शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नेटवर्क नसलं तरी आता वाय-फायच्या सहाय्याने लँडलाइन, मोबाइल नंबरवर कॉल करणं होणार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 2:23 PM

मोबाइल नेटवर्क नसलं तरी तुम्हाला लँडलाइन तसंच मोबाइल फोनवर कॉल करणं शक्य होणार आहे.

नवी दिल्ली- बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी आपण असल्यावर तिथे नेटवर्क मिळत नाही. महत्त्वाचा फोन करायचा असतानाही नेटवर्क गेल्याच्या समस्या आपण सगळेच अनुभवतो. पण आता या सगळ्या समस्यांवर उत्तर मिळणार आहे. मोबाइल नेटवर्क नसलं तरी तुम्हाला लँडलाइन तसंच मोबाइल फोनवर कॉल करणं शक्य होणार आहे. केंद्र सरकार लवकरच देशभरात इंटरनेट टेलिफोनीला मान्यता देणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्राकडून स्विकारला जाणार आहे. 

ज्या टेलिकॉम कंपन्यांकडे टेलिफोनीचे लायसन्स असणार आहेत, अशा कंपन्याकडे ही सेवा उपलब्ध असेल. टेलिफेनीचं लायसन्स असणारी टेलिकॉम कंपनी ग्राहकांना नवा मोबाइल नंबर ऑफर करेल. या मोबाइल क्रमांकासाठी तुम्हाला कोणतंही सिमकार्ड घेण्याची गरज लागणार नाही. इंटरनेट टेलिफोनी अॅप डाऊनलोड करत तुम्ही तुमचा क्रमांक अॅक्टिव्हेट करु शकता. ट्रायच्या नियामक मंडळाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात यासंबंधी प्रस्ताव मांडला होता. नेहमी कॉल ड्रॉपच्या समस्येला सामोरं जावं लागणाऱ्या ग्राहकांना संपर्क साधण्यासाठी एक नवा पर्याय मिळावा यादृष्टीने ट्रायकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

दूरसंचार आयोगाने मंजूर केलेल्या प्रस्तावानंतर आता एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि इतर अशा टेलिकॉम कंपन्या इंटरनेट टेलिफोनी सुरू करू शकतात. टेलिफोनी सर्व्हिस सुरू केल्याचा फायदा ग्राहकांना होणार असून कनेक्टिव्हिटीसाठी नवे पर्याय आता ग्राहकांना मिळतील, असं ट्रायचे सल्लागार अरविंद कुमार यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क नीट नाही, अशा वेळी ही सर्व्हिस फायद्याची ठरणार आहे. ज्या इमारती आणि घरांमध्ये व्यवस्थित नेटवर्क येत नाही, अशांनाही या सेवेचा फायदा होइल, असंही अरविंद कुमार यांनी म्हंटलं. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट टेलिफोनीचा वापर करण्यासाठी ग्राहकाला ऑपरेटरकडून सांगण्यात आलेलं अॅप डाऊनलोड करावं लागेल. यानंतर ग्राहकाला १० आकडी क्रमांक मिळेल. हा क्रमांक मोबाइल क्रमांकाप्रमाणेच असेल. उदाहरणार्थ जर तुम्ही आत्ता एअरटेलचं सिमकार्ड वापरत असाल आणि इंटरनेट टेलिफोनीसाठी रिलायन्स जिओ हवं असेल तर तुम्हाला जिओ इंटरनेट टेलिफोनी अॅप डाऊनलोड करावं लागेल. यासाठी तुम्हाला नवीन मोबाइल क्रमांक मिळेल. याच क्रमांकावरुन तुम्ही ब्रॉडबॅण्डचा वापर करत कॉल करता येइल. पण जर तुम्ही आत्ता ज्या कंपनीचं सिमकार्ड वापरत आहात व त्याच कंपनीचं अॅप डाऊनलोड केलं तर तुम्हाला तुमच्याच मोबाइलनंबर सुविधा वापरता येईल. 

एखाद्या भागात एका विशिष्ट कंपनीचं नेटवर्क असतं तिथे इतर कुठलीही नेटवर्क नसतात. अशा ठिकाणी टेलिफोनी सर्व्हिसचा जास्त फायदा होणार आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल