शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशात लवकरच '5G' ची क्रांती; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 11:50 IST

Reliance Jio 5G, Mukesh Ambani news: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

भारतीय बाजारपेठेत 5G च्या स्मार्टफोननी रुंजी घालायला सुरुवात केली आहे. २० ते ३० हजारांत वनप्लस, मोटरोला, व्हिवोचे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. कोणाचा स्मार्टफोन किती स्वस्त, त्यामध्ये प्रोसेसर कोणता आदी चर्चा होत असतानाच देशात 5G नेटवर्क कधी सुरु होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी दुसऱ्या सहामाहीत भारतात रिलायन्स जिओ (Reliance Jio) 5G सेवा लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. तसेच यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जेव्हापर्यंत सोपे धोरणात्मक बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग व स्वस्त बनविले जाणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाहीय, असेही ते म्हणाले. 

Vivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर

2021 मध्ये जिओ भारतात '5G' ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क स्वदेशी असेल. याशिवाय हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीदेखील स्वदेशीच असणार आहे. जिओच्या माध्यमातून आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहोत. भारताला '5G' स्पेक्ट्रमवर लवकरात लवकर निर्णय़ घ्यावा लागणार आहे. सोबतच जिओ ही '5G' क्रांतीची लीडर ठरणार आहे.  येत्या काही दिवसांत भारतात सेमी कंक्टरचा उत्पादन हब होण्याची शक्यता आहे. आम्ही सेमी कंडक्टरच्या आयातीच्या भरवश्यावर राहू शकत नाही, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. 

भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन लाँच; जाणून घ्या Moto G 5G ची किंमत आणि फिचर्स

देशात सध्या 30 कोटी 2G फोन वापरणारे आहेत. त्यांच्यापर्यंत स्मार्टफोन पोहोचण्याची गरज आहे. यासाठी नीतिगत हस्तक्षेपाची गरज आहेय  अंबानी यांनी सांगितले की, आम्ही डिजिटली खूप चांगल्याप्रकारे जोडले गेलो आहोत. तरीही ३० कोटी लोक अद्याप टूजी वापरत आहेत. 

‘फाइव्ह जी’मुळे होणारे बदल

‘फाइव्ह जी’मुळे दूरसंचार यंत्रणेत दाखल होणारे हे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत. ३१ जुलै १९९५ रोजी मोबाइलचे तंत्रज्ञान भारतात दाखल झाले. तेव्हा एका मिनिटाच्या कॉलसाठी १६.८० रुपये मोजावे लागत होते. आता व्हॉइस कॉल जवळपास विनामूल्य झाले आहेत. चीनपाठोपाठ सर्वाधिक मोबाइल ग्राहक भारतात आहेत. या लक्षणीय प्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण होत असून यापुढील दूरसंचार क्षेत्रातील वाटचाल अधिक आश्चर्यकारक असेल, अशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट आॅफटेक्नॉलॉजीचे संचालक अभय करंदीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

‘टू जी’मध्ये फक्त संभाषण शक्य होते. ‘थ्री जी’मध्ये डेटा दाखल झाला, मात्र त्याचा वेग अत्यंत कमी होता. ‘फोर जी’ दाखल झाल्यानंतर केवळ वेगच वाढला नाही तर आपले संभाषणही डेटाच्या माध्यमातून सुरू झाले. परंतु, हे तंत्रज्ञान फोन, टॅब आदींपर्यंतच मर्यादित होते. ‘फाइव्ह जी’मध्ये इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड १० पटीने वाढणार असून मशिन टू मशिन संपर्क यंत्रणा स्थापन करणे शक्य होणार आहे. त्या परिस्थितीत असंख्य कामांसाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरजच शिल्लक राहणार नाही. ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’चे हे युग असेल. दैनंदिन जीवनातले अनेक घटक या यंत्रणेच्या माध्यमातून जोडले जाणे शक्य होईल. त्यानंतर येणाऱ्या ‘सिक्स जी’ टेक्नॉलॉजीमुळे आपण डिजिटल वर्ल्डमध्ये प्रवेश करू, असे करंदीकर यांनी सांगितले. इंटरनेट दाखल झाल्यानंतर कोणत्या नावीन्यपूर्ण गोष्टी (इनोव्हेशन) येतील याची कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे फाइव्ह आणि सिक्स जी तंत्रज्ञान कोणकोणत्या नव्या संकल्पना आणि बदलांना जन्म देते हे येणारा काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील१९८९ साली संगणक दाखल झाल्यानंतर लाखो नोकºया जातील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ती निरर्थक ठरली. त्याच धर्तीवर ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील, ही भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, तो धोका टाळायचा असेल असेल तर बदलत्या परिस्थितीनुसार नवनवी कौशल्य आत्मसात करावी लागतील, असे करंदीकर यांनी स्पष्ट केले.

सुरक्षेचा धोका अपरिहार्यतंत्रज्ञानाच्या या अनिर्बंध शिरकावामुळे वैयक्तिक पातळीवर सायबर सुरक्षेचे अनेक मुद्दे उपस्थित होतील. ते अपरिहार्य आहेत. मात्र, नवे तंत्रज्ञान विकसित करताना रिस्क मॅनेजमेंटवर निश्चितच भर दिला जाईल. तसेच, वैयक्तिक पातळीवरही सुरक्षेबाबत प्रत्येकालाच अधिक सजग व्हावे लागणार आहे.

पहिला कॉल कोलकाता ते दिल्लीदरम्यानदेशात मोबाइलद्वारे पहिला कॉल कोलकाता ते दिल्लीदरम्यान करण्यात आला. कोलकाता येथील रॉयटर्स इमारतीमधून ज्योती बसू यांनी नवी दिल्लीतील संचार भवनात असलेल्या सुखराम यांना तो केला होता. मोदी टेल्स्ट्रा नामक कंपनीच्या मोबाइल नेट सेवेद्वारे हा कॉल करण्यात आला होता.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीReliance Jioरिलायन्स जिओReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशनRelianceरिलायन्स