शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:16 IST

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे आज निधन झाले. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले. त्यांचे निधनाने जगभरात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. तसेच त्यांनी टेलिकॉम क्षेत्रातही जिओ येण्याआधी मोठी क्रांती केली होती. उद्योगपती रतन टाटा यांनी २००८ मध्येच टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा समूहाचा विस्तार करताना, त्यांनी अनेक नवीन व्यवसाय सुरू केले, त्यापैकी टाटाची दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस होती, या कंपनीने डोकोमोसह देशातील सामान्य लोकांसाठी मोबाइल कॉलिंग स्वस्त केले.

कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते

टाटा समूहाची दूरसंचार कंपनी Tata Teleservices Limited आणि जपानची NTT DoCoMo यांनी संयुक्तपणे Tata DoCoMo कंपनी भारतात सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांना देशात मोबाईल कॉलिंग परवडणारी सेवा द्यायची होती. त्यावेळी खासगी कंपन्या भारतात मोबाईल व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति मिनिट दर आकारत होत्या. यावेळी टाटा डोकोमो आपल्या ग्राहकांसाठी प्रति सेकंद शुल्क आकारत होती.

टाटा डोकोमोने १ पैसा प्रति सेकंद दर योजना लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरा बदलला. पूर्वी दूरसंचार कंपनी प्रति मिनिट चार्ज करत होती. म्हणजे जर तुम्ही १० सेकंद किंवा 59 सेकंद बोलला तर तुम्हाला पूर्ण मिनिटासाठी पैसे द्यावे लागतील. Tata DoCoMo ने प्रति सेकंद दरांसह जेवढं बोलाल तेवढे पैसे अशी बिलिंग प्रणाली लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट केला आहे.

दूरसंचार कंपन्यांना प्रति मिनिट बिलिंग टॅरिफमधून प्रचंड नफा मिळत होता. उद्योगपती रतन टाटा यांनी कंपनीच्या नफ्याचा विचार न करता देशातील सर्वसामान्यांसाठी परवडणारी बिलिंग प्रणाली सुरू केली. यासह त्यांनी एसएमएससाठी नवीन प्लॅन आणले, हे खूप लोकप्रिय झाले. त्यावेळी मोबाईल इंटरनेट खूप महाग होते. टाटा ग्रुपची ही कंपनी पे-पर-साइट मॉडेल घेऊन आली होती. मात्र, त्यावेळी फारच कमी वापरकर्ते मोबाईल इंटरनेट वापरत होते.

रतन टाटा यांच्या फुल प्रुफ प्लॅनिंगमुळे ही कंपनी लवकरच लोकप्रिय झाली. टाटा समूहाने फक्त ५ महिन्यांत १० मलियनहून अधिक ग्राहक जोडले आहेत. यानंतर, इतर दूरसंचार कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये प्रति मिनिट ते प्रति सेकंद बदल केला.

टाटा डोकोमोच्या भारतात सुरू झाल्यानंतर एका वर्षात देशातील मोबाइल कनेक्शनची संख्या २९ टक्क्यांनी वाढून ४३ टक्क्यांवर गेली होती. २००९ मध्ये भारतात मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या ५० कोटी होती, ही संख्या २०१४ पर्यंत ८० कोटींवर गेली होती.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानRatan Tataरतन टाटा