शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

फेसबुक इंडिया पॉलिसी प्रमुख अंखी दास यांचा राजीनामा; पक्षपात केल्याचा होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 20:46 IST

Facebook's India head of public policy Ankhi Das quits company : काँग्रेसने अंखी दास यांची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार केली होती.

ठळक मुद्देअंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे एक निवेदन समोर आले आहे. अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही.

नवी दिल्ली : फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच अंखी दास वादात अडकल्या होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसनेफेसबुक मुख्यालयात तक्रार दाखल केली होती.

अंखी दास यांच्यावर हेट कंटेंट ब्लॉक करण्यावरून भाजपाची बाजू घेतल्याचा आरोप होता. याबाबत काँग्रेसने अंखी दास यांची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर फेसबुकने अंखी दास यांच्यावरील आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण दिले होते.

अंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे एक निवेदन समोर आले आहे. आता अंखी दास या पब्लिक सर्व्हिसमध्ये आपले फ्युचर पाहणार आहेत, असे सांगितले जात आहे. फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी म्हटले आहे की, "अंखी दास यांनी पब्लिक सर्व्हिसमध्ये आपले फ्युचर घडविण्यासाठी फेसबुकचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे."

फेसबुक इंडियाच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, अंखी दास या भारतातील सुरुवातीच्या फेसबुक कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत आणि भारतात कंपनीच्या वाढीसाठी  ९ वर्षांपासून त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी म्हटले आहे की, "गेल्या दोन वर्षांपासून अंखी दास आपल्या नेतृत्वात काम करत होत्या. त्यांनी खूप योगदान दिले. त्यांच्या सेवेबद्दल आभार मानले आहेत."

अंखी दास यांच्यावर फेसबुकच्या हेट स्पीच पॉलिसीला भाजपाच्या बाजूने केल्या आरोप होता. मात्र फेसबुकनेही हा आरोप फेटाळून लावला आहे. अंखी दास यांनी आपल्या सहका-यांना एक ईमेल केला आहे. त्यामध्ये त्यांनी २०११ पासूनच्या आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच, भारतातील लोकांना जोडण्याचे ध्येय पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०११ मध्ये फेसबुक भारतात एक छोटीशी स्टार्टअप होती, असे सांगत फेसबुकचा शोध लावल्याबद्दल मार्क झुकरबर्ग यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही. 

टॅग्स :Facebookफेसबुकcongressकाँग्रेसBJPभाजपाtechnologyतंत्रज्ञान