शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

चीन भारताचा पाऊस चोरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:53 IST

विमान वा आर्टिलरी गनच्या मदतीने ह्या ढगांवरती सिल्व्हर आयोडाइड आणि कोरड्या बर्फाचा मारा केला जातो.

‘क्लाउड सीडिंग’ अर्थात ‘कृत्रिम पाऊस’. म्हणजे ‘तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडला जातो’. देशाच्या एखाद्या भागात  दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाली की, ह्या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला लागतात. मात्र आजही आपल्या देशाने ह्या तंत्रज्ञावरती म्हणावी तशी हुकमत प्राप्त केलेली नाही.  

विमान वा आर्टिलरी गनच्या मदतीने ह्या ढगांवरती सिल्व्हर आयोडाइड आणि कोरड्या बर्फाचा मारा केला जातो आणि पाऊस पडण्यासाठी आवश्यक त्या हवामानाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. चीनने यात चांगलीच आघाडी घेतली आहे.  जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये बीजिंगची गणना होते. बरेचदा तर सूर्यप्रकाशदेखील जमिनीवरती पोहोचत नाही. मात्र जेव्हा जेव्हा ह्या शहरात एखादा जागतिक इव्हेंट  असतो, तेव्हा तेव्हा मात्र बीजिंगचे हवामान जादू व्हावी तसे बदलून जाते.

आकाश एकदम निरभ्र आणि स्वच्छ बनते.  ह्यामागे जादू नसते, तर असते चीनचे हवामानात बदल करण्याचे तंत्रज्ञान. ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून चीन एका विशिष्ट क्षेत्राच्या हवामानात आपल्याला हवा तसा बदल घडवून आणतो.  चिंतेची गोष्ट ही की, बीजिंगपुरत्या मर्यादित असलेल्या ह्या तंत्रज्ञानाचा प्रयोग आता देशभर करण्याचे चीनने ठरविले आहे. चीनचे एकूण क्षेत्रफळ, त्याच्या विविध देशांशी जोडल्या गेलेल्या सीमा बघता, ह्या प्रयोगाचे परिणाम अनेक देशांवरती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीन ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या भारतातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या चीनने २०२५ सालापर्यंत आपल्या ५५ लाख वर्गकिमी भागासाठी कृत्रिम पाऊस व बर्फ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा भाग एकूण चीनच्या ६०% तर भारताच्या आकारमानाच्या दीडपट मोठा आहे. चीन ह्या ‘क्लाउड सीडिंग’च्या मदतीने  देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे करण्यात चीनला यश आल्यास, एकूणच हवामानात अत्यंत विचित्र बदल घडून, चीनच्या शेजारील अनेक देशांमध्ये  पाऊसच न पडण्याचा धोका उत्पन्न होणार आहे. तैवान युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या मते तर, चीन ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारील देशांचा पाऊसच पळवण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत