शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

‘दिव्या’ची १८ तास ‘बत्ती गुल’, महावितरणची पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:21 AM

कल्याण फाटा ते खिडकाळी या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत केबल वाहिनी तुटल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारी पहाट उजाडली.

ठाणे : कल्याण फाटा ते खिडकाळी या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत केबल वाहिनी तुटल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारी पहाट उजाडली. त्यामुळे जवळपास १८ तास दिव्यातील काही भागांची बत्तीगुल झाली होती. पंधरा दिवसांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, विद्युत वाहिनी तोडल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, एकीक डे लोडशेडिंगची टांगती तलवार दिव्यातील नागरिकांवर असताना, मागील पंधरा दिवसांत दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैैराण झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून दिव्यात सकाळी साडेचार तास आणि सायंकाळी अडीच तास असे दिवसातून सात तासांचे लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यातच शनिवारी सकाळी दहा वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. लोडशेडिंगमुळे वीजपुरवठा खंडित झालेला असावा, असे प्रारंभी नागरिकांनी गृहीत धरले. मात्र, सायंकाळची रात्र झाली तरी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक हैैराण झाले.दरम्यान, कल्याणफाटा ते खिडकाळी येथे एमएसआरडीसीमार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी वापरण्यात येणाºया जेसीबीमुळे भूमिगत विद्युत वाहिनी तुटल्याचे समोर आले. तुटलेल्या केबलचे काम पूर्ण होईपर्यंत रविवारी पहाटेचे चार वाजले. त्यामुळे सायंकाळचे अडीच तासांचे लोडशेडिंग रद्द करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.मागील पंधरा दिवसांत एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दोन वेळा विद्युत केबल वाहिनी तोडण्यात आली आहे. केबल वाहिनी तोडल्याप्रकरणी शनिवारी शीळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे महावितरण अधिकाºयांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ती दखलपात्र गुन्ह्यामध्ये वळती करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र अशा घटनांमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.लोडशेडिंगबाबत दिव्यातील नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊनही दुर्लक्ष केले जाते. दिव्यातून जेवढी वसुली केली जाते, तेवढ्या प्रमाणात सुविधा मिळत नाही. दिव्यात वीजचोरीचे प्रमाण प्रचंड आहे. ते रोखण्यात महावितरणला यश आले तर, लोडशेडिंगची गरजच भासणार नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुंढे यांनी दिली.>या भागात होता अंधारदिव्यातील गणेशनगर, मुंब्रा कॉलनी, विकास म्हात्रे गेट, धर्मवीरनगर, वक्रतुंडनगर, सिद्धिविनायक नगर, सुदाम रिजेन्सी आणि खर्डीपासून शीळ गाव आदी भागात जवळपास १८ तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी केले जाणारे अडीच तासांचे लोडशेडिंग रद्द करण्यात आले.