शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५० ते ५५ टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Updated: May 20, 2024 20:50 IST

या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले.

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे लाेकसभा मतदारसंघातील २४ उमेदवारांप्रमाणेच कल्याण मतदारसंघाताील २८ आणि भिवंडी लाेकसभेचे २७ उमेदवार आदी मिळून जिल्ह्यातील या ७९ उमेदवारांना सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवरील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले आहे. मात्र शेवटच्या एका तासाचे मतदान येण्यास विलंब हाेणार असल्यामुळे जिल्ह्याभरात संध्याकाळपर्यंत ५० ते ५५ टक्के मतदान झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले.

जिल्ह्यात आज पाचव्या टप्यात मतदान झालं आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१९ ला ५०.२१ टक्के मतदान जिल्ह्याभरात झाले हाेते. त्यात यावेळी वाढ हाेऊन ते ५५ टक्केपर्यंत जाण्याचा आंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.जिल्ह्यातील या तिन्ही लाेकसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्राव्दारे ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. यंत्र बंद पडण्याच्या किरकाेळ घटना वगळता जिल्ह्यातील या तिन्ही मतदारसंघात आज शांततेत मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र उन्हाची दाहकता वाढल्यामुळे मतदारांचा उत्साह कमी झालेला दिसून आला. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंतच्या दाेन फेऱ्यांमध्ये ठाणे लाेकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभांमध्ये १४.८६ टक्के मतदान झाल्याची नाेंद आहे. तर कल्याणमध्ये १४.१२ टक्के आणि भिवंडी मतदारसंघात १४.७९ टक्के मतदान पहिल्या चार तासात झाल्याची नाेंद आहे.

जिल्ह्यात १ वाजेपर्यंत २५.३५ टक्के मतदान झाले हाेतेत्र त्यापैकी ठाणे मतदारसंघात २६.०५ टक्के म्हणजे सहा लाख ५३ हजार ३५२ मतदान झाले. कल्याणमध्ये २२.५२ टक्के म्हणजे चार लाख ६९ हजार ४६ जणांनी मतदान केले. भिवंडीत २७.३४ टक्के म्हणजे पाच लाख ७० हजार ७५० जणांनी मतदान केल्याचे उघड झाले आहे. याप्रमाणेच ३ वाजेपर्यंत या मतदारसंघात सात लाख ७३ हजार ६६६ जणांनी मतदान केंले असता ३७.०६ टक्के या मतदानाची नाेंद झाली. तर ठाण्यात ३६.०७ टक्के म्हणजे नऊ लाख चार हजार ६६१ मतदांनी मतदान केल्याचे उघड झाले. तर कल्याणमध्ये सहा लाख ७५ हजार ४५२ म्हणजे ३२.४३ टक्के मतदान ३ वाजेपर्यंत झाल्याची नाेंद करण्यात आलेली आहे. या मतदानात कल्याणमध्ये ५ वाजेपर्यंत सुमारे १० टक्के वाढ हाेऊन ती ४१.७० टक्के म्हणजे आठ लाख ६८ हजार ५२७ जणांनी मतदान केल्याचे उघड हाेत आहे. याप्रमाणेच ठाण्यामध्ये १० टक्के वाढ हाेऊन ४६.७७ टक्के म्हणजे ११ लाख ७३ हजार २५ मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. तर भिवंडीत सर्वाधिक १३ टक्के वाढ हाेऊन ५ वाजेपर्यंत ४९.४३ टक्के म्हणजे दहा लाख ३१ हजार ९०२ जणांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेVotingमतदान