शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २६,६४४ हेक्टर भातपिकाला बसला फटका; सर्वपक्षीय नेते मात्र सत्तास्थापनेत व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:41 IST

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

सुरेश लोखंडे 

ठाणे : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून बचावलेल्या व हाताशी आलेल्या पिकांचे पुन्हा सध्याच्या अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी तालुक्यांमध्ये या अवकाळी पावसामुळे २६ हजार ६४४ हेक्टरील भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी सत्ता स्थापनेचे राजकीय गणिते जुळवण्यात व्यस्त असताना कृषीयंत्रणा शेतावर जाऊन पंचनामा करत असल्याचे दिसत आहे.

किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या क्यार वादळामुळे सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप वाया गेल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील ५५ हजार २३५ हेक्टर भातशेतीपैकी २६ हजार ६४४ हेक्टर शेतीचे या पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान कृषी विभागाने ३१ आॅक्टोबर अखेर १३ हजार ५१५ हेक्टर शेतीचे पंचनामे केले आहे. तर उर्वरित १३ हजार हेक्टरवरील भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी जिल्ह्यात कृषी यंत्रणा तैनात आहे. अगामी चार दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

२६ व २७ जुलै आणि ४ ते ६ आॅगस्टदरम्यानच्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३९८ गावे बाधीत झाले आहेत. याशिवाय १७ हजार १४३ शेतकºयांच्या सहा हजार ८५५ हेक्टर शेतजमिनीवरील खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकºयांसह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या २६ हजार ६४४ हेक्टरच्या शेतकºयांना आता एकाच वेळी भरपाई मिळणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाच्या नुकसानीचाही आढावा घेऊन भरपाईच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील २६ हजार ६४४ हेक्टर भातशेतीला बसला आहे. यापैकी आतापर्यंत २३ हजार ५१५ हेक्टरवरील भातपिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित १३ हजार १२३ हेक्टरवरील पंचनामे कृषी विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

शहापूरमध्ये सर्वाधिक नुकसानअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भातशेतीपैकी शहापूर तालुक्यातील सर्वाधिक सात हजार ९०० हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. यापैकी आतापर्यंत चार हजार ६० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील सात हजार ३५० हेक्टरवरील नुकसानीपैकी तीन हजार ६२० हेक्टरचे पंचनामे गुुरुवारपर्यंत पूर्ण झाले आहेत.

मुरबाड तालुक्यातील सहा हजार ७०० हेक्टरवरील नुकसानीपैकी तीन हजार ४१७ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. तर अंबरनाथमधील दोन हजार ४६० हेक्टरच्या नुकसानीपैकी एक हजार २४८ हेक्टरचे पंचनामे झाले. याप्रमाणेच कल्याण तालुक्यातील दोन हजार १४४ हेक्टरपैकी एक हजार १३४ आणि ठाणे तालुक्यातील ९० हेक्टरपैकी ३६ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.नागली-वरईलाही नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकाºयांना साकडेअवकाळी पावसामुळे भात पिकाबरोबरच नागली, वरईसह अन्य पिकांच्या नुकसानीचीही भरपाई देण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार व कृषी समिती सभापती किशोर जाधव यांनी केली आहे. यंदा मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया गेले आहे. मुरबाड व शहापूरसह भिवंडी तालुक्यात हजारो शेतकºयांचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे.

शेतकºयांना मोठा आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात प्रामुख्याने भाताच्या नुकसानभरपाई प्रमाणेच नागली, वरई व अन्यही खरीप पिकांची नुकसानभरपाई महसूल विभागाने द्यावी, अशी मागणी पवार यांचसह जाधव यांनी जिल्हाधिकाºयांकडे लावून धरली आहे. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षत्रावर पेरणी झाली आहे. त्यात साधारणत: भाताची अंदाजे ५९ हजार २७९ हेक्टरवर लागवड झाली. तर नागलीसाठी दोन हजार २६०हेक्टरवर पेरण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी पुरक उत्पन्न म्हणून वरईचीही लागवड केली आहे. या पिकांना मात्र अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने भाताबरोबरच नागली, वरईचेही तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचा शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस