शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
6
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
7
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
8
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
9
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
10
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
11
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
12
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
13
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
14
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
15
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
16
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
17
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
18
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
19
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
20
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटींची ‘हंडी’

By admin | Updated: February 14, 2017 03:01 IST

नोटाबंदीचा महापालिका निवडणुकीवर गंभीर परिणाम दिसेल, ही अपेक्षा फोल ठरवत काही धनदांडग्या उमेदवारांनी अक्षरश: दौलतजादा

ठाणे : नोटाबंदीचा महापालिका निवडणुकीवर गंभीर परिणाम दिसेल, ही अपेक्षा फोल ठरवत काही धनदांडग्या उमेदवारांनी अक्षरश: दौलतजादा सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ५०० कोटी खर्च होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा ८ लाख रुपये ठेवली असली, तरी काही उमेदवारांनी खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. चारसदस्यीय प्रभागपद्धतीत प्रत्येक पक्षाने एकदोन आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार दिले आहेत. अन्य दोन उमेदवारांचा खर्च त्यांनीच उचलायचा आहे. या वेळी शिवसेना-भाजपा हे परस्परांच्या समोर लढत असल्याने लढाई तुंबळ होणार आहे. सत्ताधारी भाजपाने अन्य पक्षांतील मातब्बर उमेदवार आपल्या पक्षात आणून त्यांना रिंगणात उतरवले आहे. याखेरीज, काही ‘टॉवरबाज’ नेते-कम-बिल्डर या उमेदवारांच्या राजकीय कुंडलीत ‘मंगलप्रभात’ होण्याकरिता रसद पुरवत असल्याचे अन्य पक्षाच्या उमेदवारांकडून सांगितले जाते. नोटाबंदीमुळे या निवडणुकीत लक्ष्मीदर्शन कार्यक्रम तेजीत नसेल, असा होरा होता. त्यातच निवडणूक आयोग, आयकर विभाग यांचे उमेदवारांकडे बारीक लक्ष असल्याने पैशांची उधळपट्टी होणार नाही, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात काही तगडे उमेदवार जोशात आहेत. केवळ आठ लाखांत चार पॅनलमध्ये जाऊन प्रचार कसा करायचा, असा सवाल काही उमेदवारांनी केला. उमेदवारांचे गुळगुळीत कागदावरील कार्यअहवाल, वचननामे, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले डिजिटल वचननामे हाच खर्च अंदाजे दोन ते तीन लाखांच्यावर गेल्याचे बोलले जाते. याशिवाय, प्रचारासाठी लागणारे साहित्य, कार्यकर्ते, वाहने, निवडणूक विभागाकडून विविध स्वरूपाच्या परवानग्या, झेंडे लावण्यासाठी दिली जाणारी रक्कम आदींचा खर्चही आता वाढला आहे. पूर्वी प्रचारासाठी असलेल्या कार्यकर्त्याला दिवसाला १०० रुपये, तसेच चहा, नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असा खर्च केला जात होता. परंतु, आज एका दिवसाच्या प्रचारफेरीसाठीच काही ठिकाणी ५०० ते ७०० रुपये मोजले जात आहेत. याखेरीज, रात्रीच्या पार्ट्या तेजीत आहेत. विविध मंडळे, महिला बचत गट, तरुण मित्र मंडळ यांची निवडणूक काळात चंगळ असते. बरेच उमेदवार मंडळे व संस्थांना निवडणूक घोषित होण्यापूर्वी पैसे वाटून मोकळे झालेले असतात. प्रचार सभा, चौक सभा याकरिता माणसे आणण्याकरिता माणशी ४०० ते ५०० रुपये खर्च होत आहेत. काही उमेदवारांनी हायटेक प्रचारासाठी वॉर रूम तयार केली आहे, यासाठी काही लाखांच्यावर खर्च केला जात आहे. काही उमेदवारांनी खासगी संस्था नेमून आपल्या प्रभागात सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे खर्च कमालीचा वाढला आहे. सोसायट्या व झोपडपट्ट्या बांधून ठेवण्याकरिताची धडपड निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे.