शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

वारीच्या वाटेवर 'ते' गोळा करतात कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 14:32 IST

लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा !

- गोपालकृष्ण मांडवकरपंढरपूर : लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा ! मात्र आळंदीहून निघालेली एक दिंडी वारीसोबत नव्हे तर वारी मागे चालत आहे. वारकऱ्यांनी केलेला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा पोत्यात जमा करण्याची त्यांची सेवा आळंदी पासूनच सुरू आहे.दक्षता कृती मंच आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशन पुणे या माध्यमातून हे कचरामुक्त दिंडी अभियान अर्थात निसर्ग भारी 5 जुलैपासून आळंदीहून सुरू झाले आहे. या दिंडीतील वारकरी स्वच्छता दुताच्या रूपाने आहेत. त्यांच्या हातात टाळ नव्हेत तर हातमोजे आहेत.

वारीच्या मार्गावरून दिंड्या की काही तासांनी त्यांची वारी निघते. वाटेवर दिसणारे प्लॅस्टिक, थर्मोकोल तसेच वारकऱ्यांकडून झालेला अन्य कचरा ते जमा करतात, पोत्यात भरतात आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या गावाजवळ असलेल्या डॉ. कुलकर्णी यांच्या शेतातील कंपोस्ट डेपोमध्ये जमा करतात.

दररोज कचरा उचलण्यासोबतच ते पर्यावरण रक्षणाचा संदेशही नागरिकांना देत असतात. यासाठी त्यांनी वारी मार्गावरील तिन्ही विद्यापीठांची मदत घेतली आहे. प्लॅस्टिक पत्रावळी न वापरता पानांच्या पत्रावळी वापरा असा संदेश ते देतात. तसेच स्टिलची ताटे वापरून पाण्याचा अपव्यय करण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या पानांच्या पत्रावळी वापरा असा संदेश ते वारकऱ्यांना देत असतात.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी