शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:16 IST

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे आज निधन झाले. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले. त्यांचे निधनाने जगभरात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. तसेच त्यांनी टेलिकॉम क्षेत्रातही जिओ येण्याआधी मोठी क्रांती केली होती. उद्योगपती रतन टाटा यांनी २००८ मध्येच टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा समूहाचा विस्तार करताना, त्यांनी अनेक नवीन व्यवसाय सुरू केले, त्यापैकी टाटाची दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस होती, या कंपनीने डोकोमोसह देशातील सामान्य लोकांसाठी मोबाइल कॉलिंग स्वस्त केले.

कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते

टाटा समूहाची दूरसंचार कंपनी Tata Teleservices Limited आणि जपानची NTT DoCoMo यांनी संयुक्तपणे Tata DoCoMo कंपनी भारतात सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांना देशात मोबाईल कॉलिंग परवडणारी सेवा द्यायची होती. त्यावेळी खासगी कंपन्या भारतात मोबाईल व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति मिनिट दर आकारत होत्या. यावेळी टाटा डोकोमो आपल्या ग्राहकांसाठी प्रति सेकंद शुल्क आकारत होती.

टाटा डोकोमोने १ पैसा प्रति सेकंद दर योजना लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरा बदलला. पूर्वी दूरसंचार कंपनी प्रति मिनिट चार्ज करत होती. म्हणजे जर तुम्ही १० सेकंद किंवा 59 सेकंद बोलला तर तुम्हाला पूर्ण मिनिटासाठी पैसे द्यावे लागतील. Tata DoCoMo ने प्रति सेकंद दरांसह जेवढं बोलाल तेवढे पैसे अशी बिलिंग प्रणाली लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट केला आहे.

दूरसंचार कंपन्यांना प्रति मिनिट बिलिंग टॅरिफमधून प्रचंड नफा मिळत होता. उद्योगपती रतन टाटा यांनी कंपनीच्या नफ्याचा विचार न करता देशातील सर्वसामान्यांसाठी परवडणारी बिलिंग प्रणाली सुरू केली. यासह त्यांनी एसएमएससाठी नवीन प्लॅन आणले, हे खूप लोकप्रिय झाले. त्यावेळी मोबाईल इंटरनेट खूप महाग होते. टाटा ग्रुपची ही कंपनी पे-पर-साइट मॉडेल घेऊन आली होती. मात्र, त्यावेळी फारच कमी वापरकर्ते मोबाईल इंटरनेट वापरत होते.

रतन टाटा यांच्या फुल प्रुफ प्लॅनिंगमुळे ही कंपनी लवकरच लोकप्रिय झाली. टाटा समूहाने फक्त ५ महिन्यांत १० मलियनहून अधिक ग्राहक जोडले आहेत. यानंतर, इतर दूरसंचार कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये प्रति मिनिट ते प्रति सेकंद बदल केला.

टाटा डोकोमोच्या भारतात सुरू झाल्यानंतर एका वर्षात देशातील मोबाइल कनेक्शनची संख्या २९ टक्क्यांनी वाढून ४३ टक्क्यांवर गेली होती. २००९ मध्ये भारतात मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या ५० कोटी होती, ही संख्या २०१४ पर्यंत ८० कोटींवर गेली होती.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानRatan Tataरतन टाटा