शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर २२ टक्के पाणी कपातीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 6:53 PM

बारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणी कपातीचा सक्तीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला.

ठळक मुद्देबारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणा-या आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणा-या पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूटएमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींव्दारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणी पुरवठापाणी पुरवठ्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणी बचत

ठाणे : ठाणेच्या मुंब्रा - कळवा या भागासह जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून २२ टक्के पाणी कपात आठवड्याभरात करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यामुळे आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठिकठिकाणी होणारा पाणी पुरवठा एक दिवसपूर्ण बंद ठेवण्याची सक्ती आता लागू झाली आहे.बारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणा-या आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणा-या पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणी कपातीचा सक्तीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींव्दारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणी पुरवठा होतो. या पाणी पुरवठ्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणी बचत करायची आहे. यामुळे महापालिकांनी एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून ही सक्तीची पाणी कपात लागू झाली आहे. यानुसार बारवी धरणासह उल्हासनदीतून पाणी उचलणा-या एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणी पुरवठा आता शुक्रवारी या एक दिवसा करीता बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यामुळे एमआयडीसीकडून सुमारे ५८३ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे.याप्रमाणेच कल्याण - डोंबिवलीचा २३४ एलएलडी पाणी पुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर स्टेमव्दारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणी पुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. यामुळे स्टेमव्दारे करण्यात येणारा पाणी पुरवठा ठाणेच्या घोडबंदरसह शहरातील काही भागांसह भिवंडी मनपासह मीरा भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील गावखे्यांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. याशिवाय अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणी पुरवठा करणारे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ९० एमएलडी पाणी बचत एमजेपीकडून बचत होणार आहे. या पाणी कपातीमुळे बचत होणारे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.जिल्ह्यात सक्तीने लागू केलेली २२ टक्के पाणी कपात आगामी दिवाळी, ईद आदी सणासुदीच्या काळात मात्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे सणातिवाराच्या कालावधीत मात्र मनसोक्त नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. धरणातील पाण्यातील तूट लक्षात घेऊन गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधी ही सक्तीची पाणी कपात लागू करावी लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून १४ टक्के कपात लागू केली होती . मात्र फेब्रुवारी , मार्चला ती ७ टक्के केली होती. त्यानंतर ती रद्द केली होती. पण आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघूपाटबंधारे विभागाने सक्तीचे २२ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकांसह एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदींना तो सक्तीने पाळावा लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणेwater shortageपाणीटंचाई