शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

फेसबुक इंडिया पॉलिसी प्रमुख अंखी दास यांचा राजीनामा; पक्षपात केल्याचा होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 20:46 IST

Facebook's India head of public policy Ankhi Das quits company : काँग्रेसने अंखी दास यांची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार केली होती.

ठळक मुद्देअंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे एक निवेदन समोर आले आहे. अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही.

नवी दिल्ली : फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच अंखी दास वादात अडकल्या होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसनेफेसबुक मुख्यालयात तक्रार दाखल केली होती.

अंखी दास यांच्यावर हेट कंटेंट ब्लॉक करण्यावरून भाजपाची बाजू घेतल्याचा आरोप होता. याबाबत काँग्रेसने अंखी दास यांची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर फेसबुकने अंखी दास यांच्यावरील आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण दिले होते.

अंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे एक निवेदन समोर आले आहे. आता अंखी दास या पब्लिक सर्व्हिसमध्ये आपले फ्युचर पाहणार आहेत, असे सांगितले जात आहे. फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी म्हटले आहे की, "अंखी दास यांनी पब्लिक सर्व्हिसमध्ये आपले फ्युचर घडविण्यासाठी फेसबुकचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे."

फेसबुक इंडियाच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, अंखी दास या भारतातील सुरुवातीच्या फेसबुक कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत आणि भारतात कंपनीच्या वाढीसाठी  ९ वर्षांपासून त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी म्हटले आहे की, "गेल्या दोन वर्षांपासून अंखी दास आपल्या नेतृत्वात काम करत होत्या. त्यांनी खूप योगदान दिले. त्यांच्या सेवेबद्दल आभार मानले आहेत."

अंखी दास यांच्यावर फेसबुकच्या हेट स्पीच पॉलिसीला भाजपाच्या बाजूने केल्या आरोप होता. मात्र फेसबुकनेही हा आरोप फेटाळून लावला आहे. अंखी दास यांनी आपल्या सहका-यांना एक ईमेल केला आहे. त्यामध्ये त्यांनी २०११ पासूनच्या आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच, भारतातील लोकांना जोडण्याचे ध्येय पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०११ मध्ये फेसबुक भारतात एक छोटीशी स्टार्टअप होती, असे सांगत फेसबुकचा शोध लावल्याबद्दल मार्क झुकरबर्ग यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही. 

टॅग्स :Facebookफेसबुकcongressकाँग्रेसBJPभाजपाtechnologyतंत्रज्ञान