शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

१८ गावपाडे अजूनही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:41 AM

आज अनेक गावपाड्यांत वीज पोहोचली असली, तरी अनेक पाडे असे आहेत की, त्यांना अद्याप वीज नाही वा रस्तादेखील नाही. मात्र, त्याला कारणेही तशीच आहेत. दूरवर डोंगरदऱ्यांत या पाड्यांची अगदी बोटांवर मोजता येतील, इतकी घरे आहेत.

भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक पाडे आजही अंधारात आहेत. त्यामुळे आम्हाला वीज कधी मिळणार, असा प्रश्न या पाड्यांमधील लोकांना पडला आहे.

आज अनेक गावपाड्यांत वीज पोहोचली असली, तरी अनेक पाडे असे आहेत की, त्यांना अद्याप वीज नाही वा रस्तादेखील नाही. मात्र, त्याला कारणेही तशीच आहेत. दूरवर डोंगरदऱ्यांत या पाड्यांची अगदी बोटांवर मोजता येतील, इतकी घरे आहेत. या पाड्यांना वीज देण्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने अनेक अडचणी आहेत. त्यातही मालकी हक्काच्या जागेतून पोल टाकण्यात येणाºया अडचणी, मोठ्या प्रमाणात असणारे जंगल, वनविभागाचे अडथळे, अशा अनेक अडचणींवर मात करून गेल्या वर्षी ३८ असणारी संख्या आज १८ वर आली आहे.

उर्वरित पाडे विजेपासून वंचित असून या पाड्यांना लवकरात लवकर वीज मिळावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. सध्या तालुक्यात पर्काचापाडा, तरीचापाडा, बोरीचामाळ, तलवाडा, शिसवली, चराचापाडा, कोशिंबळे, दापूर, साखरपाडा, मसनेपाडा, वर्ध्याचापाडा, चराचापाडा, गरलेपाडा, सावरखुंट, खरमेपाडा, मोंडूलपाडा, शेंद्रूणमधील कातकरीवाडी, चौधरपाडा, सावरदेव, कासगाव या १८ पाड्यांना वीज नाही. मात्र, यापैकी सद्य:स्थितीत पर्काचापाडा, तरीचापाडा, साखरपाडा, सावरदेव या पाड्यांतील काम प्रगतीपथावर असून सावरदेव या पाड्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित पाड्यांना लवकरात लवकर वीज देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून येत्या काही दिवसांत त्यांचाही विजेचा प्रश्न सुटणार असल्याचे शहापूरचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

तालुक्यात सध्या नवीन एक हजार ७५३ नवीन जोडण्या देणे असून पाच हजार ८०० मीटर हे फॉल्टी असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय, दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाºयांना मोफत सहा वीज मीटर देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.

टॅग्स :electricityवीज