शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

 नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी लोकांचे काम आणि आयुष्याचा समतोल ढळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:53 IST

वर्क लाईफ बॅलन्सची त्यांची संकल्पना खूपच सकारात्मक आहे.

ठळक मुद्देचौथ्या औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर आपण आहोतमनुष्यविरहित उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोनच गोष्टींवर विचार चालूआपण दिवसेंदिवस सर्वच आघाड्यांवर समतोल हरवून चाललो आहोत

पाश्चिमात्य जगातील काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या. त्यापैकी तिकडच्या लोकांची काम आणि आयुष्याचा समतोल राखण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटली. वर्क लाईफ बॅलन्सची त्यांची संकल्पना खूपच सकारात्मक आहे. कामाच्या वेळेत पूर्णपणे एकाग्रचित्ताने काम करणे आणि एकदा काम संपले की मी आणि माझं कुटुंब यापलीकडे कामाच्या ठिकाणच्या गोष्टी, ताणतणाव अजिबात घ्यायचा नाही, यावर त्यांचा कटाक्ष असतो. सकाळी सात वाजता काम सुरू होते. म्हणजे आॅफिसमध्ये येणे नव्हे तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली असते. त्यासाठी १० मिनिटे आधी कामाच्या ठिकाणी येऊन वेळेवर काम सुरू केले जाते. तेही कुणाच्याही सांगण्याची वाट न पाहता. बायोमेट्रिक्स तिकडेही आहे. परंतु त्याचा दुरुपयोग बिलकुल होत नाही. याउलट आपल्याकडे ती शिस्त कशी मोडता येईल किंवा कुणालाही न जमलेली गोष्ट मी कशी केली, हे सांगण्याची अहमहमिका सुरू असते. यामुळे आपण कामाच्या ठिकाणी आणि व्यक्तिगत आयुष्यात दोन्हींकडे समाधानी नसतो. तिकडे काय काम करतो त्यापेक्षा ते कसे करतो, यावर लोकांची प्रतिष्ठा अवलंबून असते.

आपल्याकडे विशेषत: सरकारी कार्यालयातील वातावरण पाहिले तर ही तफावत अधिक प्रकर्षाने जाणवते. सरकारी कार्यालयात साहेब आलेत का, असे विचारावे लागते. आलेत तर मग त्यांना भेटू शकतो का, असे विचारल्यावर उत्तर येते ते फार व्यस्त आहेत थोड्या वेळाने या, असे बाहेरचे शिपाई किंवा त्यांचे कनिष्ठ सांगतात. आत साहेबांनी अद्याप कामाला सुरुवात पण केलेली नसते. संध्याकाळी कार्यालयाची वेळ संपल्यानंतर ओव्हरटाईम करण्याची हौस असते. टेबलवर फायलींचा गट्टा असणे म्हणजे साहेब किती काम करतात, हे इतरांना कळावे, यासाठी केलेली सोय असते. वेळ कधीच पाळायची नाही, अशीच जणू सरकारी अधिकाºयांची समजूत झालेली असते. आपल्याकडे येणारे गोरगरीब लोक आपली रोजी बुडवून आलेले असतात, याविषयी त्यांना सोयरसुतक नसते.

याउलट खाजगी कंपन्यांमध्ये विशेषत: अलीकडील प्रशंसाप्राप्त कापोर्रेट कंपन्यांमध्ये काम करणारी नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी वर्कोर्होलिक लोकांचे आयुष्य पूर्णपणे असमतोल आणि बिघडलेले दिसते. सतत ताणतणाव आणि स्पर्धेत गुंतल्यामुळे मानसिक, भावनिक संतुलन बिघडलेले असते. खूप पैसे कमवायचे, मोठ्या पदावर जाण्याची धडपड यामुळे आयुष्य आणि स्वत:वर होणाºया परिणामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारी ही नवी पिढी आयुष्याचे संतुलन घालवून बसली आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या रोगांच्या अवघ्या चाळिशीत आहारी गेलेल्यांचे प्रमाण वाढत आहे. खरेतर काम करून पैसे मिळवायची ते शांतपणे आयुष्य जगण्यासाठी, कुटुंबासह समाधानी राहण्यासाठी ही गोष्टच विसरलेल्या अशा मंडळीला नव्याने वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच आयुष्याचे व्यवस्थापन शिकविण्याची वेळ आलेली आहे.

पाश्चिमात्यांमध्ये याकडे कटाक्षाने पाहिले जाते. तिकडे वीकेंड म्हणजे आठवडाभर काम केल्यानंतर सुट्टीचे दिवस कुटुंबीय आणि स्वत:साठी असतात. त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाहीत. याउलट आपल्याकडे अशा आयुष्य आणि कामाचे समतोल सांभाळू न शकल्याने असमाधानी आणि नाराज असलेले लोक हाताखालच्या लोकांना आॅफिसची वेळ संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी बोलावून त्यांनाही त्रास देण्यात असुरी आनंद मिळवीत असतात. हे काम आणि आयुष्याचे समतोल बिघडलेल्या अनेकांनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना आपण पाहतो. याची जबाबदारी जशी वैयक्तिक आपली आहे तितकीच उद्योग, कंपन्या आणि आस्थापनांची देखील आहे. शासनाकडे अशा विषयांसाठी अजिबात वेळ नाही.

समाजशास्त्र आणि व्यवस्थापन शिकविणाºयांना याचे महत्त्वच कळले नाही. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर आपण आहोत, त्यामध्ये मनुष्यविरहित उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोनच गोष्टींवर विचार चालू आहे. अशा व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या काम आणि आयुष्याचा समतोल हरवलेल्यांना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार, याचा विचार मनात आला तरी जीवाचा थरकाप उडतो. जग झपाट्याने पुढे जातंय. आपण दिवसेंदिवस सर्वच आघाड्यांवर समतोल हरवून चाललो आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. -प्रा. विलास बेत(समाजशास्त्राचे अभ्यासक) 

टॅग्स :SolapurसोलापूरHuman Traffickingमानवी तस्करी