शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २६,६४४ हेक्टर भातपिकाला बसला फटका; सर्वपक्षीय नेते मात्र सत्तास्थापनेत व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:41 IST

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

सुरेश लोखंडे 

ठाणे : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून बचावलेल्या व हाताशी आलेल्या पिकांचे पुन्हा सध्याच्या अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी तालुक्यांमध्ये या अवकाळी पावसामुळे २६ हजार ६४४ हेक्टरील भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी सत्ता स्थापनेचे राजकीय गणिते जुळवण्यात व्यस्त असताना कृषीयंत्रणा शेतावर जाऊन पंचनामा करत असल्याचे दिसत आहे.

किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या क्यार वादळामुळे सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप वाया गेल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील ५५ हजार २३५ हेक्टर भातशेतीपैकी २६ हजार ६४४ हेक्टर शेतीचे या पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान कृषी विभागाने ३१ आॅक्टोबर अखेर १३ हजार ५१५ हेक्टर शेतीचे पंचनामे केले आहे. तर उर्वरित १३ हजार हेक्टरवरील भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी जिल्ह्यात कृषी यंत्रणा तैनात आहे. अगामी चार दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

२६ व २७ जुलै आणि ४ ते ६ आॅगस्टदरम्यानच्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३९८ गावे बाधीत झाले आहेत. याशिवाय १७ हजार १४३ शेतकºयांच्या सहा हजार ८५५ हेक्टर शेतजमिनीवरील खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकºयांसह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या २६ हजार ६४४ हेक्टरच्या शेतकºयांना आता एकाच वेळी भरपाई मिळणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाच्या नुकसानीचाही आढावा घेऊन भरपाईच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील २६ हजार ६४४ हेक्टर भातशेतीला बसला आहे. यापैकी आतापर्यंत २३ हजार ५१५ हेक्टरवरील भातपिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित १३ हजार १२३ हेक्टरवरील पंचनामे कृषी विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

शहापूरमध्ये सर्वाधिक नुकसानअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भातशेतीपैकी शहापूर तालुक्यातील सर्वाधिक सात हजार ९०० हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. यापैकी आतापर्यंत चार हजार ६० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील सात हजार ३५० हेक्टरवरील नुकसानीपैकी तीन हजार ६२० हेक्टरचे पंचनामे गुुरुवारपर्यंत पूर्ण झाले आहेत.

मुरबाड तालुक्यातील सहा हजार ७०० हेक्टरवरील नुकसानीपैकी तीन हजार ४१७ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. तर अंबरनाथमधील दोन हजार ४६० हेक्टरच्या नुकसानीपैकी एक हजार २४८ हेक्टरचे पंचनामे झाले. याप्रमाणेच कल्याण तालुक्यातील दोन हजार १४४ हेक्टरपैकी एक हजार १३४ आणि ठाणे तालुक्यातील ९० हेक्टरपैकी ३६ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.नागली-वरईलाही नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकाºयांना साकडेअवकाळी पावसामुळे भात पिकाबरोबरच नागली, वरईसह अन्य पिकांच्या नुकसानीचीही भरपाई देण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार व कृषी समिती सभापती किशोर जाधव यांनी केली आहे. यंदा मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया गेले आहे. मुरबाड व शहापूरसह भिवंडी तालुक्यात हजारो शेतकºयांचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे.

शेतकºयांना मोठा आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात प्रामुख्याने भाताच्या नुकसानभरपाई प्रमाणेच नागली, वरई व अन्यही खरीप पिकांची नुकसानभरपाई महसूल विभागाने द्यावी, अशी मागणी पवार यांचसह जाधव यांनी जिल्हाधिकाºयांकडे लावून धरली आहे. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षत्रावर पेरणी झाली आहे. त्यात साधारणत: भाताची अंदाजे ५९ हजार २७९ हेक्टरवर लागवड झाली. तर नागलीसाठी दोन हजार २६०हेक्टरवर पेरण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी पुरक उत्पन्न म्हणून वरईचीही लागवड केली आहे. या पिकांना मात्र अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने भाताबरोबरच नागली, वरईचेही तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचा शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस