शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

भातसाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात; शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:03 IST

ठाणे : काही दिवसांपासून सुरू असलेल्या ५० टक्के पाणीकपातीमुळे घोडबंदर, वर्तकनगरसह इतर भागात रटॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, आता ...

ठाणे : काही दिवसांपासून सुरू असलेल्या ५० टक्के पाणीकपातीमुळे घोडबंदर, वर्तकनगरसह इतर भागात रटॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, आता जलसंपदा विभागाने ही टंचाई दूर करण्यासाठी भातसा धरणाच्या दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडले आहे. मात्र, भातसाची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत आता पुढील काही दिवस ठाणेकरांना अवघ्या १० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता महापालिकेने पाण्याचे विभागवार केलेले नियोजन देखील रद्द करून पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठ्यास सुरुवात केली आहे.

भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणीपुरवठा होत आहे. महापालिका हद्दीत रोज ४८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यापैकी २०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून करण्यात येतो. त्यासाठी महापालिका भातसा धरणाच्या पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते. मात्र, भातसाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने महापालिकेच्या योजनेतून शहराला ५० टक्के कमी पाणी मिळत आहे. दररोज दोनशेऐवजी शंभर दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्यामुळे ठाणेकरांचे मागील आठवडाभरापासून हाल सुरू आहेत.

शहरातील घोडबंदर, वर्तकनगर भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर काही भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. परंतु, टॅंकरचे भावही या काळात काहीसे वधारल्याचे आहेत. हीच बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने भातसा धरणाच्या बिघडलेल्या दरवाजाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पिसे बंधाऱ्यातून दररोज ९० टक्के म्हणजेच १८० दशलक्ष लिटर इतके पाणी उचलणे शक्य होत आहे. दरम्यान, दरवाजा दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर सुरू असून ते काम होताच पालिकेला पूर्वीप्रमाणोच २०० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

टॅग्स :WaterपाणीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका