शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
9
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
10
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
11
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
12
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
13
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
14
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
15
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
16
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
17
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
18
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
19
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
20
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

५०० कोटींची ‘हंडी’

By admin | Updated: February 14, 2017 03:01 IST

नोटाबंदीचा महापालिका निवडणुकीवर गंभीर परिणाम दिसेल, ही अपेक्षा फोल ठरवत काही धनदांडग्या उमेदवारांनी अक्षरश: दौलतजादा

ठाणे : नोटाबंदीचा महापालिका निवडणुकीवर गंभीर परिणाम दिसेल, ही अपेक्षा फोल ठरवत काही धनदांडग्या उमेदवारांनी अक्षरश: दौलतजादा सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ५०० कोटी खर्च होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा ८ लाख रुपये ठेवली असली, तरी काही उमेदवारांनी खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. चारसदस्यीय प्रभागपद्धतीत प्रत्येक पक्षाने एकदोन आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार दिले आहेत. अन्य दोन उमेदवारांचा खर्च त्यांनीच उचलायचा आहे. या वेळी शिवसेना-भाजपा हे परस्परांच्या समोर लढत असल्याने लढाई तुंबळ होणार आहे. सत्ताधारी भाजपाने अन्य पक्षांतील मातब्बर उमेदवार आपल्या पक्षात आणून त्यांना रिंगणात उतरवले आहे. याखेरीज, काही ‘टॉवरबाज’ नेते-कम-बिल्डर या उमेदवारांच्या राजकीय कुंडलीत ‘मंगलप्रभात’ होण्याकरिता रसद पुरवत असल्याचे अन्य पक्षाच्या उमेदवारांकडून सांगितले जाते. नोटाबंदीमुळे या निवडणुकीत लक्ष्मीदर्शन कार्यक्रम तेजीत नसेल, असा होरा होता. त्यातच निवडणूक आयोग, आयकर विभाग यांचे उमेदवारांकडे बारीक लक्ष असल्याने पैशांची उधळपट्टी होणार नाही, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात काही तगडे उमेदवार जोशात आहेत. केवळ आठ लाखांत चार पॅनलमध्ये जाऊन प्रचार कसा करायचा, असा सवाल काही उमेदवारांनी केला. उमेदवारांचे गुळगुळीत कागदावरील कार्यअहवाल, वचननामे, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले डिजिटल वचननामे हाच खर्च अंदाजे दोन ते तीन लाखांच्यावर गेल्याचे बोलले जाते. याशिवाय, प्रचारासाठी लागणारे साहित्य, कार्यकर्ते, वाहने, निवडणूक विभागाकडून विविध स्वरूपाच्या परवानग्या, झेंडे लावण्यासाठी दिली जाणारी रक्कम आदींचा खर्चही आता वाढला आहे. पूर्वी प्रचारासाठी असलेल्या कार्यकर्त्याला दिवसाला १०० रुपये, तसेच चहा, नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असा खर्च केला जात होता. परंतु, आज एका दिवसाच्या प्रचारफेरीसाठीच काही ठिकाणी ५०० ते ७०० रुपये मोजले जात आहेत. याखेरीज, रात्रीच्या पार्ट्या तेजीत आहेत. विविध मंडळे, महिला बचत गट, तरुण मित्र मंडळ यांची निवडणूक काळात चंगळ असते. बरेच उमेदवार मंडळे व संस्थांना निवडणूक घोषित होण्यापूर्वी पैसे वाटून मोकळे झालेले असतात. प्रचार सभा, चौक सभा याकरिता माणसे आणण्याकरिता माणशी ४०० ते ५०० रुपये खर्च होत आहेत. काही उमेदवारांनी हायटेक प्रचारासाठी वॉर रूम तयार केली आहे, यासाठी काही लाखांच्यावर खर्च केला जात आहे. काही उमेदवारांनी खासगी संस्था नेमून आपल्या प्रभागात सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे खर्च कमालीचा वाढला आहे. सोसायट्या व झोपडपट्ट्या बांधून ठेवण्याकरिताची धडपड निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे.ठाण्यातील बहुतांश उमेदवारांनी कागदोपत्री आठ लाख रुपयांच्या आत खर्च केल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात किमान २५ लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत काहींचा खर्च झाला आहे. शेवटच्या तीन दिवसांत मतांची फिरवाफिरव करण्यासाठी लाखोंची उधळपट्टी होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ५०० कोटींची उधळण होणार, हे नक्की आहे. (प्रतिनिधी) उल्हासनगरमध्ये १५० कोटींचा चुराडा निवडणूक आयोगाने उमेदवारांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या खर्चाचे बंधन घातले असले, तरी चारसदस्यीय प्रभागपद्धतीत प्रत्येक पक्षाने एक पैशाने गब्बर उमेदवार देऊन त्याच्यावर अन्य उमेदवारांच्या खर्चाची जबाबदारी टाकल्याने यंदा निवडणुकीत किमान १५० कोटी रुपयांचा चुराडा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. उमेदवारांनी सजवलेली त्यांची कार्यालये, तेथील झेंडे-बॅनर, कार्यकर्त्यांना चहा-नाश्त्याचा सुरू असलेला रतीब, प्रचारफेऱ्यांमध्ये जमवली जाणारी गर्दी, जेवणाच्या पंक्ती, रात्रीच्या खाणावळी आणि पार्ट्या हे सारे पाहता खर्चाचे बंधन आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांनी पाळण्याचा वसा असून रग्गड पैसेवाल्या उमेदवारांकडे पैसा धो-धो वाहत आहे.तिरंगी आणि चौरंगी लढत असल्याने प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उल्हासनगरमध्ये विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा विचार केला असता ४५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील ५० टक्के उमेदवार हे मध्यमवर्गीय आहेत. मात्र, उर्वरित ५० टक्के उमेदवारांपैकी ३० टक्के उमेदवार हे निवडणुकीत अमाप खर्च करीत आहेत. काही उमेदवार लाख ते दोन लाख रुपये खर्चदेखील मोजूनमापून करणारे आहेत. चार वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने पक्षाच्या श्रीमंत उमेदवाराला स्वत: निवडून येण्याबरोबर इतर उमेदवरांच्या खर्चाची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. उल्हासनगर हे व्यापारी शहर असल्याने उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षमच देण्यात आले आहेत. शिवसेना, भाजपा, टीम ओमी, साई पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारांची श्रीमंती पाहूनच त्यांना उमेदवारी दिली आहे. उल्हासनगरात काही वर्षांपर्यंत ‘पप्पूगिरी’च्या जीवावर ज्या निवडणुका जिंकल्या जात होत्या, त्याच उल्हासनगरमध्ये या निवडणुकीत ‘दादागिरी’पेक्षा (पप्पूगिरी हा या शब्दांचा समानार्थी शब्द आहे) आर्थिक उधळपट्टी करून निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. पॅनल क्रमांक-२ मध्ये ओमी कलानी यांची पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने या प्रभागात संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी सर्वाधिक खर्च केला जात असल्याची चर्चा आहे.झोपडपट्टीत मतांना पैसे आणि सोसायटीच्या विकासाची कामे करण्याची रणनीती उमेदवारांनी अवलंबली आहे. सोसायटीमधील रंगरंगोटी, सीसीटीव्ही कॅमेरे, पेव्हर ब्लॉक, बोअरवेल आणि सुशोभीकरण करून देण्याची कामे एकतर दोन महिन्यांपूर्वी केलेली आहेत किंवा विजयी झाल्यास करण्याबाबतची पत्रं उमेदवार देत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये उमेदवारांनी भोजनावळी घातल्या. हा सर्व खर्च उमेदवारांच्या वतीने केला जात असला तरी तो व त्यांचे निकटचे कार्यकर्ते कुठेही थेट समोर येत नाहीत.