शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Water: वीर धरणातून नीरा नदीत सोडले पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 13:38 IST

Water: वीर धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळे वीर धरणातून सांडव्याव्दारे निरा नदीत ४ हजार ४१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

अकलूज - वीर धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळे वीर धरणातून सांडव्याव्दारे निरा नदीत ४ हजार ४१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, उजवा कालवा विद्युत गृहातुन १ हजार ४०० क्युसेस तर डावा कालवा विद्युत गृहातुन ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग असे एकुण निरा नदीत ६ हजार ११८ क्युसेस पाण्याचा विसर्ग आज (शनिवार) दुपारी १२ च्या सुमारास करण्यात आला असुन नदीत काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वीर धरण प्रशासनाने दिला आहे.

गत सप्ताहापासून निरा नदीवरील वीर,भाटघर, गुंजवणी, निरा-देवघर धरण पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरु असुन सर्वच धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढत होत आहे. वीर-भाटघर धरणावर निरा उजवा कालव्यावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपुर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या व शेतीसाठी सिंचनाच्या योजना असल्यामुळे या चार तालुक्यासाठी वीर धरण व त्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने सुखद बातमी असुन सध्या सुरु असलेल्या पावसामुळे वीर धरण ९२ टक्के, भाटघर धरण ४९ टक्के, निरादेवघर धरण ४२ टक्के तर गुंजवणी धरण ६८ टक्के भरले आहे.

वीर धरणाची परिस्थिती पाहता वीर धरणावरील सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे तसेच वीर धरण ९२ टक्के भरल्याने सर्व सारासार विचार करता वीर धरण प्रशासनाने निरानदीत पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय करुन आज शनिवारी दुपारी १२ वाजता वीर धरणातून निरा नदीत ४ हजार ४१४ क्युसेस विसर्ग सांडव्याव्दारे सोडण्यात आला आहे. सांडव्यातुन उजवा कालवा विद्युत गृहातील १ हजार ४०० क्युसेस व  डाव्या कालवा विद्युत गृहातील ३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग असे एकुण विद्युत गृहातील १ हजार ७०० क्युसेस व धरणातून ४ हजार ११४ असा एकुण ६ हजार ११८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सांडव्यातुन निरा नदीत सोडला आहे.

टॅग्स :WaterपाणीSolapurसोलापूर