हजार ६८३ आणि ८० च्या पुढे १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत.     

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक