शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

जेव्हा एकही थेंब पाण्याशिवाय चारचाकी स्वच्छ होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:41 IST

वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात कमी होत जाणारे पाण्याचे स्रोत त्यामुळे सर्वत्र पाण्याचा तुटवडा असताना पुण्यात पाण्याचा एकही थेंब न वापरता चारचाकी गाडी स्वच्छ करण्याचा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.  

ठळक मुद्देपुण्यात पाण्याशिवाय चारचाकी स्वच्छ करण्याचे तंत्रज्ञान  पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद, दररोज १०० गाड्यांची स्वच्छता

 

पुणे : वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात कमी होत जाणारे पाण्याचे स्रोत त्यामुळे सर्वत्र पाण्याचा तुटवडा असताना पुण्यात पाण्याचा एकही थेंब न वापरता चारचाकी गाडी स्वच्छ करण्याचा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पुण्यातील निनाद आणि अक्षय ढोक या दोन भावांनी सुरु केलेल्या पाण्याविना गाडी स्वच्छ करण्याच्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

 

   पाण्याने जगात तिसरे महायुद्ध होऊ शकते असा विचार अनेकदा मांडण्यात येतो. भारतातील अनेक राज्यात पाणी वाटपावरून अंतर्गत कलह आहे. भूजल साठाही दिवसागणिक कमी होत असून ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतनीय बाब आहे. याच विचारातून अनेक ठिकाणी पाणी मीटर लावण्यात येत असून व्यक्तिगणिक पाणी वाटप करण्याचा विचार शासन करत आहे. पाणी वाचवण्याचा संदेशही सर्वत्र देण्यात येतो. मात्र गाडी धुणे किंवा कपडे धुणे, भांडी घासणे अशा घरगुती कामांसाठी भरमसाठ पाणी वापरण्यात येते. त्यावर उपाय शोधण्याची गरज असताना पुण्यात त्यावर उपाय शोधला गेला आहे. एका चारचाकीसाठी स्वच्छतेसाठी सुमारे १०० लिटर पाण्याचा वापर होत असताना नव्या तंत्रज्ञानामुळे पाण्याची बचत होणार आहे. 

 

     निनाद हे मेकॅनिकल इंजिनिअर असून सुमारे १८ वर्षे त्यांनी या क्षेत्रात काम केले होते. २०११ साली कामानिमित्त अमेरिकेत गेल्यावर त्यांना पाण्याच्या वापर न करता गाडी धुण्याचे तंत्र बघायला मिळाले. त्यांनी त्याचा तीन वर्ष अभ्यास करून स्वतःच्या कंपनीसाठी काही पदार्थ एकत्र करून एक वेगळे द्रावण तयार केले. या मिश्रणाचा वापर करत पाणी न वापरता कोणत्याही मशिनशिवाय गाड्या स्वच्छ करता येतात.हे काम पाणी न वापरता करण्यात येत असल्याने शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे. पुणेकर या पध्दतीने गाड्या स्वच्छ करण्यास प्राधान्य देत असून दररोज १०० गाड्या स्वच्छ केल्या जातात. याबाबत अक्षय यांनी माहिती दिली असून आम्ही तयार केलेल्या द्रावणामुळे कार फक्त स्वच्छ नाही तर चकचकीत होत असल्याचे सांगितले. व्यवसाय करताना पर्यावरणपूरक काहीतरी देण्याचा आमचा प्रयत्न सफल झाल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं. 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेtechnologyतंत्रज्ञानWaterपाणीenvironmentवातावरण