शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

१२ तासांत लिहिल्या २०७ कविता; दिनेश गुप्ता यांची अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:54 IST

गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.

कल्याण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश हळहळला. ही हळहळ एखाद्या कविमनाला कशी हेलावून टाकते, त्याच्यातील संवेदनशील मन कसे काय त्याला बोलते करते, याचा उत्तम प्रत्यय प्रा. दिनेश गुप्ता यांच्या रूपाने आला. गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘काव्यलेखनाची काव्यमय श्रद्धांजली’ या कार्यक्रमांतर्गत गुप्ता यांनी हा विक्रम केला आहे. अटलजी कवी असल्याने त्यांना समर्पक व साजेशी ही आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी यांच्या कविता प्रेरणादायी व आशादायी विश्वास निर्माण करणाऱ्या होत्या. अटलजींच्या ‘हार नही मानूंगा’ व ‘विश्वासअटल’ या कवितेतील काही शब्दांमुळे गुप्ता यांना प्रेरणा मिळाली. त्यातून त्यांनी २०७ कविता रचल्या. कविता करताना एखादा विषय घेऊन कविता न करता समोर येईल तो विषय, असे मानून त्यांनी कविता केल्या. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत काम करणारी व्यक्ती समोर आली, तरी त्यांनी त्याच्यावर कविता रचली. या विक्रमासाठी कोणतीही पूर्वतयारी गुप्ता यांनी केली नव्हती. यापूर्वी त्यांनी ९ आॅगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ८० कविता लिहिल्या होत्या. हा अनुभव गाठीशी असल्याने १२ तासांचा काव्यलेखनाचा प्रपंच करण्याचा त्यांचा मानस होता. तो त्यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात आणला.गुप्ता यांच्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा विक्रम नोंदवण्यासाठी या रेकार्डचे अधिकारी आलोककुमार सार्वजनिक वाचनालयात आले होते. गुप्ता यांना त्यांनी गोल्डन बुक आॅफ रेकार्डचे प्रमाणपत्र बहाल केले.‘अटलविश्वास’ प्रकाशित करण्याचा मानसगुप्ता हे ४० वर्षांपासून कविता लिहित आहेत. २०७ कविता लिहिताना गुप्ता यांनी केवळ १५ मिनिटांचा ब्रेक घेतला. या कविता ‘अटलविश्वास’ या काव्यसंग्रहाच्या नावाने प्रकाशित केल्या जाणार आहेत. त्याला प्रकाशक मिळताच त्याचे प्रकाशन यथोचित समारंभात केले जाईल, असे गुप्ता यांनी त्यावेळी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यू