शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

... तर WhatsApp भारतातून गाशा गुंडाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 10:49 IST

भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून व्हॉट्सअ‍ॅपचे 20 कोटी युजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजसचा शोध घेणे ही सर्वात मोठी समस्या आहे.  

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. मात्र भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. 

भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून व्हॉट्सअ‍ॅपचे 20 कोटी युजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचे जगभरात एकूण 1.5 अब्ज युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजसचा शोध घेणे ही सर्वात मोठी समस्या आहे.  तसेच स्त्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअ‍ॅप मूलभूतरित्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. याचा अर्थ पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच मेसेज वाचू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपलाही ते मेसेज वाचता येत नाहीत. तसेच जगभरातील लोकांना जी गोपनीयता हवी आहे, ती प्रस्तावित बदलाला अनुरूप नाही. आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरवतो. पण नव्या नियमानुसार व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बदल करावे लागणार अशा स्थितीत मेसेज सेवा आपल्या सध्याच्या रूपात देता येणार नाही, असे वूग यांनी सांगितले.

WhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का?नवे नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता वूग यांनी  फेटाळली नाही. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमाअंतर्गत त्याच्या सेवांचा दुरूपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल. 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान