शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दम लागेपर्यंत हापसावं लागतं, तेव्हा भरते घागर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:52 IST

गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली.

- अशोक कांबळेमोहोळ (जि. सोलापूर): वाड्या-वस्त्यांवर प्यायला पाणी नाही, ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे, त्यांच्या हातापाया पडून चार घागरी मागून घ्याव्या लागतात... इथे पाण्यासाठी भांडणे होतात, दम लागेपर्यंत अर्धा तास हापसावं तेंव्हा कुठं घागर भरते! असा आक्रोश होता खुनेश्वर गावातील ६५ वर्षांच्या सुभद्राबाई चव्हाण यांचा. गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली.मोहोळ शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या टोकाचे मराठवाड्याच्या सीमेवर त्या काळात निजाम संस्थानाच्या ताब्यात असणाºया या गावात मक्याच्या पिकाची रास असायची. निजामांनी बांधलेल्या विहिरी गावात आहेत. शंभर वर्षे गावाला पाणीपुरवठा करायच्या, परंतु आज या सर्व विहिरी कोरड्या पडल्यात. आज पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयापाई हजारो रुपये किमतीची जनावरे विकण्याची वेळ गावकऱ्यांवर आली असून पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे.तीन हजार लोकसंख्या असणाºया या गावात सातशे कुटुंबे आहेत. निजामाने पाडलेल्या विहिरीसह गावात व परिसरात १०० हून अधिक विहिरी आहेत, परंतु मागील वीस वर्षांपासून पाऊस कमी पडत चालल्याने त्या दिवसेंदिवस कोरड्या पडत गेल्या. आज तर सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. म्हणून ग्रामपंचायतीसह वाड्या-वस्त्यांवर लोकांनी बोअर घेतले आहेत.गेल्या दोन महिन्यापूर्वी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा म्हणून ठराव दिला आहे, परंतु अद्याप गावाला टँकर मिळाला नसल्याचे माजी सरपंच चंद्रहार चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळSolapurसोलापूर