शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

वारीच्या वाटेवर 'ते' गोळा करतात कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 14:32 IST

लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा !

- गोपालकृष्ण मांडवकरपंढरपूर : लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा ! मात्र आळंदीहून निघालेली एक दिंडी वारीसोबत नव्हे तर वारी मागे चालत आहे. वारकऱ्यांनी केलेला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा पोत्यात जमा करण्याची त्यांची सेवा आळंदी पासूनच सुरू आहे.दक्षता कृती मंच आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशन पुणे या माध्यमातून हे कचरामुक्त दिंडी अभियान अर्थात निसर्ग भारी 5 जुलैपासून आळंदीहून सुरू झाले आहे. या दिंडीतील वारकरी स्वच्छता दुताच्या रूपाने आहेत. त्यांच्या हातात टाळ नव्हेत तर हातमोजे आहेत.

वारीच्या मार्गावरून दिंड्या की काही तासांनी त्यांची वारी निघते. वाटेवर दिसणारे प्लॅस्टिक, थर्मोकोल तसेच वारकऱ्यांकडून झालेला अन्य कचरा ते जमा करतात, पोत्यात भरतात आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या गावाजवळ असलेल्या डॉ. कुलकर्णी यांच्या शेतातील कंपोस्ट डेपोमध्ये जमा करतात.

दररोज कचरा उचलण्यासोबतच ते पर्यावरण रक्षणाचा संदेशही नागरिकांना देत असतात. यासाठी त्यांनी वारी मार्गावरील तिन्ही विद्यापीठांची मदत घेतली आहे. प्लॅस्टिक पत्रावळी न वापरता पानांच्या पत्रावळी वापरा असा संदेश ते देतात. तसेच स्टिलची ताटे वापरून पाण्याचा अपव्यय करण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या पानांच्या पत्रावळी वापरा असा संदेश ते वारकऱ्यांना देत असतात.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी