शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलची बॅटरी ठरवतेय वापरणाऱ्याचा मूड; 50 टक्के झाल्यास तणावात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:11 IST

आज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. यामुळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते.

तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य ताब्यात घेतले आहे आणि मोबाईलच्या बॅटरीने माणसाचा मूड. यात कहर म्हणजे आता तर लोकांचे डोकेही मोबाईलच्या बॅटरीनुसार काम करू लागले आहे. लंडन विद्यापीठाच्या मार्केटिंग रिसर्चर थॉमस रॉबिन्सन आणि फिनलंडच्या अल्टो विद्यापीठाच्या अभ्यासादरम्यान ही बाब समोर आली आहे. 

आज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. यामुळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते. काही जणांना तर गेम मुळे वेड लागायची वेळ आली आहे. नुकताच कोल्हापुरात एक मुलगा असंबद्ध बडबडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच स्मार्टफोनची बॅटरी लोकांचा मूड कसा असेल हे सांगत नाही तर ठरवत आहे. 

संशोधकांनी लंडनधील 23 ते 57 वर्षाच्या वयोगटातील 22 अशा लोकांचा अभ्यास केला ज्यांना रोज कुठेतरी जाण्यासाठी 60 ते 180 मिनिटांचा वेळ लागतो. म्हणजेच त्यांना प्रवासात लागणारा वेळ आणि बॅटरीची तुलना कशी करतात याचा अभ्यास करण्यात आला. ज्यांच्या फोनची बॅटरी 50 टक्के शिल्लक आहे त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आणि बॅटरी फूल चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो, याचा विचार केला गेला आहे. अशा लोकांना बॅटरी कमी होत असताना फोन चार्ज करण्याचे सारखे विचार मनात येत असतात. अशावेळी हे लोक जिथे चार्जिंग करता येईल अशा ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्याचा किंवा नजीकचे ठिकाण गाठण्याचा प्रयत्न करतात. 

ज्या लोकांचा फोन फूल चार्ज असतो ते लोक सकारात्मक मनस्थितीत राहतात आणि विचार करतात की आता ते कुठेही जाऊ शकतात. तर 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी बॅटरी शिल्लक असलेल्या लोकांमध्ये नकारात्मकता वाढते. या अभ्यासामध्ये सहभागी लोकांना विचारण्यात आले की, दिवस संपायला आल्यावर मोबाईलच्या बॅटरीचा आयकॉन पाहायला कसा वाटतो. त्यांनी सांगितले, फुल बॅटरी पाहणे सुखावह, 50 टक्के बॅटरी चिंताजनक आणि 30 टक्क्यांवर आल्यास ही चिंता आणखी वाढत जाते. 

यंत्रांवर जास्त अवलंबून राहिल्याने हा परिणाम होत असल्याचा निष्कर्ष या अभ्यासकांनी काढला आहे. फोनची बॅटरी अनेक गोष्टींवर परिणाम करते. यामुळे फोन मॅप, डिजीटल वॉलेट, डायरी आणि मनोरंजनावरही परिणाम होतो. रॉबिन्सन्स यांनी सांगितले की, ज्या लोकांची बॅटरी फुल चार्ज असते ते लोक चांगले काम करण्यासाठी योग्य निर्णय किंवा पाऊले उचलतात. तर ज्यांची बॅटरी चार्ज असत नाही ते लोक कोणतेही काम चांगल्या प्रकारे करण्यात मागे राहतात.

ज्या लोकांची फोनची बॅटरी चार्ज नसते ते दुसऱ्यांवर जास्त अवलंबून असतात, त्यांचा समाजातील प्रभावही कमी असतो. त्यांना त्यांच्या आयुष्याचे नियोजन करण्यातही संकटे येत असतात, असे अहवारालात म्हटले आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्य