शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सावधान..! मोबाइलच्या अतिवापराने आळसावतो आपला मेंदू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 00:13 IST

मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही.

नवी दिल्ली: मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही. स्मार्टफोन हा जणू शरीराचा एक अवयव झालाआहे! अठरापगड कामांचा व्याप असला तरी एक डोळा मोबाइलवर असतो आणि मेंदूचा एक कोपरा जणू मोबाइल फोनने व्यापलेला असतो. मात्र मोबाइल फोनवर आपण जितके अवलंबून राहू, त्याच्यात गुंतत जाऊ तेवढा आपला मेंदू आळशी बनतो.मोबाइल कितीही सोयीचा वाटत असला तरी त्याकडेच सतत लक्ष देणे हे शरीरस्वास्थ्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होतात. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. श्वास रोखला जातो. मोबाइल फोनवर जे संदेश किंवा कॉल येतात त्यांना प्रतिसाद द्यावा म्हणून शरीरातील घटक अशारितीने सक्रिय होतात असे अजिबात नाही. उलट या गोष्टींना जलद प्रतिसाद देण्याची जी धडपड चालते त्यातल्या धोक्याचे संकेत शरीर अशा लक्षणांद्वारे देत असते.

सर्च इंजिनहून पुस्तक सरसप्रत्येक संकेदाला ६० बीट या वेगाने आपला मेंदू माहिती ग्रहण करु शकतो. कामाचे खूप ओझे असेल तर मेंदूला अधिक ताण द्यावा लागेल. त्यामुळे मोबाइल फोनच्या सहाय्याने यातील अतिरिक्त कामांचा उरक करण्याकडे कोणाचाही कल असू शकतो. मात्र या कृतीमुळे मेंदू शिणतो व आळशीही बनतो. यासंदर्भात काही संशोधनही झाले आहे. संशोधक, विचारवंत असे बुद्धिमान लोक आपल्या मोबाइल फोनमधील सर्च इंजिनचा इतर लोकांपेक्षा खूप कमी वापर करतात. मोबाइलफोनवर इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीच्या माहितीचा शोध घेतल्याने कोणीही कमी बुद्धिचा ठरत नाही. मात्र बुद्धिमान लोकांना जास्त गोष्टींची माहिती असल्याने ते सर्च इंजिनचा कमी वापर करतात ही वस्तुस्थिती आहे.सतत स्मार्टफोन वापरल्यामुळे मेंदू तणावग्रस्त होतो. बोटेही शिणतात, असा निष्कर्ष स्वित्झर्लंडमधील स्मार्टफोन वापरणाऱ्यांची अलीकडेच पाहणी करण्यात आली, त्यानंतर काढण्यात आला. मोबाइलवर सतत टाइप करत राहिल्याने, सोशल मीडियामध्ये गुरफटून राहिल्याने किंवा स्क्रोलिंग करणाºयांच्या मेंदूवर जास्त आघात होतो.

टॅग्स :MobileमोबाइलHealth Tipsहेल्थ टिप्स