शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भार्इंदरमध्ये साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ आॅक्टोबरला आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 18:29 IST

साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ आॅक्टोबरला आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई भक्त मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे यांनी बुधवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

भार्इंदर : शिर्डीच्या साईबाबांच्या महासमाधीचे यंदा शताब्दी वर्ष साजरे केले जात असून मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील साईभक्तांना साईबाबांचे दर्शन घेता यावे, याकरीता श्री सिद्धी विनायक न्यास, मुंबई व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने श्री साई भक्त मंडळाच्या वतीने भार्इंदर येथील जेसलपार्क चौपाटी मैदानात श्री साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ आॅक्टोबरला आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई भक्त मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे यांनी बुधवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

यावेळी मंडळाचे सहसचिव संदेश जाधव, सदस्य अशोक मुळे उपस्थित होते. यापुर्वी हे संमेलन मुंबईतील वरळीच्या जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आले होते. यंदा साईबाबांच्या समाधीचा शतकमहोत्सव शिर्डीला साजरा केला जात असताना त्यांच्या दर्शनासाठी देशभरातुन येणा-या भाविकांची शिर्डीला प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे भक्तांना साईबाबांचे दर्शन काही अंतरावरुन मिळत असल्याने त्यांना प्रत्यक्ष मुर्तीच्या जवळ जाऊन त्यांचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी पसरत असल्याने भक्तांच्या सोईसाठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी साईबाबांच्या मुर्तीसह त्यांच्या पादुकांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. संमेलनाच्या सुरुवातीला सकाळी ७ वाजता साईबाबांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे याच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता होमहवन व धुनीपुजन , सकाळी ९ वाजता १०० जोडप्यांकडुन महाभिषेक करण्यात येणार आहे. तद्नंतर सकाळी ११ वाजता राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महंतपीर भाईदास महाराज, आ. आदेश बांदेकर, आ. हितेंद्र ठाकूर, आ. आशिष शेलार, आ. नरेंद्र मेहता, आ. संजय केळकर, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर आदींच्या उपस्थितीत शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ११.४५ वाजता श्री साईनाथ स्तवन मंजिरी पठण मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद आप्पा तर मध्यान्ह आरती माजी मंत्री सुनिल तटकरे, सचिन अहिर, आ. क्षितिज ठाकूर आदींच्या हस्ते केली जाणार आहे. त्यानंतर श्री साईचरित ग्रंथाचे ११ पोथ्यांचे २४ तासांचे अखंड पारायण, साई भंडारा, श्री साई पालखी व रथाची मिरवणुक आदींचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. संमेलनात साईबाबांसोबत राहिलेले काका दिक्षितांचे नातू अनिल दिक्षित, गोपाळराव बुट्टींचे नातू सुभाष बुट्टी, कृष्णराव भीष्मांचे नातू प्रमोद भीष्म आदी मान्यवर विशेष निमंत्रित म्हणुन उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी मध्यान्ह आरती पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील शेकडो साईभक्तांच्या पालख्या संमेलनात आणल्या जाणार असुन साईदर्शनासाठी येणा-या हजारो भक्तांची संख्या व त्यांच्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन संमेलनात विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कांगणे यांनी पत्रपरिषदेत दिली. 

टॅग्स :thaneठाणे