शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

लाखो मोबाईल ग्राहकांना मोठा धक्का!  Reliance Jio-Airtel पुन्हा टॅरिफ वाढविणार? जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 20:47 IST

Reliance Jio Airtel Tariffs Price : देशातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 10 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आपल्या टॅरिफच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात. याचाच अर्थ मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशावरचा बोजा पुन्हा एकदा वाढणार आहे. देशातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 10 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.

Business Insider च्या एका रिपोर्टमध्ये टेलिकॉम कंपन्यांकडून देशात टॅरिफ महाग करण्यासंदर्भात खुलासा झाला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, "मागील टॅरिफ वाढीनंतर मिळालेले सर्व फायदे जवळजवळ संपले आहेत आणि त्यावर रेव्हेन्यू आणि नफा वाढवण्यासाठी सतत दबाव आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना पुन्हा एकदा टॅरिफमध्ये वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे."

टॅरिफ महाग होण्याचे कारणही या रिपोर्टमध्ये उघड करण्यात आले आहे. रेव्हेन्यूवरील सततचा दबाव, मध्यम नफा आणि ARPU रेटमधील मार्जिन हे या अपेक्षित टॅरिफवाढीचे एक कारण असू शकते. रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओचा ARPU रेट 0.8 टक्क्यांनी वाढला आहे आणि एअरटेल आणि व्होडाफोनचा ARPU रेट 1 टक्क्यांनी वाढला आहे.

या रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, एअरटेलने काही टेलिकॉम सर्कलमध्ये 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करून टॅरिफ वाढीची चाचणी सुरू केली आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 2.5 पैसे प्रति मिनिट दराने कॉल आणि 200MB डेटा देते. यानंतर, हा प्लॅन 57 टक्के खर्चाने पुन्हा सुरू करण्यात आली. आता या प्लॅनमध्ये 155 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉल आणि 1 जीबी डेटा दिला जात आहे.

दरम्यान, अलीकडेच केंद्रीय मंत्री देवसिंह चौहान म्हणाले होते की, सध्या टेलिकॉम ऑपरेटर देशातील आपल्या ग्राहकांना 5G सेवा देण्यासाठी दर आठवड्याला सरासरी 2500 बेस स्टेशन इन्स्टॉल करत आहेत. 26 नोव्हेंबरपर्यंत देशात 20,980 मोबाईल बेस स्टेशन बसवण्यात आल्याचे मंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले होते. यापैकी रिलायन्स जिओ आणि एअरटेलने अनुक्रमे 17,687 आणि 3,293 बेस स्टेशन इन्स्टॉल केले आहेत. व्होडाफोन-आयडिया देखील आपल्या प्रतिस्पर्ध्यांनंतर टॅरिफची किंमत वाढवू शकते.

टॅग्स :AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओJioजिओtechnologyतंत्रज्ञान