शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पशुप्राण्यांच्या अस्तित्वासाठी वन्यजीव मातेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:19 IST

पाणवठ्यांची निर्मिती;  कंदलगावच्या माळरानावर वनराई फुलवण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्दे जशी मुलांची शाळा फुलवली तशी चिमण्यांची आणि अन्य पशुपक्ष्यांची शाळा भरवण्याचे स्वप्नपशु-पक्ष्यांबद्दल प्रेम वाढावे, मानवता निर्माण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभरातील काही वेळ याचे धडेमाळरानावर चिवचिवाट बहरावा म्हणून वर्षभरात हजार वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली

काशिनाथ वाघामारे 

सोलापूर : अनेक वर्षे शैक्षणिक सेवेतून सरस्वतीची पूजा करणाºया वन्यजीवमातेने यंदा उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी माळरानावर पाणवठे तयार केले आहेत. तसेच या माळरानावर चिवचिवाट बहरावा म्हणून वर्षभरात हजार वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. बस्स ! गरज आहे...सर्वसामान्यांच्या योगदानाची.

अपर्णा बिराप्पा शेजाळ असे त्या वन्यजीव मातेचे नाव. दक्षिण सोलापूर तालुक्यात कंदलगाव परिसरात ओसाड माळरानावर खासगी शाळा आणि महाविद्यालय उभारत असताना स्वत: परिश्रमातून असंख्य झाडी फुलवली़ येथून कोणी जात असेल तर हिरवळ आणि झाडी पाहून थोडा विसावा घेतो. जशी मुलांची शाळा फुलवली तशी चिमण्यांची आणि अन्य पशुपक्ष्यांची शाळा भरवण्याचे स्वप्न बाळगून या परिसरात चिमण्यांसाठी घरटी लटकावताहेत. पशु-पक्ष्यांबद्दल प्रेम वाढावे, मानवता निर्माण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभरातील काही वेळ याचे धडे त्या देतात तसेच शाकाहाराचे महत्त्वही त्या विद्यार्थ्यांना पटवून सांगतात.

 इतकेच नव्हे तर स्वत:च्या घराभोवतीही पक्ष्यांसाठी पाण्याच्या लोटकी आणि खाद्यासाठी भांडी लावली आहेत. घरातून शाळेला निघताना त्या पिशवीत काही प्रमाणात धान्य घेऊन निघतात आणि गावच्या माळरानावर पशुपक्ष्यांना घालतात़ हाच प्रयोग त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही करत आहेत़ आज त्यांच्या शिकवणीनुसार बहुतांश विद्यार्थी घरातून निघताना बाटलीभर पाणी आणतात आणि माळरानावर वाळणाºया झाडाला ते घालतात.

पर्यावरण आणि वन्यजीवाचा हा लळा त्यांना वडील मेजर शंकरराव खांडेकर आणि आई सिंधूताई खांडेकर यांच्याकडून लागला़ त्यांच्या या माणुसकीच्या कार्यात पती प्रा़ बिराप्पा शेजाळ हेदेखील सहभागी होतात़ 

शिकाºयाच्या तावडीतून हरणाची सुटका दक्षिण सोलापूर परिसरात हरणांचे प्रमाण आहे़ उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात हे वन्यजीव विहिरीपर्यंत जातात़ मागे दोन वर्षांपूर्वी असेच एक हरीण कंदलगाव परिसरात कोरड्या विहिरीत कोसळले़ या परिसरातील काही शिकारी लोक त्याला विहिरीतून बाहेर काढून लपवत घेऊन निघाले होते़ शाळेतून बाहेर पडलेल्या शेजाळ यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांना पोलिसांची आणि वनकायद्याची भीती घालून शिकाºयाच्या तावडीतून मुक्या जीवाची सुटका केली़ जखमी हरणावर उपचार करुन वनविभागाकडे त्याला सोपवले़ या आठवणीने त्यांच्या मुक्याजीवांविषयी असलेले प्रेम आणखी गडद करते.

भारतीय पक्ष्यांचे एक वैशिष्ट्य आहे की, ते घरटी केवळ भारतीय वृक्षावरच करतात़ सध्या महाराष्ट्रासह सोलापुरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आणि स्मार्ट सिटीत व्हीआयपी रोडवर परदेशी झाडं यापूर्वीच लावली गेली आहेत. या झाडावर एक पक्षीही बसत नाही, ना वास्तव्य करते़ त्यांच्या गरजा ओळखून कंदलगाव परिसरात रस्त्याच्या दुतर्फा हजार झाडी लावत आहोत़ त्यांच्यासाठी कृ त्रिम घरटी बसवत आहोत़ खाद्यही पुरवत आहोत़- अपर्णा शेजाळ, वन्यजीव माता

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentवातावरणwater shortageपाणीटंचाई