शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

 नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी लोकांचे काम आणि आयुष्याचा समतोल ढळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:53 IST

वर्क लाईफ बॅलन्सची त्यांची संकल्पना खूपच सकारात्मक आहे.

ठळक मुद्देचौथ्या औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर आपण आहोतमनुष्यविरहित उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोनच गोष्टींवर विचार चालूआपण दिवसेंदिवस सर्वच आघाड्यांवर समतोल हरवून चाललो आहोत

पाश्चिमात्य जगातील काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या. त्यापैकी तिकडच्या लोकांची काम आणि आयुष्याचा समतोल राखण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटली. वर्क लाईफ बॅलन्सची त्यांची संकल्पना खूपच सकारात्मक आहे. कामाच्या वेळेत पूर्णपणे एकाग्रचित्ताने काम करणे आणि एकदा काम संपले की मी आणि माझं कुटुंब यापलीकडे कामाच्या ठिकाणच्या गोष्टी, ताणतणाव अजिबात घ्यायचा नाही, यावर त्यांचा कटाक्ष असतो. सकाळी सात वाजता काम सुरू होते. म्हणजे आॅफिसमध्ये येणे नव्हे तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली असते. त्यासाठी १० मिनिटे आधी कामाच्या ठिकाणी येऊन वेळेवर काम सुरू केले जाते. तेही कुणाच्याही सांगण्याची वाट न पाहता. बायोमेट्रिक्स तिकडेही आहे. परंतु त्याचा दुरुपयोग बिलकुल होत नाही. याउलट आपल्याकडे ती शिस्त कशी मोडता येईल किंवा कुणालाही न जमलेली गोष्ट मी कशी केली, हे सांगण्याची अहमहमिका सुरू असते. यामुळे आपण कामाच्या ठिकाणी आणि व्यक्तिगत आयुष्यात दोन्हींकडे समाधानी नसतो. तिकडे काय काम करतो त्यापेक्षा ते कसे करतो, यावर लोकांची प्रतिष्ठा अवलंबून असते.

आपल्याकडे विशेषत: सरकारी कार्यालयातील वातावरण पाहिले तर ही तफावत अधिक प्रकर्षाने जाणवते. सरकारी कार्यालयात साहेब आलेत का, असे विचारावे लागते. आलेत तर मग त्यांना भेटू शकतो का, असे विचारल्यावर उत्तर येते ते फार व्यस्त आहेत थोड्या वेळाने या, असे बाहेरचे शिपाई किंवा त्यांचे कनिष्ठ सांगतात. आत साहेबांनी अद्याप कामाला सुरुवात पण केलेली नसते. संध्याकाळी कार्यालयाची वेळ संपल्यानंतर ओव्हरटाईम करण्याची हौस असते. टेबलवर फायलींचा गट्टा असणे म्हणजे साहेब किती काम करतात, हे इतरांना कळावे, यासाठी केलेली सोय असते. वेळ कधीच पाळायची नाही, अशीच जणू सरकारी अधिकाºयांची समजूत झालेली असते. आपल्याकडे येणारे गोरगरीब लोक आपली रोजी बुडवून आलेले असतात, याविषयी त्यांना सोयरसुतक नसते.

याउलट खाजगी कंपन्यांमध्ये विशेषत: अलीकडील प्रशंसाप्राप्त कापोर्रेट कंपन्यांमध्ये काम करणारी नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी वर्कोर्होलिक लोकांचे आयुष्य पूर्णपणे असमतोल आणि बिघडलेले दिसते. सतत ताणतणाव आणि स्पर्धेत गुंतल्यामुळे मानसिक, भावनिक संतुलन बिघडलेले असते. खूप पैसे कमवायचे, मोठ्या पदावर जाण्याची धडपड यामुळे आयुष्य आणि स्वत:वर होणाºया परिणामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारी ही नवी पिढी आयुष्याचे संतुलन घालवून बसली आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या रोगांच्या अवघ्या चाळिशीत आहारी गेलेल्यांचे प्रमाण वाढत आहे. खरेतर काम करून पैसे मिळवायची ते शांतपणे आयुष्य जगण्यासाठी, कुटुंबासह समाधानी राहण्यासाठी ही गोष्टच विसरलेल्या अशा मंडळीला नव्याने वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच आयुष्याचे व्यवस्थापन शिकविण्याची वेळ आलेली आहे.

पाश्चिमात्यांमध्ये याकडे कटाक्षाने पाहिले जाते. तिकडे वीकेंड म्हणजे आठवडाभर काम केल्यानंतर सुट्टीचे दिवस कुटुंबीय आणि स्वत:साठी असतात. त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाहीत. याउलट आपल्याकडे अशा आयुष्य आणि कामाचे समतोल सांभाळू न शकल्याने असमाधानी आणि नाराज असलेले लोक हाताखालच्या लोकांना आॅफिसची वेळ संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी बोलावून त्यांनाही त्रास देण्यात असुरी आनंद मिळवीत असतात. हे काम आणि आयुष्याचे समतोल बिघडलेल्या अनेकांनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना आपण पाहतो. याची जबाबदारी जशी वैयक्तिक आपली आहे तितकीच उद्योग, कंपन्या आणि आस्थापनांची देखील आहे. शासनाकडे अशा विषयांसाठी अजिबात वेळ नाही.

समाजशास्त्र आणि व्यवस्थापन शिकविणाºयांना याचे महत्त्वच कळले नाही. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर आपण आहोत, त्यामध्ये मनुष्यविरहित उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोनच गोष्टींवर विचार चालू आहे. अशा व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या काम आणि आयुष्याचा समतोल हरवलेल्यांना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार, याचा विचार मनात आला तरी जीवाचा थरकाप उडतो. जग झपाट्याने पुढे जातंय. आपण दिवसेंदिवस सर्वच आघाड्यांवर समतोल हरवून चाललो आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. -प्रा. विलास बेत(समाजशास्त्राचे अभ्यासक) 

टॅग्स :SolapurसोलापूरHuman Traffickingमानवी तस्करी