शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Coronavirus : कंपनी असावी तर अशी! एप्रिलमध्ये 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 25 टक्के जास्त पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 13:10 IST

Coronavirus : आयटी क्षेत्रातील एका प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे.

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगालाच विळखा घातला आहे. जगातील सर्वच क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र याच दरम्यान आयटी क्षेत्रातील एका प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कर्मचाऱ्यांच्या कामावर खूश झाल्याने कंपनीने त्यांना  25 टक्के जास्त पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉग्निझंट या आयटी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यामध्ये 25 टक्के जास्त पगार देण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी कंपनीचे काम सुरू ठेवल्याने त्यावर व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या कामावर खूश होऊन त्यांना जास्त पगार देण्यात येत आहे. कंपनीच्या या निर्णयाचा भारतातील 1 लाख ३० हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हमफ्रीज यांनी कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये 'भारत आणि फिलिपिन्समध्ये सेवा देणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले कौतुकास्पद आहे. त्यामुळेच या देशांमधील सहाय्यक आणि त्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या 25 टक्के अतिरिक्त रक्कम एप्रिल महिन्याच्या पगारामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे' असं म्हटलं आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत. त्याला आमचा पाठिंबा आहे असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे. तर सर्वच कंपन्यांप्रमाणे कॉग्निझंटलाही कोरोनाचा फटका बसला आहे. लंडन, मुंबई, मिलान अशा प्रमुख शहरांमध्ये कंपनीच्या प्रोडक्टची मागणी आणि पुरवठा दोघांवरही परिणाम झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. फेसबुकनेही काही दिवसांपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी फेसबुक कर्मचाऱ्यांना 1 हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. 

फेसबुकमध्ये 45 हजार कर्मचारी काम करतात. या प्रत्येक कर्मचाऱ्याला फेसबुक एप्रिलमध्ये 1 हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचा अर्धवाषिक आढावा घेताना सर्वांना इक्सिड रेटिंग देण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत फेसबुककडून कर्मचाऱ्यांना आणखी मोठा बोनस दिला जाऊ शकतो. कोरोनामुळे कार्यालयात येऊ न शकणाऱ्या, कोरोनाची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांनादेखील कंपनी बोनस देणार आहे. याशिवाय कंपनीनं सिएटल आणि बे एरियातल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू

Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या

Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Coronavirus: चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत