शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा एकही थेंब पाण्याशिवाय चारचाकी स्वच्छ होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:41 IST

वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात कमी होत जाणारे पाण्याचे स्रोत त्यामुळे सर्वत्र पाण्याचा तुटवडा असताना पुण्यात पाण्याचा एकही थेंब न वापरता चारचाकी गाडी स्वच्छ करण्याचा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.  

ठळक मुद्देपुण्यात पाण्याशिवाय चारचाकी स्वच्छ करण्याचे तंत्रज्ञान  पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद, दररोज १०० गाड्यांची स्वच्छता

 

पुणे : वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात कमी होत जाणारे पाण्याचे स्रोत त्यामुळे सर्वत्र पाण्याचा तुटवडा असताना पुण्यात पाण्याचा एकही थेंब न वापरता चारचाकी गाडी स्वच्छ करण्याचा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पुण्यातील निनाद आणि अक्षय ढोक या दोन भावांनी सुरु केलेल्या पाण्याविना गाडी स्वच्छ करण्याच्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

 

   पाण्याने जगात तिसरे महायुद्ध होऊ शकते असा विचार अनेकदा मांडण्यात येतो. भारतातील अनेक राज्यात पाणी वाटपावरून अंतर्गत कलह आहे. भूजल साठाही दिवसागणिक कमी होत असून ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतनीय बाब आहे. याच विचारातून अनेक ठिकाणी पाणी मीटर लावण्यात येत असून व्यक्तिगणिक पाणी वाटप करण्याचा विचार शासन करत आहे. पाणी वाचवण्याचा संदेशही सर्वत्र देण्यात येतो. मात्र गाडी धुणे किंवा कपडे धुणे, भांडी घासणे अशा घरगुती कामांसाठी भरमसाठ पाणी वापरण्यात येते. त्यावर उपाय शोधण्याची गरज असताना पुण्यात त्यावर उपाय शोधला गेला आहे. एका चारचाकीसाठी स्वच्छतेसाठी सुमारे १०० लिटर पाण्याचा वापर होत असताना नव्या तंत्रज्ञानामुळे पाण्याची बचत होणार आहे. 

 

     निनाद हे मेकॅनिकल इंजिनिअर असून सुमारे १८ वर्षे त्यांनी या क्षेत्रात काम केले होते. २०११ साली कामानिमित्त अमेरिकेत गेल्यावर त्यांना पाण्याच्या वापर न करता गाडी धुण्याचे तंत्र बघायला मिळाले. त्यांनी त्याचा तीन वर्ष अभ्यास करून स्वतःच्या कंपनीसाठी काही पदार्थ एकत्र करून एक वेगळे द्रावण तयार केले. या मिश्रणाचा वापर करत पाणी न वापरता कोणत्याही मशिनशिवाय गाड्या स्वच्छ करता येतात.हे काम पाणी न वापरता करण्यात येत असल्याने शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे. पुणेकर या पध्दतीने गाड्या स्वच्छ करण्यास प्राधान्य देत असून दररोज १०० गाड्या स्वच्छ केल्या जातात. याबाबत अक्षय यांनी माहिती दिली असून आम्ही तयार केलेल्या द्रावणामुळे कार फक्त स्वच्छ नाही तर चकचकीत होत असल्याचे सांगितले. व्यवसाय करताना पर्यावरणपूरक काहीतरी देण्याचा आमचा प्रयत्न सफल झाल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं. 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेtechnologyतंत्रज्ञानWaterपाणीenvironmentवातावरण