शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

डोकलाम वादाचा Xiaomi ला झटका; Samsung बनली भारताची नंबर १

By हेमंत बावकर | Updated: October 29, 2020 20:33 IST

Xiaomi Vs Samsung : शाओमीने गेल्या दोन वर्षांपासून सॅमसंगला डोके वर काढू दिले नव्हते. दोन्ही वर्षे शाओमीच भारतात नंबर १ ला होती.

दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी Samsung गेल्या दोन वर्षांपसून भारताच्या स्मार्टफोन बाजारात मागे पडली होती. मात्र, भारत-चीन सीमावाद आणि डोकलाममध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे शाओमीला (Xiaomi) मोठा झटका बसला आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकल्यामुळे सॅमसंग पुन्हा नंबर एक बनली आहे. 

मार्केट रिसर्च फ़र्म काऊंटर पॉईंटच्या आकड्यांनुसार 2020 च्या तिसऱ्या तिमाहीला सॅमसंगकडे भारतीय बाजारातील 24 टक्के विक्री आली आहे. तर शाओमीच्या उत्पादनांची बाजारातील विक्री 23 टक्के राहिली आहे. गेल्या वर्षी 2019 च्या तुलनेत Xiaomi ची बाजारातील सत्ता 1 टक्क्याने कमी झाली आहे. भारत चीन तणावामुळे हे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

शाओमीने गेल्या दोन वर्षांपासून सॅमसंगला डोके वर काढू दिले नव्हते. दोन्ही वर्षे शाओमीच भारतात नंबर १ ला होती. काऊंटर पॉईंटनुसार 2018 च्या तिसऱ्या तिमाहीनंतर पहिल्यांदाच शाओमी दोन नंबरला आली आहे. मात्र, ही परिस्थिती दूरगामी असण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. यामुळे शाओमी पुन्हा पुढील तिमाहीत नंबर १ ला जाण्याची शक्यता आहे. 

कारण गेल्या दोन महिन्यांत शाओमीने तुफानी संख्येने स्मार्टफोन विकले आहेत. फेस्टिव्ह सीझनमध्येही कंपनीला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच दोन्ही कंपन्यांमधील फरकही मोठा नाहीय.  

बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले

भारतात कमी काळात सर्वात मोठी कंपनी बनलेलेली चीनच्या Xiaomi ने बहिष्काराच्या मोहिमेचा मोठा धसकाच घेतला आहे. इतर कंपन्यांपेक्षा शाओमीच जास्त भारतीय कंपनी असल्याचा दावा कंपनीचे भारतातील सीईओ करू लागले आहेत. मात्र, तरीही भीती कमी होत नसल्याने अखेर देशभरातील स्टोअर्सवरील शाओमीचे लोगो झाकण्याचा निर्णय घेतला होता. चीनने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये 20 जवान शहीद झाले. चीनच्या या विश्वासघातामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थती असून चीन विविध भागांमध्ये कुरापती काढू लागला आहे. एकीकडे शांतता चर्चा सुरु ठेवायची आणि दुसरीकडे सैन्य फौजफाटा वाढवायचा अशी चीनची चाल आहे. यामुळे भारतीयांमध्ये कमालीचा आक्रोश दिसून येत आहे. 

Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला

शाओमी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये देत असलेला इनबिल्ट ब्राऊझर बॅन करण्यात आला आहे. 'Mi Browser Pro - Video Download, Free Fast & Secure' विरोधात ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. हा ब्राऊझर मोबाईलच्या परफॉर्मन्सवर वाईट पद्धतीने परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. यावर कंपनीने सरकारसोबत बोलणी सुरु केली आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा ब्राऊझर मोबाईलवर परिणाम करत नसल्याचा दावा केला असून युजर अन्य कंपन्यांचे ब्राऊझर डाऊनलोड करू शकतात असेही म्हटले आहे.  सरकारने आणखी एक चिनी अॅप QQ International ब्लॉक केले आहे. शाओमीविरोधातील कारवाईमुळे युजरना फटका बसणार नाहीय. युजर त्यांच्या स्मार्टफोनद्वारे इंटरनेट वापरू शकणार आहेत. शाओमीने भारतात 10 कोटी स्मार्टफोन विकले आहेत. शाओमी ही भारतातील सर्वाधिक खपाची कंपनी बनलेली आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीsamsungसॅमसंगindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखDoklamडोकलाम