शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

चीन भारताचा पाऊस चोरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:53 AM

विमान वा आर्टिलरी गनच्या मदतीने ह्या ढगांवरती सिल्व्हर आयोडाइड आणि कोरड्या बर्फाचा मारा केला जातो.

‘क्लाउड सीडिंग’ अर्थात ‘कृत्रिम पाऊस’. म्हणजे ‘तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडला जातो’. देशाच्या एखाद्या भागात  दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाली की, ह्या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला लागतात. मात्र आजही आपल्या देशाने ह्या तंत्रज्ञावरती म्हणावी तशी हुकमत प्राप्त केलेली नाही.  

विमान वा आर्टिलरी गनच्या मदतीने ह्या ढगांवरती सिल्व्हर आयोडाइड आणि कोरड्या बर्फाचा मारा केला जातो आणि पाऊस पडण्यासाठी आवश्यक त्या हवामानाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. चीनने यात चांगलीच आघाडी घेतली आहे.  जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये बीजिंगची गणना होते. बरेचदा तर सूर्यप्रकाशदेखील जमिनीवरती पोहोचत नाही. मात्र जेव्हा जेव्हा ह्या शहरात एखादा जागतिक इव्हेंट  असतो, तेव्हा तेव्हा मात्र बीजिंगचे हवामान जादू व्हावी तसे बदलून जाते.

आकाश एकदम निरभ्र आणि स्वच्छ बनते.  ह्यामागे जादू नसते, तर असते चीनचे हवामानात बदल करण्याचे तंत्रज्ञान. ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून चीन एका विशिष्ट क्षेत्राच्या हवामानात आपल्याला हवा तसा बदल घडवून आणतो.  चिंतेची गोष्ट ही की, बीजिंगपुरत्या मर्यादित असलेल्या ह्या तंत्रज्ञानाचा प्रयोग आता देशभर करण्याचे चीनने ठरविले आहे. चीनचे एकूण क्षेत्रफळ, त्याच्या विविध देशांशी जोडल्या गेलेल्या सीमा बघता, ह्या प्रयोगाचे परिणाम अनेक देशांवरती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीन ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या भारतातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या चीनने २०२५ सालापर्यंत आपल्या ५५ लाख वर्गकिमी भागासाठी कृत्रिम पाऊस व बर्फ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा भाग एकूण चीनच्या ६०% तर भारताच्या आकारमानाच्या दीडपट मोठा आहे. चीन ह्या ‘क्लाउड सीडिंग’च्या मदतीने  देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे करण्यात चीनला यश आल्यास, एकूणच हवामानात अत्यंत विचित्र बदल घडून, चीनच्या शेजारील अनेक देशांमध्ये  पाऊसच न पडण्याचा धोका उत्पन्न होणार आहे. तैवान युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या मते तर, चीन ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारील देशांचा पाऊसच पळवण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत