शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

३४ कोटींची नुकसानभरपाई; ७७ हजार शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:33 PM

नुकसानीच्या तुलनेत भरपाई कमी असल्याने बळीराजा नाराज

- सुरेश लोखंडेठाणे : अवेळी पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतातील मालाचे नुकसान झाले असून, त्यापोटी सुमारे ३४ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे ही भरपाई देण्याचा निर्णय सध्याच्या राष्ट्रपती राजवटीतील प्रशासनाने घेतला. या नुकसानभरपाईचा लाभ जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, ही भरपाई फारच कमी असल्याचा सूर जिल्ह्यातील शेतकºयांमधून उमटत आहे.‘शेतकरी २९ कोटींच्या भरपाईच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली लोकमतने १५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून शेतकºयांच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने जिल्ह्यातील ७७ हजार शेतकºयांच्या ४२ हजार ४२६ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांचा निकष निश्चित केला होता. त्यानुसार, २८ कोटी ८४ लाख ९९ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यामार्फत कृषी विभागाने शासनास दिला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकºयांना ३३ कोटी ९४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या भरपाईची रक्कम महसूल विभागाद्वारे वाटप होणार की, थेट शेतकºयांच्या खात्यात जमा होणार, याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही.अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे प्रशासनाने युद्धपातळीवर केले. मात्र, भरपाई लागू करण्याचा निर्णय गुलदस्त्यात होता. राष्टÑपती राजवटीमुळे यास विलंब होत असल्याने शेतकºयांमध्ये संताप होता. अखेर, शनिवारी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाईच्या जुन्या अध्यादेशात एक हजार २०० रुपयांची वाढ करून हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे शेतकºयांना भरपाई लागू झाली आहे. या नुकसानभरपाईच्या वाटपाबाबत मार्गदर्शक सूचना आलेल्या नाही. कदाचित, सोमवारपर्यंत त्या येतील. जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टरवरील पंचनामे झालेले आहे. भरपाईची रक्कम बँकेत जमा होण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली.हेक्टरी २०/२५ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत होऊन भरीव नुकसानभरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ एक हजार २०० रुपयांची वाढ झाल्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यातील भातपिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ३३ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये शेतकºयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागलीच्या १२७ हेक्टरवरील नुकसानीसाठी १० लाख १६ हजार आणि वरी पिकाच्या ३७ हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन लाख ९६ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे.सर्वाधिक भरपाई भिवंडी तालुक्यालाभिवंडी तालुक्यातील सर्वाधिक १९ हजार ४५० शेतकºयांचे नुकसान झाले. त्यांच्या १५ हजार ६८० हेक्टरवरील पिकास १२ कोटी ५४ लाख ४० हजारांची भरपाई अपेक्षित आहे. शहापूर तालुक्यातील ११ हजार ७७६.६७ हेक्टरवरील नुकसान झालेल्या २४ हजार १९० शेतकºयांना नऊ कोटी ४२ लाख १३ हजार रुपये, तर मुरबाड तालुक्यातील १८ हजार ७२६ शेतकºयांना १० हजार २४९ हेक्टरवरील पिकांसाठी आठ कोटी १९ लाख ९२ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळणे शक्य आहे. कल्याण तालुक्यातील सात हजार ६५ शेतकºयांना एक हजार ५७९ हेक्टरच्या नुकसानीपोटी एक कोटी २६ लाख ३२ हजार रुपये, तर अंबरनाथ तालुक्यातील सात हजार शेतकºयांना दोन हजार ९५० हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन कोटी ३६ लाख रुपये आणि ठाणे तालुक्यामधील ६९७ शेतकºयांना १९१.६० हेक्टरकरिता १५ लाख ३२ हजार रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.