ठाण्यातील बहुतांश उमेदवारांनी कागदोपत्री आठ लाख रुपयांच्या आत खर्च केल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात किमान २५ लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत काहींचा खर्च झाला आहे. शेवटच्या तीन दिवसांत मतांची फिरवाफिरव करण्यासाठी लाखोंची उधळपट्टी होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ५०० कोटींची उधळण होणार, हे नक्की आहे. (प्रतिनिधी) उल्हासनगरमध्ये १५० कोटींचा चुराडा निवडणूक आयोगाने उमेदवारांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या खर्चाचे बंधन घातले असले, तरी चारसदस्यीय प्रभागपद्धतीत प्रत्येक पक्षाने एक पैशाने गब्बर उमेदवार देऊन त्याच्यावर अन्य उमेदवारांच्या खर्चाची जबाबदारी टाकल्याने यंदा निवडणुकीत किमान १५० कोटी रुपयांचा चुराडा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. उमेदवारांनी सजवलेली त्यांची कार्यालये, तेथील झेंडे-बॅनर, कार्यकर्त्यांना चहा-नाश्त्याचा सुरू असलेला रतीब, प्रचारफेऱ्यांमध्ये जमवली जाणारी गर्दी, जेवणाच्या पंक्ती, रात्रीच्या खाणावळी आणि पार्ट्या हे सारे पाहता खर्चाचे बंधन आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांनी पाळण्याचा वसा असून रग्गड पैसेवाल्या उमेदवारांकडे पैसा धो-धो वाहत आहे.तिरंगी आणि चौरंगी लढत असल्याने प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उल्हासनगरमध्ये विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा विचार केला असता ४५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील ५० टक्के उमेदवार हे मध्यमवर्गीय आहेत. मात्र, उर्वरित ५० टक्के उमेदवारांपैकी ३० टक्के उमेदवार हे निवडणुकीत अमाप खर्च करीत आहेत. काही उमेदवार लाख ते दोन लाख रुपये खर्चदेखील मोजूनमापून करणारे आहेत. चार वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने पक्षाच्या श्रीमंत उमेदवाराला स्वत: निवडून येण्याबरोबर इतर उमेदवरांच्या खर्चाची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. उल्हासनगर हे व्यापारी शहर असल्याने उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षमच देण्यात आले आहेत. शिवसेना, भाजपा, टीम ओमी, साई पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारांची श्रीमंती पाहूनच त्यांना उमेदवारी दिली आहे. उल्हासनगरात काही वर्षांपर्यंत ‘पप्पूगिरी’च्या जीवावर ज्या निवडणुका जिंकल्या जात होत्या, त्याच उल्हासनगरमध्ये या निवडणुकीत ‘दादागिरी’पेक्षा (पप्पूगिरी हा या शब्दांचा समानार्थी शब्द आहे) आर्थिक उधळपट्टी करून निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. पॅनल क्रमांक-२ मध्ये ओमी कलानी यांची पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने या प्रभागात संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी सर्वाधिक खर्च केला जात असल्याची चर्चा आहे.झोपडपट्टीत मतांना पैसे आणि सोसायटीच्या विकासाची कामे करण्याची रणनीती उमेदवारांनी अवलंबली आहे. सोसायटीमधील रंगरंगोटी, सीसीटीव्ही कॅमेरे, पेव्हर ब्लॉक, बोअरवेल आणि सुशोभीकरण करून देण्याची कामे एकतर दोन महिन्यांपूर्वी केलेली आहेत किंवा विजयी झाल्यास करण्याबाबतची पत्रं उमेदवार देत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये उमेदवारांनी भोजनावळी घातल्या. हा सर्व खर्च उमेदवारांच्या वतीने केला जात असला तरी तो व त्यांचे निकटचे कार्यकर्ते कुठेही थेट समोर येत नाहीत.