शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

१,७७७ कुपोषितांना मुसळधार पावसाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 6:40 AM

ठाणे जिल्ह्यात तीव्र कमी वजनासह मध्यम वजनाची १० हजार ७६४ बालके कुपोषित आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या एक हजार ७७७ कुपोषित बालकांच्या जीवितास संभाव्य मुसळधार पावसात धोका संभवण्याची शक्यता आहे.

- सुरेश लोखंडेठाणे -  जिल्ह्यात तीव्र कमी वजनासह मध्यम वजनाची १० हजार ७६४ बालके कुपोषित आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या एक हजार ७७७ कुपोषित बालकांच्या जीवितास संभाव्य मुसळधार पावसात धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी वेळीच पावसाळी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.मध्यम व कमी वजनाच्या १० हजार ७६४ कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. मात्र, जिल्ह्यात सद्य:स्थितीला कुपोषित बालकांसाठी कोणतीही उपाययोजना हाती घेतलेली नसल्याची चिंता सामाजिक संघटनांकडून होत आहे. आरोग्य विभागाकडून औषधोपचार होत असल्याचे आढळून आले. मध्यम व तीव्र कमी वजनाच्या बालकांना संभाव्य मुसळधार पावसाच्या कालावधीत पोषण व पोषक आहाराअभावी धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आदिवासी दुर्गम भागतील सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात सहा वर्षे वयोगटांपर्यंतचे एक लाख ३० हजार बालके आहेत. यापैकी एक लाख ११ हजार ८३४ बालकांचे वजन घेऊन त्यातील सुदृढ म्हणजे सर्वसाधारण एक लाख एक हजार ७० बालके आढळून आली. मात्र, मध्यम कमी वजनाची आठ हजार ९८७ बालकांसह तीव्र कमी वजनांची एक हजार ७७७ बालके कुपोषणाची आहेत. यातील या एक हजार ७७७ बालकांच्या जीवितास पोषक आहाराअभावी धोका संभवतो. यंदा सर्वाधिक काळ मुसळधार पावसाचा असल्याची शक्यता आहे. यादरम्यान दुर्गम, आदिवासी भागात रोजगार समस्या तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कुपोषित बालकांकडे आदिवासी मातापित्याचे दुर्लक्ष होऊन ते मृत्यूच्या चक्रव्यूहात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कुपोषित बालकांमध्ये एक हजार ७७७ तीव्र बालकांप्रमाणेच १३५ दुर्धर आजारांच्या बालकांना या पावसाळ्यात मरणयातना भोगाव्या लागण्याची दाट शक्यता आहे.जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग आणि आदिवासी-दुर्गम भागाचे दायित्व स्वीकारलेल्या आदिवासी विकास विभागाने या कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी वेळीच उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.या बालकांच्या पालकांना उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातदेखील कामांची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. पोषक असलेल्या पोषण आहाराची खास व्यवस्था गरजेची आहे. शिवाय, कुपोषण औषधोपचार पथक तैनात करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.याआधी दिल्या जाणाऱ्या खावटी कर्जाच्या स्वरूपातील आर्थिक मदतीप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा या कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांना होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यRainपाऊस