शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान

By संतोष कनमुसे | Updated: October 11, 2025 18:35 IST

भारतीय आयटी टेक इंडस्ट्रीजमध्ये काही दिवसांपासून नोकरी कपात सुरू आहे. एआयचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे.

सध्या जगभरात एआयमुळे मोठी क्रांती झाली आहे. अनेकांनी आपल्या दररोजच्या कामात एआयचा वापर सुरू केलाय. टेक कंपन्यांमध्ये एआयमुळे मोठा फरक पडलाय. भारतीय टेक इंडस्ट्रीमध्येही एआयमुळे मोठा बदल झाला. अनेक कंपन्यांमध्ये नोकऱ्या कमी होत असल्याचे दिसतंय.

२०२५ च्या अखेरीस ५०,००० हून अधिक लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, असं बोललं जात आहे. या वर्षी अनेक कंपन्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात टाळेबंदी लागू केली आहे आणि काही कंपन्या अजूनही करत आहेत. या निर्णयामुळे टेक कंपन्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही

एका अहवालामध्ये आयटी तज्ञाने त्यांचा अनुभव सांगितला आहे. "एक दिवस एचआरने मला फोन केला आणि मला सांगितले की माझी आता गरज नाही. त्यांनी मला सांगितले की हा माझा शेवटचा दिवस आहे आणि मी लगेच निघू शकतो. त्यांनी सांगितले की हा कामगिरीशी संबंधित मुद्दा आहे आणि मला तीन महिन्यांचा पगार देऊन काढून टाकण्यात आले." त्याचप्रमाणे, काही कंपन्या ही प्रक्रिया हळू पद्धतीने करत आहेत. व्यवस्थापन छुप्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे.

टीसीएसने जुलैमध्ये मार्च २०२६ पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २% किंवा अंदाजे १२,००० लोकांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली. फक्त TCSच नाही तर अनेक मोठ्या आणि लहान टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना शांतपणे राजीनामा देण्यास किंवा इतर नोकऱ्या शोधण्यास सांगत आहेत. २०२३ ते २०२४ दरम्यान अंदाजे २५,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल आणि या वर्षी ही संख्या दुप्पट होऊ शकते.

छुप्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची कपात सध्या भारतीय आयटी आणि तंत्रज्ञान उद्योगासाठी एक मोठा धोका निर्माण करत आहे. अंदाजानुसार, वर्षाच्या अखेरीस ५०,००० नोकऱ्या जाऊ शकतात.

कंपन्या एआयचा वापर वाढवत आहेत

कंपन्या एआयचा वापर वाढवत आहेत. म्हणूनच कंपन्या अतिरिक्त कर्मचारी कमी करत आहेत. एआय अनेक कामे करत आहे. यामुळे मानवी कर्मचार्‍यांची गरज कमी होत आहे. टीसीएस आणि एक्सेंचरने एकत्रितपणे जागतिक स्तरावर २३,००० हून अधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत. एक्सेंचरने ८६५ मिलियन डॉलर्सच्या खर्च कपात योजनेचा भाग म्हणून जून ते ऑगस्ट दरम्यान ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

English
हिंदी सारांश
Web Title : 50,000 jobs at risk in industry due to AI adoption.

Web Summary : AI advancements threaten 50,000 jobs in the Indian tech industry by 2025. Companies are quietly reducing workforce, using AI for tasks, leading to silent layoffs. TCS and Accenture have already cut thousands of jobs globally due to this shift.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञानjobनोकरी