शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २६,६४४ हेक्टर भातपिकाला बसला फटका; सर्वपक्षीय नेते मात्र सत्तास्थापनेत व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:41 IST

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

सुरेश लोखंडे 

ठाणे : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून बचावलेल्या व हाताशी आलेल्या पिकांचे पुन्हा सध्याच्या अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी तालुक्यांमध्ये या अवकाळी पावसामुळे २६ हजार ६४४ हेक्टरील भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी सत्ता स्थापनेचे राजकीय गणिते जुळवण्यात व्यस्त असताना कृषीयंत्रणा शेतावर जाऊन पंचनामा करत असल्याचे दिसत आहे.

किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या क्यार वादळामुळे सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप वाया गेल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील ५५ हजार २३५ हेक्टर भातशेतीपैकी २६ हजार ६४४ हेक्टर शेतीचे या पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान कृषी विभागाने ३१ आॅक्टोबर अखेर १३ हजार ५१५ हेक्टर शेतीचे पंचनामे केले आहे. तर उर्वरित १३ हजार हेक्टरवरील भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी जिल्ह्यात कृषी यंत्रणा तैनात आहे. अगामी चार दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

२६ व २७ जुलै आणि ४ ते ६ आॅगस्टदरम्यानच्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३९८ गावे बाधीत झाले आहेत. याशिवाय १७ हजार १४३ शेतकºयांच्या सहा हजार ८५५ हेक्टर शेतजमिनीवरील खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकºयांसह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या २६ हजार ६४४ हेक्टरच्या शेतकºयांना आता एकाच वेळी भरपाई मिळणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाच्या नुकसानीचाही आढावा घेऊन भरपाईच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील २६ हजार ६४४ हेक्टर भातशेतीला बसला आहे. यापैकी आतापर्यंत २३ हजार ५१५ हेक्टरवरील भातपिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित १३ हजार १२३ हेक्टरवरील पंचनामे कृषी विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

शहापूरमध्ये सर्वाधिक नुकसानअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भातशेतीपैकी शहापूर तालुक्यातील सर्वाधिक सात हजार ९०० हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. यापैकी आतापर्यंत चार हजार ६० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील सात हजार ३५० हेक्टरवरील नुकसानीपैकी तीन हजार ६२० हेक्टरचे पंचनामे गुुरुवारपर्यंत पूर्ण झाले आहेत.

मुरबाड तालुक्यातील सहा हजार ७०० हेक्टरवरील नुकसानीपैकी तीन हजार ४१७ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. तर अंबरनाथमधील दोन हजार ४६० हेक्टरच्या नुकसानीपैकी एक हजार २४८ हेक्टरचे पंचनामे झाले. याप्रमाणेच कल्याण तालुक्यातील दोन हजार १४४ हेक्टरपैकी एक हजार १३४ आणि ठाणे तालुक्यातील ९० हेक्टरपैकी ३६ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.नागली-वरईलाही नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकाºयांना साकडेअवकाळी पावसामुळे भात पिकाबरोबरच नागली, वरईसह अन्य पिकांच्या नुकसानीचीही भरपाई देण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार व कृषी समिती सभापती किशोर जाधव यांनी केली आहे. यंदा मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया गेले आहे. मुरबाड व शहापूरसह भिवंडी तालुक्यात हजारो शेतकºयांचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे.

शेतकºयांना मोठा आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात प्रामुख्याने भाताच्या नुकसानभरपाई प्रमाणेच नागली, वरई व अन्यही खरीप पिकांची नुकसानभरपाई महसूल विभागाने द्यावी, अशी मागणी पवार यांचसह जाधव यांनी जिल्हाधिकाºयांकडे लावून धरली आहे. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षत्रावर पेरणी झाली आहे. त्यात साधारणत: भाताची अंदाजे ५९ हजार २७९ हेक्टरवर लागवड झाली. तर नागलीसाठी दोन हजार २६०हेक्टरवर पेरण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी पुरक उत्पन्न म्हणून वरईचीही लागवड केली आहे. या पिकांना मात्र अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने भाताबरोबरच नागली, वरईचेही तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचा शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस