शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटींची ‘हंडी’

By admin | Updated: February 14, 2017 03:01 IST

नोटाबंदीचा महापालिका निवडणुकीवर गंभीर परिणाम दिसेल, ही अपेक्षा फोल ठरवत काही धनदांडग्या उमेदवारांनी अक्षरश: दौलतजादा

ठाणे : नोटाबंदीचा महापालिका निवडणुकीवर गंभीर परिणाम दिसेल, ही अपेक्षा फोल ठरवत काही धनदांडग्या उमेदवारांनी अक्षरश: दौलतजादा सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ५०० कोटी खर्च होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा ८ लाख रुपये ठेवली असली, तरी काही उमेदवारांनी खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. चारसदस्यीय प्रभागपद्धतीत प्रत्येक पक्षाने एकदोन आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार दिले आहेत. अन्य दोन उमेदवारांचा खर्च त्यांनीच उचलायचा आहे. या वेळी शिवसेना-भाजपा हे परस्परांच्या समोर लढत असल्याने लढाई तुंबळ होणार आहे. सत्ताधारी भाजपाने अन्य पक्षांतील मातब्बर उमेदवार आपल्या पक्षात आणून त्यांना रिंगणात उतरवले आहे. याखेरीज, काही ‘टॉवरबाज’ नेते-कम-बिल्डर या उमेदवारांच्या राजकीय कुंडलीत ‘मंगलप्रभात’ होण्याकरिता रसद पुरवत असल्याचे अन्य पक्षाच्या उमेदवारांकडून सांगितले जाते. नोटाबंदीमुळे या निवडणुकीत लक्ष्मीदर्शन कार्यक्रम तेजीत नसेल, असा होरा होता. त्यातच निवडणूक आयोग, आयकर विभाग यांचे उमेदवारांकडे बारीक लक्ष असल्याने पैशांची उधळपट्टी होणार नाही, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात काही तगडे उमेदवार जोशात आहेत. केवळ आठ लाखांत चार पॅनलमध्ये जाऊन प्रचार कसा करायचा, असा सवाल काही उमेदवारांनी केला. उमेदवारांचे गुळगुळीत कागदावरील कार्यअहवाल, वचननामे, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले डिजिटल वचननामे हाच खर्च अंदाजे दोन ते तीन लाखांच्यावर गेल्याचे बोलले जाते. याशिवाय, प्रचारासाठी लागणारे साहित्य, कार्यकर्ते, वाहने, निवडणूक विभागाकडून विविध स्वरूपाच्या परवानग्या, झेंडे लावण्यासाठी दिली जाणारी रक्कम आदींचा खर्चही आता वाढला आहे. पूर्वी प्रचारासाठी असलेल्या कार्यकर्त्याला दिवसाला १०० रुपये, तसेच चहा, नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असा खर्च केला जात होता. परंतु, आज एका दिवसाच्या प्रचारफेरीसाठीच काही ठिकाणी ५०० ते ७०० रुपये मोजले जात आहेत. याखेरीज, रात्रीच्या पार्ट्या तेजीत आहेत. विविध मंडळे, महिला बचत गट, तरुण मित्र मंडळ यांची निवडणूक काळात चंगळ असते. बरेच उमेदवार मंडळे व संस्थांना निवडणूक घोषित होण्यापूर्वी पैसे वाटून मोकळे झालेले असतात. प्रचार सभा, चौक सभा याकरिता माणसे आणण्याकरिता माणशी ४०० ते ५०० रुपये खर्च होत आहेत. काही उमेदवारांनी हायटेक प्रचारासाठी वॉर रूम तयार केली आहे, यासाठी काही लाखांच्यावर खर्च केला जात आहे. काही उमेदवारांनी खासगी संस्था नेमून आपल्या प्रभागात सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे खर्च कमालीचा वाढला आहे. सोसायट्या व झोपडपट्ट्या बांधून ठेवण्याकरिताची धडपड निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे.ठाण्यातील बहुतांश उमेदवारांनी कागदोपत्री आठ लाख रुपयांच्या आत खर्च केल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात किमान २५ लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत काहींचा खर्च झाला आहे. शेवटच्या तीन दिवसांत मतांची फिरवाफिरव करण्यासाठी लाखोंची उधळपट्टी होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ५०० कोटींची उधळण होणार, हे नक्की आहे. (प्रतिनिधी) उल्हासनगरमध्ये १५० कोटींचा चुराडा निवडणूक आयोगाने उमेदवारांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या खर्चाचे बंधन घातले असले, तरी चारसदस्यीय प्रभागपद्धतीत प्रत्येक पक्षाने एक पैशाने गब्बर उमेदवार देऊन त्याच्यावर अन्य उमेदवारांच्या खर्चाची जबाबदारी टाकल्याने यंदा निवडणुकीत किमान १५० कोटी रुपयांचा चुराडा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. उमेदवारांनी सजवलेली त्यांची कार्यालये, तेथील झेंडे-बॅनर, कार्यकर्त्यांना चहा-नाश्त्याचा सुरू असलेला रतीब, प्रचारफेऱ्यांमध्ये जमवली जाणारी गर्दी, जेवणाच्या पंक्ती, रात्रीच्या खाणावळी आणि पार्ट्या हे सारे पाहता खर्चाचे बंधन आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांनी पाळण्याचा वसा असून रग्गड पैसेवाल्या उमेदवारांकडे पैसा धो-धो वाहत आहे.तिरंगी आणि चौरंगी लढत असल्याने प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उल्हासनगरमध्ये विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा विचार केला असता ४५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील ५० टक्के उमेदवार हे मध्यमवर्गीय आहेत. मात्र, उर्वरित ५० टक्के उमेदवारांपैकी ३० टक्के उमेदवार हे निवडणुकीत अमाप खर्च करीत आहेत. काही उमेदवार लाख ते दोन लाख रुपये खर्चदेखील मोजूनमापून करणारे आहेत. चार वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने पक्षाच्या श्रीमंत उमेदवाराला स्वत: निवडून येण्याबरोबर इतर उमेदवरांच्या खर्चाची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. उल्हासनगर हे व्यापारी शहर असल्याने उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षमच देण्यात आले आहेत. शिवसेना, भाजपा, टीम ओमी, साई पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारांची श्रीमंती पाहूनच त्यांना उमेदवारी दिली आहे. उल्हासनगरात काही वर्षांपर्यंत ‘पप्पूगिरी’च्या जीवावर ज्या निवडणुका जिंकल्या जात होत्या, त्याच उल्हासनगरमध्ये या निवडणुकीत ‘दादागिरी’पेक्षा (पप्पूगिरी हा या शब्दांचा समानार्थी शब्द आहे) आर्थिक उधळपट्टी करून निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. पॅनल क्रमांक-२ मध्ये ओमी कलानी यांची पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने या प्रभागात संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी सर्वाधिक खर्च केला जात असल्याची चर्चा आहे.झोपडपट्टीत मतांना पैसे आणि सोसायटीच्या विकासाची कामे करण्याची रणनीती उमेदवारांनी अवलंबली आहे. सोसायटीमधील रंगरंगोटी, सीसीटीव्ही कॅमेरे, पेव्हर ब्लॉक, बोअरवेल आणि सुशोभीकरण करून देण्याची कामे एकतर दोन महिन्यांपूर्वी केलेली आहेत किंवा विजयी झाल्यास करण्याबाबतची पत्रं उमेदवार देत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये उमेदवारांनी भोजनावळी घातल्या. हा सर्व खर्च उमेदवारांच्या वतीने केला जात असला तरी तो व त्यांचे निकटचे कार्यकर्ते कुठेही थेट समोर येत नाहीत.