शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दम लागेपर्यंत हापसावं लागतं, तेव्हा भरते घागर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:52 IST

गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली.

- अशोक कांबळेमोहोळ (जि. सोलापूर): वाड्या-वस्त्यांवर प्यायला पाणी नाही, ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे, त्यांच्या हातापाया पडून चार घागरी मागून घ्याव्या लागतात... इथे पाण्यासाठी भांडणे होतात, दम लागेपर्यंत अर्धा तास हापसावं तेंव्हा कुठं घागर भरते! असा आक्रोश होता खुनेश्वर गावातील ६५ वर्षांच्या सुभद्राबाई चव्हाण यांचा. गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली.मोहोळ शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या टोकाचे मराठवाड्याच्या सीमेवर त्या काळात निजाम संस्थानाच्या ताब्यात असणाºया या गावात मक्याच्या पिकाची रास असायची. निजामांनी बांधलेल्या विहिरी गावात आहेत. शंभर वर्षे गावाला पाणीपुरवठा करायच्या, परंतु आज या सर्व विहिरी कोरड्या पडल्यात. आज पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयापाई हजारो रुपये किमतीची जनावरे विकण्याची वेळ गावकऱ्यांवर आली असून पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे.तीन हजार लोकसंख्या असणाºया या गावात सातशे कुटुंबे आहेत. निजामाने पाडलेल्या विहिरीसह गावात व परिसरात १०० हून अधिक विहिरी आहेत, परंतु मागील वीस वर्षांपासून पाऊस कमी पडत चालल्याने त्या दिवसेंदिवस कोरड्या पडत गेल्या. आज तर सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. म्हणून ग्रामपंचायतीसह वाड्या-वस्त्यांवर लोकांनी बोअर घेतले आहेत.गेल्या दोन महिन्यापूर्वी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा म्हणून ठराव दिला आहे, परंतु अद्याप गावाला टँकर मिळाला नसल्याचे माजी सरपंच चंद्रहार चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळSolapurसोलापूर