शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

आम्हाला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले; रावसाहेब दानवे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 12:26 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवार, मायावती, अब्दुल्ला यांना टोला

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाºयांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये झालाजे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले - दानवे

सोलापूर : भाजपा आणि शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मायावती, शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला करतात. पण ही मंडळी मागील काळात आमच्या पाठिंब्याबर सत्तेत होती. जे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाºयांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये झाला, यावेळी ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेना नेत्या नीलम गोºहे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत, भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, महापौर शोभा बनशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख महेश कोठे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजपाच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे, सभागृह नेते संजय कोळी, पुरुषोत्तम बरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, मोहिनी पत्की, हेमंत पिंगळे आदी उपस्थित होते. 

दानवे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते विकासकामांवर मते मागू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. काही लोक भाजपा-सेनेला जातीयवादी म्हणतात. त्यातील शरद पवार आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. मायावती आमच्या काळात मंत्री होत्या, तर फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत आमची युती झाली होती. आम्हाला जातीयवादी म्हणणाºयांची तोंडं खरकटी आहेत. मागील निवडणुकीत महायुतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. यंदा ४८ पैकी ४८ जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

दोन देशमुखांबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही : देशमुख- अनेक वर्षे सत्ता भोगूनही या शहराची काय अवस्था आहे. हद्दवाढ भागात लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही. या शहराला मिळालेल्या गेल्या १५ वर्षातील आणि आमच्या पाच वर्षातील निधीचा हिशेब करायला मी तयार आहे. या जिल्ह्याला आठ लाल दिव्याच्या गाड्या होत्या. या गाड्यांमुळे जिल्ह्याचा काय फायदा झाला. या शहराचे कसे वाटोळे झाले याचे चिंतन करावे लागेल. हे आम्हाला सांगतात की दोन देशमुख काय कामाचे? यांना नैतिक अधिकार नाही, असेही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेRaosaheb Danweरावसाहेब दानवेSharad Pawarशरद पवारmayawatiमायावती