शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी फाउंडेशनच्या कामावर झाला विवाहसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:26 IST

वॉटर कप स्पर्धेतील सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणाबरोबर मनसंधारणाचाही आगळावेगळा सोहळा

ठळक मुद्देनवरा-नवरीचे श्रमदान चालू असल्याचे पाहून वºहाडी मंडळीदेखील टिकाव, खोºया, पाट्या हातात घेऊन श्रमदानासाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसले.विवाह करण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणून जयघोष करीत बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात अशा घोषणा देण्यात आल्या.

अमर गायकवाड 

माढा : आयुष्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या लग्नसोहळ्यात नवदांपत्याने ग्रामस्थांसोबत श्रमदान करीत आयुष्याची सुखद सुरुवात केली. हा विवाहसोहळा शनिवार, दि. २७ रोजी दुपारी पार पडला. स्मशानभूमीच्या जवळील माळरानावर आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नसोहळ्यानंतर हा कार्यक्रम करत आदर्श निर्माण करून देण्याचे काम जामगाव येथील कुमार उत्तम चव्हाण या युवकाने केले. त्याचा लग्नसोहळा मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील अमृता भाऊराव देशमुख हिच्याशी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामावर पार पडला. 

या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यास नवरा-नवरी बैलगाडीतून श्रमदानस्थळी आले होते. या विवाहाने महाराष्ट्रात नवीन पायंडा पाडला असून, यावेळी वºहाडी मंडळींनी ४० सीसीटी खोदल्या. यामध्ये दीड लाख लिटर पाणी (पंधरा टँकर पाणी) पावसाची साठवणूक होणार आहे. यावेळी नवरा-नवरीसह वºहाडी मंडळींनी ४२ अंश सेल्सिअस तापमानात देखील श्रमदान केले. या निमित्ताने दोन परिवारांचे जलसंधारणाबरोबर मनसंधारणाचे काम झाले. गाव पाणीदार करण्याचे ध्येय ठेवून लोधवडे (ता. माण, जि. सातारा) या ठिकाणी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी ग्रामस्थांसह कुमार चव्हाण गेले होते. स्पर्धेचे काम चालू असताना त्यांचा विवाह ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील अमृता भाऊराव देशमुख यांच्याशी ठरला.

पाणी फाउंडेशनचे काम चालू असल्याने याच ठिकाणी विवाह करण्याची इच्छा नातेवाईकांना बोलून दाखविली. मुलीकडील मंडळींनीही या विवाहास होकार कळवत दुष्काळ मुक्तीसाठी लढत असलेल्या कुटुंबीयांना साथ देण्याचे ठरवले. कोणताही बडेजाव न करता विवाहानिमित्त होणारा वायफळ खर्च टाळत श्रमदान हाच आहेर म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर नातलग, मित्रमंडळी यांना विवाहाचे निमंत्रण पाठविण्यात आले होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र मास्टर ट्रेनर ज्योती सुर्वे, मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे, रोटरी फाउंडेशनचे डॉ. सुभाष पाटील, डॉ. संदीप टोंगळे, तालुका समन्वयक राजकुमार माने, सुशांत गायकवाड, टेक्निशियन चेतन जाधव अजिंक्य पवार, सुप्रिया जंगले, सामाजिक प्रशिक्षक वसीम शेख, प्रतिमा सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. पाणी बचती सारखा सामाजिक संदेश देत आगळावेगळा विवाह सोहळा केल्याचा आनंद होत असून स्पर्धा संपेपर्यंत आम्ही श्रमदान करणार असल्याचे नववधू अमृताने सांगितले.

मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात...नवरा-नवरीचे श्रमदान चालू असल्याचे पाहून वºहाडी मंडळीदेखील टिकाव, खोºया, पाट्या हातात घेऊन श्रमदानासाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसले. विवाह करण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणून जयघोष करीत बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात अशा घोषणा देण्यात आल्या. जामगावचे सरपंच सुहास पाटील व ब्रह्मपुरीचे सरपंच विजयसिंह पाटील या दोन्ही गावच्या सरपंचांनी सपत्नीक श्रमदान केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे यांच्याकडून दहा हजार रुपयांची रोख मदत पाणी फाउंडेशनसाठी देण्यात आली. श्रमदान हाच आहेर म्हणून वºहाडी मंडळींकडून श्रमदान करून घेण्यात आले. पाणी अडवण्याचे महत्व सर्वांना समजले पाहिजे यासाठी वेगळ्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नवरदेव कुमार चव्हाण यांनी  सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाmarriageलग्नdroughtदुष्काळ