शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शिवसेनेचे 35 आमदार नाखूश! मनसेबाबत बाळगले मौन; नारायण राणेंनी घेतला ठाकरेंचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 18:23 IST

ठाण्यातील वर्तकनगर येथील 22 व्या मालवणी महोत्सवास शनिवारी रात्री भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठाणे : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे 54 पैकी 35 आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत बोलण्यास नकार देऊन यावर पक्षाचे प्रमुखच बोलतील, असेही ते म्हणाले.

ठाण्यातील वर्तकनगर येथील 22 व्या मालवणी महोत्सवास शनिवारी रात्री भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे पितापुत्रावर टीका केली. या सरकारने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा करून जो शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे, त्यात अंतिम तारखेचा उल्लेख नाही. यामुळे ती कधी मिळेल, हे सांगता येत नाही. तसेच भाजप कोणाकडे गेला नव्हता, तर शिवसेना स्वत: त्यांच्याकडे आली होती. भाजप केंद्रात सत्तेत असून महाराष्ट्रातदेखील सर्वाधिक आमदार आहेत. यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही, असेही राणे म्हणाले.

आदित्य यांनी आधी मंत्र्याची जबाबदारी पार पाडावी या सरकारला गांभीर्य नाही. प्रशासन काय असते, विकास कसा करायचा, हे ठाऊक नसलेल्या माणसाच्या हातात सत्ता गेली असून त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची, असे ते म्हणाले. या सरकारला दोन महिने मंत्रिमंडळ जाहीर करायला लागले, असा आरोपही राणे यांनी केला. तर, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ट्विटबाबत विचारणा केल्यावर त्यांनी शिकवायची गरज नाही, भाजपमध्ये शिकलेले लोक आहेत. त्यांना कायदा काय, हे माहीत आहे. जी मंत्र्याची जबाबदारी आहे, ती त्यांनी आधी पार पाडावी. जबाबदारीबाबत काय कळते, हे आधी बघावे. नंतरच, भाजपविषयी बोलावे, अशा शब्दांत राणे यांनी आदित्य यांचा समाचार घेतला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसे