शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
5
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
6
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
7
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
8
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
9
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
10
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
11
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
12
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
13
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
14
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
15
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
16
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
17
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
18
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
19
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
20
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Daily Top 2Weekly Top 5

.....म्हणूनच वीजबिल भरण्यास शेतकरी संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:21 IST

सोलापूर : वीज बिलाचा समावेश करून पिकांचे उत्पादन खर्च काढण्यात यावे, यासाठी गेल्या २० वर्षापासूनचा शेतकरी संघटनेचा लढा सुरू ...

सोलापूर : वीज बिलाचा समावेश करून पिकांचे उत्पादन खर्च काढण्यात यावे, यासाठी गेल्या २० वर्षापासूनचा शेतकरी संघटनेचा लढा सुरू आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत वीज बिल भरण्यास शेतकरी संघटनेचा विरोध असणार आहे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी मांडली आहे.

केंद्रीय अथवा राज्य कृषी मूल्य आयोग पिकांचा उत्पादन खर्च निश्चित करते. त्यात खते, औषधे, बियाणे, लागवड, मजुरीवर होणारा खर्च आदी बाबींचा समावेश केला जातो. मात्र वीज बिलाचा विचार होत नाही. ही बाब शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. २० वर्षापासूनची ही मागणी आहे. याबाबत शासन, कृषी मूल्य आयोग उदासीन आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचा वीज बिल भरण्यास विरोध होता.

शरद जोशी आणि राजू शेट्टी यांच्या याबाबत परस्पर भिन्न भूमिका असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. शरद जोशी यांचा वीज बिल भरण्यास सक्त विरोध होता, मात्र अतिरिक्त दंड, व्याज न आकारता शेतक-यांना योग्य वीजबिल आकारणी करावी तरच त्यांना बील भरणे शक्‍य होईल, अशी राजू शेट्टी यांची भूमिका आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात संघटनेने वीज बिलाबाबतची ताठर भूमिका बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र सरकारची भूमिका आडमुठेपणाची आहे.

------

दुय्यम दर्जाची वीज ही शेतीसाठी दिवसा बारा तास पुरवठा करण्याची संघटनेची मागणी आहे. रात्री उशिराने वीज पुरवठा केल्यास पाण्याचा अपव्यय होतो. मजूर मिळत नाहीत. सर्पदंश यासारखे प्रकार वाढतात. याकडे पटेल यांनी लक्ष वेधले. कारखान्यांना प्राधान्याने उच्च दाबाने वीज पुरवठा केला जातो तर कमी दाबाने वीजपुरवठा शेतीसाठी केला जातो. भारनियमन अथवा विजेचा लपंडाव शेतकर्यांच्याच नशिबी का असा सवाल त्यांनी विचारला आहे. कारखान्यात वीज गेली तर उत्पादन थांबवता येते, पण शेतीचे तसे नाही. वीज खंडित झाल्यानं शेतक-यांचे मोठे नुकसान होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

-------

कायदा एकतर्फी कसा असू शकतो ?

वीज अधिनियम २००५ नुसार रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त झाल्यास तो ४८ तासांत दुरुस्त करून दिला पाहिजे, अन्यथा पुढील दरतासाला ५० रुपये प्रत्येक शेतक-याला दंड देण्याची तरतूद आहे. आजही रोहित्र नादुरुस्त झाले तर किमान १५ दिवस दुरुस्त होत नाही. नाजूक पीके हातातून जातात. हंगामाच वाया जातो. त्यामुळे लग्ज, फ्यूज, ऑईल यासह किरकोळ साहित्याचा खर्च शेतक-यांना करावा लागतो. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी खर्च करतात. वास्तविक हा खर्च वीज कंपनीने केला पाहिजे.

------

वीज मंडळाची सामुग्री कालबाह्य

वीज पुरवठा करणा-या तारा कालबाह्य झाल्या आहेत. विशेषता: ग्रामीण भागातील विजेच्या तारा ४० वर्षापेक्षा अधिक वापरात आहेत. त्यामुळे तुटण्याचे प्रमाण वाढले, ठिणग्या पडून पुढे ही पिके जळून जात आहेत. यात शेतक-यांची मोठी हानी होत आहे. त्यांच्या नुकसानभरपाईची असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या कालमर्यादा निश्चित केल्या आहेत. त्याचे पालन होत नाही. याकडेही महामुद पटेल यांनी शासनाचे लक्ष वेधले.

------