शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले; रावसाहेब दानवे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 12:26 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवार, मायावती, अब्दुल्ला यांना टोला

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाºयांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये झालाजे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले - दानवे

सोलापूर : भाजपा आणि शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मायावती, शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला करतात. पण ही मंडळी मागील काळात आमच्या पाठिंब्याबर सत्तेत होती. जे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाºयांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये झाला, यावेळी ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेना नेत्या नीलम गोºहे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत, भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, महापौर शोभा बनशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख महेश कोठे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजपाच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे, सभागृह नेते संजय कोळी, पुरुषोत्तम बरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, मोहिनी पत्की, हेमंत पिंगळे आदी उपस्थित होते. 

दानवे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते विकासकामांवर मते मागू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. काही लोक भाजपा-सेनेला जातीयवादी म्हणतात. त्यातील शरद पवार आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. मायावती आमच्या काळात मंत्री होत्या, तर फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत आमची युती झाली होती. आम्हाला जातीयवादी म्हणणाºयांची तोंडं खरकटी आहेत. मागील निवडणुकीत महायुतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. यंदा ४८ पैकी ४८ जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

दोन देशमुखांबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही : देशमुख- अनेक वर्षे सत्ता भोगूनही या शहराची काय अवस्था आहे. हद्दवाढ भागात लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही. या शहराला मिळालेल्या गेल्या १५ वर्षातील आणि आमच्या पाच वर्षातील निधीचा हिशेब करायला मी तयार आहे. या जिल्ह्याला आठ लाल दिव्याच्या गाड्या होत्या. या गाड्यांमुळे जिल्ह्याचा काय फायदा झाला. या शहराचे कसे वाटोळे झाले याचे चिंतन करावे लागेल. हे आम्हाला सांगतात की दोन देशमुख काय कामाचे? यांना नैतिक अधिकार नाही, असेही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेRaosaheb Danweरावसाहेब दानवेSharad Pawarशरद पवारmayawatiमायावती