शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

एआय पडेल का भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 07:20 IST

मुद्द्याची गोष्ट : सध्या एआयबाबत वेगवेगळे सर्व्हे केले जात आहेत. या अभ्यासांत थेट कर्मचाऱ्यांना सामील करून घेतले जात आहे. एआय माणसालाच हद्दपार करणार का, इथपर्यंत प्रश्न उपस्थित होत असताना एका अभ्यासात एआय कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाही, असा निष्कर्ष निघाला आहे.

मुद्द्याची गोष्ट : सध्या एआयबाबत वेगवेगळे सर्व्हे केले जात आहेत. या अभ्यासांत थेट कर्मचाऱ्यांना सामील करून घेतले जात आहे. एआय माणसालाच हद्दपार करणार का, इथपर्यंत प्रश्न उपस्थित होत असताना एका अभ्यासात एआय कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाही, असा निष्कर्ष निघाला आहे.

पसीक’ या चिनी एआय चॅटबॉटने पदार्पणातच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करीत असलेल्या चॅटजीपीटीसारख्या दिग्गज खेळाडूंची विकेट काढली. अत्यंत कमी खर्चात तयार झालेल्या या एआय तंत्रामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराने मोठा आपटी खाल्ली. टॉपच्या कंपन्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ही तर फक्त एक झलक आहे. एआय तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात असे कित्येक धक्कादायक प्रसंग येऊ शकतात. जितके विस्मयकारक परिणाम एआयच्या येण्याने दिसू लागले आहेत, तितकेच कंपन्यांच्या स्पर्धेतूनही दिसू लागतील, हे तितकेच खरे. ‘डीपसीक’च्या आगमनामुळे एआय क्षेत्राची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

कोणत्याही क्षेत्रात काम करताना काही मानवी कौशल्ये अत्यंत महत्त्वाची असतात. नैतिक मूल्यांवर आधारित निर्णय क्षमता, माणसांचा संग्रह आणि संबंधांची जपणूक, बुद्धिमत्तेला भावनांचा स्पर्श असणे आणि सहानुभूतीची जाणीव ही ती कौशल्ये होत. आजच्या काळात ही काैशल्ये महत्त्वाची आहेतच, पण पुढे येऊ घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) बोलबाला असलेल्या काळातदेखील ही कौशल्ये तितकीच महत्त्वाची असतील. एआयच्या काळात तर व्यक्तिगत स्तरावर नव्याचा स्वीकार आणि सर्जनशीलता ही काैशल्ये असणे खूप आवश्यक असेल.

सर्जनशीलता, नेतृत्त्व, शिकण्याची लालसा, विश्वास आणि परस्पर सहकार्य ही मानवाची पाच प्रमुख तत्त्वे आहेत. या तत्त्वांवरच आगामी एआयच्या काळात उद्योग-व्यवसाय आणि तेथे काम करणारे लोक टिकाव धरू शकणार आहेत. सध्या काळाची पावले ओळखून जे लोक एआयचा अर्थपूर्ण वापर करीत आहेत आणि वेगवेगळे प्रयोग करीत आहेत, त्यांचा अलीकडेच एक सर्व्हे करण्यात आला. एआयमुळे अधिक जबाबदारीने काम करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागते, यावर ९३ टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे. ‘वर्कडे’ या कंपनीसाठी ‘हॅनोव्हर रिसर्च’ने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा सर्व्हे केला. उत्तर अमेरिका, आशिया - पॅसिफिक, युरोप, मध्य-पूर्व आणि आफ्रिका खंडातील २२ देशांमधील २,५०० पूर्णवेळ कर्मचारी या सर्व्हेत सामील झाले होते. एआयचा उदोऊदो होणाऱ्या काळातही मानवी हस्तक्षेप, मानवी स्पर्शाशिवाय कोणतेही काम पूर्णत्वास जाणे कठीण आहे, असा निष्कर्ष या सर्व्हेतून पुढे आला आहे. मानवी क्षमतांचा विचार करता एआय हे भविष्यासाठी वरदान ठरू शकते, यात शंका नाही. मात्र, त्याचा वापर कसा केला जातो, यावर बरेच अवलंबून असेल. परस्पर संवाद, सहानुभूती, सृजनशीलता, मूल्ये, निर्णयक्षमता व नेतृत्व या बाबतीत एआय कधीही मानवाला मात देऊ शकणार नाही.

एआयच्या प्रभावी वापरासाठी कंपन्यांनी काय करावे?

मानवी भावनाकेंद्रित नेतृत्व असावे. सहानुभूती, सृजनात्मकता आणि मूल्यांवर आधारित निर्णयक्षमता विकसित करण्यावर भर द्यावा.

मानवी परस्परसंबंध निकोप असावेत. एआय आणि मानव यांच्यातील संवाद, समन्वय आणि संपर्क असा असावा की दोघांनाही परस्परांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करता येईल.

कौशल्य विकासावर अधिक भर हवा. कर्मचाऱ्यांमधील सामान्य कौशल्ये आणि एआय-केंद्रित कौशल्ये यांना चालना देऊन त्यात आपले मनुष्यबळ पारंगत केले पाहिजे.

पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चितीवर भर असावा. एआय अल्गोरिदम आणि निर्णयप्रक्रिया नेहमी पारदर्शक आणि स्पष्टीकरण देता येईल, अशी असावी.

एआय नेमके काय करतो?

संशोधकांच्या असे निदर्शनास आले आहे की, एआय दोन प्रकारे सृजनशीलता वाढवण्यास मदत करतो.

एआय माणसाला नेहमीच्या कामापासून मुक्तता देतो. ही कामे एआय अधिक क्षमतेने आणि वेगाने करू शकतो.

एआय हा सृजनात्मक सहकारी आहे. नव्या कल्पनांना वाव मिळेल, अशा गोष्टी त्वरेने ओळखणे आणि त्यांना चालना देणे.

काय करू शकत नाही?

माणूस जे करू शकतो, ते एआय करू शकत नाही, अशी प्रमुख पाच मानवी कौशल्ये आहेत. ती कधाही एआय आत्मसात करू शकणार नाही.

बुद्धिमत्तेला भावनांचा स्पर्श असणे आणि सहानुभूती

माणसांचा संग्रह आणि संबंधांची जपणूक

नैतिक मूल्यांवर आधारित निर्णय क्षमता

सांस्कृतिक संवेदनशीलता आणि स्वीकारार्हता

काय करण्याची गरज आहे?

माहिती, आकडेवारी यांचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहित करावे.

एआय तंत्राच्या प्रभावी वापरासाठी क्षमतांनुसार विभागणी करावी.

अधिक महत्त्वाच्या आणि कौशल्याच्या कामी मनुष्यबळाचा वापर करणे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स