शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन महागणार? अर्थसंकल्प नाही कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 19:59 IST

देशाचा अर्थसंकल्प अवघ्या दोन दिवसांनी मांडण्यात येणार आहे.

मुंबई : देशाचा अर्थसंकल्प अवघ्या दोन दिवसांनी मांडण्यात येणार आहे. मात्र, त्या आधीच स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन आदी वस्तू महागण्याची बातमी येऊन धडकली आहे. अर्थसंकल्पातही करवाढीची शक्यता असली तरीही महागण्याचे कारण वेगळेच आहे. 

भारतात स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन सारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर तयार केली जातात. हे जरी खरे असले तरीही त्यांचे सुटे भाग हे चीनमध्ये बनतात. चीनमधून आयात केलेल्या याच सुट्या भागांपासून ही उत्पादवे मेक, मेड इन इंडिया म्हणून विकली जातात. चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून तिथे हास्तांदोलन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे तेथून पुरवठा होणारे भाग भारतात किंवा जगभरातही पाठविण्यात येणार नाहीत. यामुळे जगभरात तुटवडा होणार आहे. 

मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे. टीव्हीसाठीचे सुटे भाग 75 टक्के आणि स्मार्टफोनचे सुटे भाग हे 85 टक्के चीनमधूनच आयात केले जातात. यामध्ये पॅनेल, सर्किट, मेमरी, एलईडी यासारखे पार्ट असतात. तसेच अन्य इलेक्ट्रीक उत्पादनांचे सुटे भागही चीनमधूनच भारतात आणले जातात. यामुळे या वस्तूंच्या किंमतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

भारतात सध्या इलेक्ट्रीक कार लाँच होत आहेत. या कारमध्ये वापरली जाणारी बॅटरी किंवा तत्सम सुटे भागही चीनमधूनच भारतीय कंपन्या मागवितात. बॅटरीमध्ये वापरले जाणारे लिथिअम आयनही चीनच पुरविते. या सगळ्यावर परिणाम होणार आहे. 

कोरोना व्हायरसमुळे चीनच्या कंपन्यांनी स्पेअर पार्टच्या किंमतीमध्ये सध्या 2 टक्क्यांची वाढ केली आहे. कोरोना नियंत्रित झाला नाही तर यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच चीनच्या सरकारने लोकांवर अनेक प्रकारची बंधनेही घातली आहेत. यामुळे मोठमोठ्या कंपन्यांना टंचाई जाणवणार आहे. 

टॅग्स :Inflationमहागाईbudget 2020बजेटchinaचीनcorona virusकोरोनाIndiaभारतAutomobileवाहन