शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

इंटरनेट स्पीडमध्ये भारतापेक्षाही पाकिस्तान सरस, श्रीलंकाही एक पाऊल पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 14:01 IST

जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी असल्याचे समोर आले आहे.

मुंबई - जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी असल्याचे समोर आले आहे. इंटरनेटची 4जी सुविधा वापरणाऱ्या भारतीय युजर्संना बफरींगच्या समस्येला आजही तोंड द्यावे लागते. त्यामुळेच भारतातील इंटरनेट स्पीड हा शेजारील श्रीलंका, म्यानमार आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी आहे. इंग्लंडस्थित इंटरनेट स्पीड टेस्टर कंपनी ओपनसिग्नलने केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. 

भारतात सध्या 4 जी नेटवर्कचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यानुसार देशात 4 जी नेटवर्क अधिक प्रमाणात वापरण्यात येते. मात्र, भारतातील याच 4जी नेटवर्कचा स्पीड शेजारील श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत कमी आहे. सध्या श्रीलंकेत (13.95Mbps), पाकिस्तान (13.56Mbps) आणि म्यानमारमध्ये (15.56Mbps) एवढा इंटरनेट स्पीड आहे. या देशांच्या तुलनेत भारताचा इंटरनेट स्पीड निम्माही नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. विकासाच्या बाबतीत हे देश भारताच्या कित्येक पटींनी पाठिमागे आहेत. मात्र, इंटरनेट स्पीडच्या बाबतीत हे देश जगातील सर्वात पुढारलेल्या देशांमध्ये आहेत. जगातील इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगात अमेरिका, (16.31Mbps), इंग्लंड (23.11Mbps), आणि जपान (25.39Mbps) च्या गतीने अनुक्रमे 1,2 आणि 3 क्रमांकावर आहेत. 

दरम्यान, अमेरिकेतील ओकला (Ookla) या कंपनीच्या इंटरनेट स्पीडच्या केलेल्या अभ्यासानुसार भारताचा जगात 109 वा क्रमांक लागतो. भारतात स्मार्टफोनमध्ये होणारी महाक्रांती आणि त्यामुळे वाढणाऱ्या इंटरनेट युजर्सची संख्या हे भारतातील इंटरनेट स्पीड कमी होण्याचे प्रमुख कारण आहे, असे ओपनसिग्नल कंपनीचे विश्लेषक पीटर बॉयलँड यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारतPakistanपाकिस्तानdigitalडिजिटल