शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

१२ तासांत लिहिल्या २०७ कविता; दिनेश गुप्ता यांची अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:54 IST

गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.

कल्याण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश हळहळला. ही हळहळ एखाद्या कविमनाला कशी हेलावून टाकते, त्याच्यातील संवेदनशील मन कसे काय त्याला बोलते करते, याचा उत्तम प्रत्यय प्रा. दिनेश गुप्ता यांच्या रूपाने आला. गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘काव्यलेखनाची काव्यमय श्रद्धांजली’ या कार्यक्रमांतर्गत गुप्ता यांनी हा विक्रम केला आहे. अटलजी कवी असल्याने त्यांना समर्पक व साजेशी ही आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी यांच्या कविता प्रेरणादायी व आशादायी विश्वास निर्माण करणाऱ्या होत्या. अटलजींच्या ‘हार नही मानूंगा’ व ‘विश्वासअटल’ या कवितेतील काही शब्दांमुळे गुप्ता यांना प्रेरणा मिळाली. त्यातून त्यांनी २०७ कविता रचल्या. कविता करताना एखादा विषय घेऊन कविता न करता समोर येईल तो विषय, असे मानून त्यांनी कविता केल्या. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत काम करणारी व्यक्ती समोर आली, तरी त्यांनी त्याच्यावर कविता रचली. या विक्रमासाठी कोणतीही पूर्वतयारी गुप्ता यांनी केली नव्हती. यापूर्वी त्यांनी ९ आॅगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ८० कविता लिहिल्या होत्या. हा अनुभव गाठीशी असल्याने १२ तासांचा काव्यलेखनाचा प्रपंच करण्याचा त्यांचा मानस होता. तो त्यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात आणला.गुप्ता यांच्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा विक्रम नोंदवण्यासाठी या रेकार्डचे अधिकारी आलोककुमार सार्वजनिक वाचनालयात आले होते. गुप्ता यांना त्यांनी गोल्डन बुक आॅफ रेकार्डचे प्रमाणपत्र बहाल केले.‘अटलविश्वास’ प्रकाशित करण्याचा मानसगुप्ता हे ४० वर्षांपासून कविता लिहित आहेत. २०७ कविता लिहिताना गुप्ता यांनी केवळ १५ मिनिटांचा ब्रेक घेतला. या कविता ‘अटलविश्वास’ या काव्यसंग्रहाच्या नावाने प्रकाशित केल्या जाणार आहेत. त्याला प्रकाशक मिळताच त्याचे प्रकाशन यथोचित समारंभात केले जाईल, असे गुप्ता यांनी त्यावेळी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यू