शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

गुगलचे CEO सुंदर पिचाई करतात 20 स्मार्टफोनचा वापर?; स्वतःच सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 14:38 IST

Sundar Pichai : मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मोठ्या टेक कंपन्यांचे व्यवस्थापन करणारे लोक टेक्नॉलॉजीचा नेमका किती वापर करतात? हा प्रश्न अनेकवेळा लोकांच्या मनात येतो. अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहेत. त्यांनी 2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या टेक्नॉलॉजीशी संबंधित सवयींचा खुलासा केला होता. या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सुंदर पिचाई किती फोन वापरतात?

सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते वेगवेगळ्या कारणांसाठी 20 हून अधिक फोन वापरतात. जिथे लोकांना एक-दोन फोन मॅनेज करणे कठीण होत आहे, तिथे सुंदर पिचाई 20 हून अधिक फोन वापरतात. पिचाई यांनी सांगितलं की, गुगलच्या सर्व सर्व्हिसेसची टेस्ट घेण्यासाठी त्यांना हे करावे लागतं.

"वारंवार पासवर्ड बदलत नाही"

याशिवाय सुंदर पिचाई यांनी या मुलाखतीत इतरही अनेक खुलासे केले आहेत. त्यांना त्यांच्या अकाऊंट्स सेफ्टीबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ते वारंवार पासवर्ड बदलत नाही. त्याऐवजी, ते एक्स्ट्रा सिक्योरिटीसाठी टू-फैक्टर ऑथेंटिकेशनर अवलंबून असतात. पिचाई मॉडर्न सिक्योरिटी वापरत असल्याचं दिसून येतं. 

मुलं किती वेळ स्क्रिनवर घालवतात?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत काही कल्पनाही शेअर केल्या आहेत.  एआय हे मानवाने निर्माण केलेले सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे, असा त्यांचा विश्वास आहे. सुंदर पिचाई यांनी स्क्रीन टाइम संदर्भात काही खास गोष्टीही शेअर केल्या आहेत. तुमची मुलं किती वेळ स्क्रिनवर घालवतात? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. 

मुलांवर कडक नियम लावण्यापेक्षा काही पर्सनल लिमिट्स ठरवण्यात आल्याचं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. नवीन पिढीला टेक्नॉलॉजीबाबत शिकावं लागेल, ती अंगीकारावी लागेल. हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे असं देखील सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sundar Pichaiसुंदर पिचईSmartphoneस्मार्टफोनgoogleगुगल