शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

.....म्हणूनच वीजबिल भरण्यास शेतकरी संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:21 IST

सोलापूर : वीज बिलाचा समावेश करून पिकांचे उत्पादन खर्च काढण्यात यावे, यासाठी गेल्या २० वर्षापासूनचा शेतकरी संघटनेचा लढा सुरू ...

सोलापूर : वीज बिलाचा समावेश करून पिकांचे उत्पादन खर्च काढण्यात यावे, यासाठी गेल्या २० वर्षापासूनचा शेतकरी संघटनेचा लढा सुरू आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत वीज बिल भरण्यास शेतकरी संघटनेचा विरोध असणार आहे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी मांडली आहे.

केंद्रीय अथवा राज्य कृषी मूल्य आयोग पिकांचा उत्पादन खर्च निश्चित करते. त्यात खते, औषधे, बियाणे, लागवड, मजुरीवर होणारा खर्च आदी बाबींचा समावेश केला जातो. मात्र वीज बिलाचा विचार होत नाही. ही बाब शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. २० वर्षापासूनची ही मागणी आहे. याबाबत शासन, कृषी मूल्य आयोग उदासीन आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचा वीज बिल भरण्यास विरोध होता.

शरद जोशी आणि राजू शेट्टी यांच्या याबाबत परस्पर भिन्न भूमिका असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. शरद जोशी यांचा वीज बिल भरण्यास सक्त विरोध होता, मात्र अतिरिक्त दंड, व्याज न आकारता शेतक-यांना योग्य वीजबिल आकारणी करावी तरच त्यांना बील भरणे शक्‍य होईल, अशी राजू शेट्टी यांची भूमिका आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात संघटनेने वीज बिलाबाबतची ताठर भूमिका बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र सरकारची भूमिका आडमुठेपणाची आहे.

------

दुय्यम दर्जाची वीज ही शेतीसाठी दिवसा बारा तास पुरवठा करण्याची संघटनेची मागणी आहे. रात्री उशिराने वीज पुरवठा केल्यास पाण्याचा अपव्यय होतो. मजूर मिळत नाहीत. सर्पदंश यासारखे प्रकार वाढतात. याकडे पटेल यांनी लक्ष वेधले. कारखान्यांना प्राधान्याने उच्च दाबाने वीज पुरवठा केला जातो तर कमी दाबाने वीजपुरवठा शेतीसाठी केला जातो. भारनियमन अथवा विजेचा लपंडाव शेतकर्यांच्याच नशिबी का असा सवाल त्यांनी विचारला आहे. कारखान्यात वीज गेली तर उत्पादन थांबवता येते, पण शेतीचे तसे नाही. वीज खंडित झाल्यानं शेतक-यांचे मोठे नुकसान होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

-------

कायदा एकतर्फी कसा असू शकतो ?

वीज अधिनियम २००५ नुसार रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त झाल्यास तो ४८ तासांत दुरुस्त करून दिला पाहिजे, अन्यथा पुढील दरतासाला ५० रुपये प्रत्येक शेतक-याला दंड देण्याची तरतूद आहे. आजही रोहित्र नादुरुस्त झाले तर किमान १५ दिवस दुरुस्त होत नाही. नाजूक पीके हातातून जातात. हंगामाच वाया जातो. त्यामुळे लग्ज, फ्यूज, ऑईल यासह किरकोळ साहित्याचा खर्च शेतक-यांना करावा लागतो. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी खर्च करतात. वास्तविक हा खर्च वीज कंपनीने केला पाहिजे.

------

वीज मंडळाची सामुग्री कालबाह्य

वीज पुरवठा करणा-या तारा कालबाह्य झाल्या आहेत. विशेषता: ग्रामीण भागातील विजेच्या तारा ४० वर्षापेक्षा अधिक वापरात आहेत. त्यामुळे तुटण्याचे प्रमाण वाढले, ठिणग्या पडून पुढे ही पिके जळून जात आहेत. यात शेतक-यांची मोठी हानी होत आहे. त्यांच्या नुकसानभरपाईची असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या कालमर्यादा निश्चित केल्या आहेत. त्याचे पालन होत नाही. याकडेही महामुद पटेल यांनी शासनाचे लक्ष वेधले.

------