शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भार्इंदरमध्ये साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ आॅक्टोबरला आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 18:29 IST

साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ आॅक्टोबरला आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई भक्त मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे यांनी बुधवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

भार्इंदर : शिर्डीच्या साईबाबांच्या महासमाधीचे यंदा शताब्दी वर्ष साजरे केले जात असून मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील साईभक्तांना साईबाबांचे दर्शन घेता यावे, याकरीता श्री सिद्धी विनायक न्यास, मुंबई व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने श्री साई भक्त मंडळाच्या वतीने भार्इंदर येथील जेसलपार्क चौपाटी मैदानात श्री साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ आॅक्टोबरला आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई भक्त मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे यांनी बुधवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

यावेळी मंडळाचे सहसचिव संदेश जाधव, सदस्य अशोक मुळे उपस्थित होते. यापुर्वी हे संमेलन मुंबईतील वरळीच्या जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आले होते. यंदा साईबाबांच्या समाधीचा शतकमहोत्सव शिर्डीला साजरा केला जात असताना त्यांच्या दर्शनासाठी देशभरातुन येणा-या भाविकांची शिर्डीला प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे भक्तांना साईबाबांचे दर्शन काही अंतरावरुन मिळत असल्याने त्यांना प्रत्यक्ष मुर्तीच्या जवळ जाऊन त्यांचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी पसरत असल्याने भक्तांच्या सोईसाठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी साईबाबांच्या मुर्तीसह त्यांच्या पादुकांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. संमेलनाच्या सुरुवातीला सकाळी ७ वाजता साईबाबांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे याच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता होमहवन व धुनीपुजन , सकाळी ९ वाजता १०० जोडप्यांकडुन महाभिषेक करण्यात येणार आहे. तद्नंतर सकाळी ११ वाजता राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महंतपीर भाईदास महाराज, आ. आदेश बांदेकर, आ. हितेंद्र ठाकूर, आ. आशिष शेलार, आ. नरेंद्र मेहता, आ. संजय केळकर, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर आदींच्या उपस्थितीत शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ११.४५ वाजता श्री साईनाथ स्तवन मंजिरी पठण मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद आप्पा तर मध्यान्ह आरती माजी मंत्री सुनिल तटकरे, सचिन अहिर, आ. क्षितिज ठाकूर आदींच्या हस्ते केली जाणार आहे. त्यानंतर श्री साईचरित ग्रंथाचे ११ पोथ्यांचे २४ तासांचे अखंड पारायण, साई भंडारा, श्री साई पालखी व रथाची मिरवणुक आदींचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. संमेलनात साईबाबांसोबत राहिलेले काका दिक्षितांचे नातू अनिल दिक्षित, गोपाळराव बुट्टींचे नातू सुभाष बुट्टी, कृष्णराव भीष्मांचे नातू प्रमोद भीष्म आदी मान्यवर विशेष निमंत्रित म्हणुन उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी मध्यान्ह आरती पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील शेकडो साईभक्तांच्या पालख्या संमेलनात आणल्या जाणार असुन साईदर्शनासाठी येणा-या हजारो भक्तांची संख्या व त्यांच्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन संमेलनात विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कांगणे यांनी पत्रपरिषदेत दिली. 

टॅग्स :thaneठाणे