शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

इथल्या कष्टकरी, श्रमिकांना जगण्यासाठी उभारी हवीय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:45 PM

दोन महिन्यांहून अधिक काळ लादलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. त्यामुळे टाळेबंदीचा परतीचा प्रवास सुरू झाला.

दोन महिन्यांहून अधिक काळ लादलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. त्यामुळे टाळेबंदीचा परतीचा प्रवास सुरू झाला, असे म्हणायला हरकत नाही. जनजीवन पूर्वपदावर येणार असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत आपली दिनचर्या सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले. परंतु या टप्पयावर शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेत महत्त्वाचा बदल झाला, तो म्हणजे अगदी सुरुवातीला देशभर टाळेबंदी सुरू करताना प्रधानमंत्र्यांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याची भूमिका घेतली होती. त्यात बदल करून आता कोरोनाशी युद्ध नव्हे तर कोरोनासह जगायला शिकू या, अशी भूमिका आहे.

महाराष्ट्र राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी नुकतेच लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या मते महाराष्ट्रात कोरोना प्रसाराचा वेग राज्यात कमी झाला आहे. एका माणसाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तो इतर किती जणांना संसर्ग करू शकतो, याला ‘संसर्गदर’ म्हणतात. तो आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये ४ च्या आसपास होता तर आता आपल्या सर्वांगीण प्रयत्नामुळे १.२३ पर्यंत खाली आला आहे. तो आणखीन खाली येण्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे आहे. 

एकीकडे शासकीय अधिकारी भलावण करतात तर दुसरीकडे सोलापुरातील कष्टकºयांनी व्यापलेल्या भागातील चित्र चिंता करायला लावतेय. बाधितांची संख्या, मृतांची संख्या, रुग्णसेवेची कमतरता गरीब रुग्णांची हेळसांड आणि खासगी डॉक्टरांचा नकार, अशा अनेक गोष्टींमुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली झाली. राज्य शासन आणि प्रशासन सोलापूरविषयी उशिरा का होईना जागे झाले हेही नसे थोडके. इथले कारखानदार आणि कष्टकरीवर्ग खूपच भयभीत आणि भविष्याविषयी चिंतित आहेत. टाळेबंदी उठून जनजीवन सुरू झाले तरीही मोकळेपणाने सहभाग देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. सगळेच अस्वस्थ आहेत. कारण टाळेबंदीच्या काळातील श्रमिकांचा अनुभव खूपच जीवघेणा होता, दुर्दैवाने अजूनही आहे. हातावर पोट असणाºयांना उपाशीपोटी राहावे लागले. त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही.. म्हणून स्वत:च्या डोळ्यांदेखत बायको, मुलांना तडफडताना पाहिलेल्या मजुरांची जगण्याची उमेद खचली, तर कारखानदार या महामारीने हादरून गेले आहेत. कारखाने चालू करण्याच्या मानसिकतेत नाहीत. 

खरेतर कोरोना विषाणूने इथल्या समाजजीवनामध्ये विष कालवले असेच म्हणावे लागेल. आजपर्यंत ज्यांच्यासोबत एकत्रित राहिलो त्यांच्याशी दूर राहावे लागतेय. श्रीमंत लोकांचा कष्टकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तसं पाहिलं तर ‘सोशल डिस्टन्स’मुळे समाजातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवहारालाच मर्यादा आल्या. समाज दुभंगला. देवळे, मशिदी, चर्च बंद. शाळा-महाविद्यालये बंद. सण, उत्सव, परंपरा साजरा करता येत नाहीत. त्यामुळे लोकांनी जन्मल्यापासून पोसलेली सांस्कृतिक मानसिकता घायाळ झाली. लग्न, वाढदिवस. जयंत्या, पुण्यतिथ्या अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आली. शतकानुशतकांची परंपरा असणारी पंढरीची वारी यंदा पायी जाणार नाही. ही गोष्टच लाखो वारकºयांना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या मान्य न होणारी आहे. हॉटेल्स, मॉल्स, सिनेमा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, नृत्य, गाणी आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमांवर बंदी आल्यामुळे लोकांच्या भावना आणि मनं थिजली. पूर्वीप्रमाणे आप्तेष्टांच्या भेटीगाठी थांबल्यामुळे व्यक्त होणं थांबलं. गप्पा बंद झाल्या. मोकळं होणंच थांबल्यामुळे सगळेच अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थताच कष्टकºयांच्या अनारोग्याला कारणीभूत ठरते. आर्थिक परिस्थिती बदलल्याशिवाय आरोग्य सुधारणे शक्य नाही. 

नाशिकच्या मालेगावमधील यंत्रमाग कारखाने चालू झाले, तर मग सोलापुरातील कारखाने बंद का? केंद्रीय मंत्रिमंडळाने आत्मनिर्भर भारत घोषित करून लघु आणि मध्यम उद्योग सक्षम करण्याची योजना जाहीर केली, त्याचा फायदा घेत सोलापुरातील चादर कारखाने सुरू व्हायला हवेत. त्यातून कारखानदारांचे पुनर्वसन आणि कामगारांना रोजगार मिळेल. पोटभर जेवण आणि अंगभर काम मिळाले की, आरोग्य आपोआप सुधारेल. हे सारं व्यक्त होण्याचा मथितार्थ एकच आहे. इथल्या कष्टकरी, श्रमिकांना जगण्यासाठी उभारी हवीय.. एवढेच...!- प्रा. विलास बेत (लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी