शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 18:40 IST

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

देशात फाईव्ह जी सुरु होऊन आता दीड वर्ष होत आले आहे. यामध्ये जिओ कंपनी आघाडीवर आहे. भारतात फाईव्ह जी येणार म्हणून त्याच्या आधीच दोन वर्षांपासून स्मार्टफोन आणण्यास सुरुवात केली होती. ज्यांनी सुरुवात केली त्या आता कुठे आहेत? आणि ज्यांनी नंतर आपले फोन आणले त्या कुठे आहेत... खरेतर ज्यांनी सुरवात केलेली त्या पहिल्या तीनमध्येही नाहीत. 

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. देशात सध्या ५जीची डिमांड वाढू लागली आहे. २०२३ मध्ये ५जीच्या स्मार्टफोनच्या मार्केट शेअरमध्ये ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ १२२ टक्क्यांची आहे. 

यामुळे सारी गणितेच बदलून गेली आहे. 23 टक्के वाट्यासह सॅमसंग फाईव्ह जी फोनच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. तर व्हीवोने १५ टक्के वाटा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक वनप्लसचा आहे. हे जरा धक्का देणारे आहे. कारण वनप्लसचे फाईव्ह जी फोन हे २० हजारांपासून सुरु होतात. तर शाओमी, रेडमी, रिअलमी सारख्या कंपन्यांचे फाईव्ह जी स्मार्टफोन हे १२-१३ हजारांपासून सुरु होता. यात शाओमीचा पोको देखील ब्रँड आहे. परंतु एवढे स्वस्त फोन विकूनही या कंपन्या कुठेच दिसत नाहीएत. 

लोकांचा खरेदी पॅटर्न बदललाय?फाईव्ह जी फोन घेताना लोकांचा ओढा हा २५ हजार रुपयांच्या रेंमकडे वळला आहे. या रेंजमध्ये दरवर्षागणिक ७१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ४जी फीटर फोन मार्केटमध्ये जिओमुळे ५ टक्क्यांची वाढ कायम आहे. २जी फोनच्या शिपमेंटमध्ये १२ टक्क्यांची घट झाली आहे.  

टॅग्स :5G५जीsamsungसॅमसंगVivoविवोOneplus mobileवनप्लस मोबाईलxiaomiशाओमी