शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

दुसऱ्या लाटेत ६.२७ दशलक्ष ग्राहकांची मोबाइल सेवा बंद; 'ट्राय'चा अहवाल, कंपन्या चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 1:53 PM

मे महिन्यात लँडलाइन ग्राहक मात्र वाढले; कंपन्या तरीही चिंतेत

मुंबई : कोरोनामुळे माणसा-माणसांत निर्माण झालेले अंतर तंत्रज्ञानाने दूर केले असले तरी या काळात तंत्रज्ञानापासून फारकत घेतलेल्यांची संख्याही कमी नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६.२७ दशलक्ष ग्राहकांनी मोबाइल सेवा बंद केली आहे. त्यामुळे दुरावलेले हे ग्राहक पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी धडपड सुरू केली आहे.

मोबाइल कंपन्यांच्या मे महिन्यातील कामगिरीचा एकत्रित अहवाल ‘ट्राय’ने नुकताच जाहीर केला. त्यानुसार देशातील एकूण मोबाइल वापरकर्त्यांची संख्या या काळात तब्बल ६.२७ दशलक्षांनी कमी झाली आहे. विशेष म्हणजे यात शहरी भागातील वापरकर्ते सर्वाधिक म्हणजे ४.१४ दशलक्ष इतके आहेत; तर ग्रामीण क्षेत्रातील संख्या २.१४ दशलक्ष इतकी आहे. एप्रिल महिन्यात देशभरात १२०३.४७ दशलक्ष मोबाइल ग्राहक होते. मे महिन्यात ही संख्या ११९८.५० दशलक्ष इतकी नोंदविण्यात आली.

असे असले तरी मे महिन्यात लँडलाइन ग्राहकांची संख्या मात्र वाढली आहे. या काळात १.३० दशलक्ष नागरिकांनी नवीन लँडलाइन जोडणी घेतली. त्यामुळे या क्षेत्राचा मासिक वृद्धिदर ६.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. देशभरात २१.६६ दशलक्ष लँडलाइनधारक असून, शहरी भागात १९.७० दशलक्ष आणि ग्रामीण भागात १.९६ दशलक्ष लँडलाइन वापरकर्ते आहेत. ब्रॉडबँड ग्राहकांचा विचार करता, मे महिन्यात ही संख्या ७८०.२७ दशलक्षांवर पोहोचली आहे. त्यात वायरलेस ७५७.५३, तर २२.७४ वायरलाइन ग्राहकांचा समावेश आहे.

कोणत्या कंपनीचे किती ग्राहक कमी झाले?

मे महिन्यात देशभरात ६२ लाख ७३ हजार ८९० ग्राहकांनी मोबाइलला रामराम केला आहे. त्यात भारती एअरटेलचे सर्वाधिक (४६,१३,५२१) ग्राहक कमी झाले असून, त्या खालोखाल व्होडाफोन आयडिया (४२,८१,५३२), बीएसएनएल (८,८०,८१०), एमटीएनएलची (२,४३६) ग्राहकसंख्या कमी झाली आहे. मात्र, रिलाइन्स जीओच्या ग्राहकसंख्येचा आलेख चढाच असून, या महिन्यात त्यांनी ३५ लाख ५४ हजार ७२२ नवे ग्राहक जोडले आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायIndiaभारत