शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अ‍ॅपल, गुगलचे टेन्शन वाढले! भारताची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम तयार; सर्व मोबाईलवर बंधनकारक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 19:44 IST

भारत लवकरच आपली ऑपरेटिंग सिस्टिम BharOS लाँच करणार आहे. ही ओएस आयआयटी मद्रासने बनविलेली आहे.

देशातील सर्व मोबाईलवर सध्या गुगल आणि एपलच्या ऑपरेटिंग सिस्टिम वापरल्या जात आहेत. या दोन्ही बलाढ्या कंपन्या आहेत. परंतू जगातील आयटी सेक्टरवर भारतीयांच्या हुशारीचे प्रभुत्व आहे. असे असताना भारताने आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम विकसित केली असून या बलाढ्य कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे.

भारत लवकरच आपली ऑपरेटिंग सिस्टिम BharOS लाँच करणार आहे. ही ओएस आयआयटी मद्रासने बनविलेली आहे. सुमारे 100 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना BharOS चा फायदा होईल असा दावा केला जात आहे. हे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर उर्वरित OS पेक्षा अधिक सुरक्षित असेल.

BharOS ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना आवश्यक एप्स इन्स्टॉल करण्याची परवानगी देते. गुगल आयओएससारखी आधीपासूनच इन्सॉल अ‍ॅप नसणार आहेत. युजर त्यांना नको असेल तरी ती अ‍ॅप काढून टाकू शकत नाहीत. यामुळे मोबाईलची मोठी स्पेस वापरली जाते. त्यापासून सुटका होणार आहे. तसेच BharOS वरून वापरकर्त्यांना वेळेवर सॉफ्टवेअर अपडेट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

BharOS लॉन्च झाल्यानंतर स्मार्टफोनच्या किंमतीत कपात होऊ शकते. कारण मोबाईल निर्मात्यांना ओएससाठी गुगलवर अवलंबून राहावे लागणार नाही. गुगलकडून मनमानी शुल्क वसूल केले जाते, ते थांबणार आहे. अ‍ॅप डेव्हलपर्ससाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो. तसेच त्यांच्या बिलिंगवर करही कमी होऊ शकतो. 

टॅग्स :googleगुगलApple Incअॅपल