शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५० ते ५५ टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Updated: May 20, 2024 20:50 IST

या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले.

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे लाेकसभा मतदारसंघातील २४ उमेदवारांप्रमाणेच कल्याण मतदारसंघाताील २८ आणि भिवंडी लाेकसभेचे २७ उमेदवार आदी मिळून जिल्ह्यातील या ७९ उमेदवारांना सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवरील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले आहे. मात्र शेवटच्या एका तासाचे मतदान येण्यास विलंब हाेणार असल्यामुळे जिल्ह्याभरात संध्याकाळपर्यंत ५० ते ५५ टक्के मतदान झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले.

जिल्ह्यात आज पाचव्या टप्यात मतदान झालं आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१९ ला ५०.२१ टक्के मतदान जिल्ह्याभरात झाले हाेते. त्यात यावेळी वाढ हाेऊन ते ५५ टक्केपर्यंत जाण्याचा आंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.जिल्ह्यातील या तिन्ही लाेकसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्राव्दारे ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. यंत्र बंद पडण्याच्या किरकाेळ घटना वगळता जिल्ह्यातील या तिन्ही मतदारसंघात आज शांततेत मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र उन्हाची दाहकता वाढल्यामुळे मतदारांचा उत्साह कमी झालेला दिसून आला. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंतच्या दाेन फेऱ्यांमध्ये ठाणे लाेकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभांमध्ये १४.८६ टक्के मतदान झाल्याची नाेंद आहे. तर कल्याणमध्ये १४.१२ टक्के आणि भिवंडी मतदारसंघात १४.७९ टक्के मतदान पहिल्या चार तासात झाल्याची नाेंद आहे.

जिल्ह्यात १ वाजेपर्यंत २५.३५ टक्के मतदान झाले हाेतेत्र त्यापैकी ठाणे मतदारसंघात २६.०५ टक्के म्हणजे सहा लाख ५३ हजार ३५२ मतदान झाले. कल्याणमध्ये २२.५२ टक्के म्हणजे चार लाख ६९ हजार ४६ जणांनी मतदान केले. भिवंडीत २७.३४ टक्के म्हणजे पाच लाख ७० हजार ७५० जणांनी मतदान केल्याचे उघड झाले आहे. याप्रमाणेच ३ वाजेपर्यंत या मतदारसंघात सात लाख ७३ हजार ६६६ जणांनी मतदान केंले असता ३७.०६ टक्के या मतदानाची नाेंद झाली. तर ठाण्यात ३६.०७ टक्के म्हणजे नऊ लाख चार हजार ६६१ मतदांनी मतदान केल्याचे उघड झाले. तर कल्याणमध्ये सहा लाख ७५ हजार ४५२ म्हणजे ३२.४३ टक्के मतदान ३ वाजेपर्यंत झाल्याची नाेंद करण्यात आलेली आहे. या मतदानात कल्याणमध्ये ५ वाजेपर्यंत सुमारे १० टक्के वाढ हाेऊन ती ४१.७० टक्के म्हणजे आठ लाख ६८ हजार ५२७ जणांनी मतदान केल्याचे उघड हाेत आहे. याप्रमाणेच ठाण्यामध्ये १० टक्के वाढ हाेऊन ४६.७७ टक्के म्हणजे ११ लाख ७३ हजार २५ मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. तर भिवंडीत सर्वाधिक १३ टक्के वाढ हाेऊन ५ वाजेपर्यंत ४९.४३ टक्के म्हणजे दहा लाख ३१ हजार ९०२ जणांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेVotingमतदान