शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

उजनी धरणातील पाण्यात दररोज एक टक्का होतेय घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:29 IST

गत मार्चमध्ये प्लस ५५ टक्के असलेल्या उजनीत आता वजा ११ टक्के पाणी 

ठळक मुद्देगेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लकचालू वर्षी सप्टेंबरमध्ये ११० टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेलेजवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाºया काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार

भीमानगर : उजनी धरणाची गेल्या वर्षाच्या तुलनेत कमालीची पाणीपातळी घटली आहे. बुधवारी उजनीची एकूण पाणीपातळी ४९०.११० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा मायनस १६२८.८४ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस १७३.९७ दलघमी आहे. उजनी धरणाची टक्केवारी मायनस ११.४७ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या दिवशी धरणात प्लस ५५.८५ टक्के पाणीसाठा होता. 

गेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लक होता. परंतु चालू वर्षी सप्टेंबरमध्ये ११० टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेले. म्हणजेच पाण्याचा भरपूर अपव्यय झाला आहे. याचा परिणाम येणाºया एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत जाणवणार आहे. अशात उष्णता भरपूर असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढणार आहे.

जवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाºया काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार आहे. त्यातच सोलापूर पाणीपुरवठा योजना, एनटीपीसी व बारामती एमआयडीसी या सगळ्या योजनांबरोबरच अनेक उपसा सिंचन योजनांना पाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी उपसा बेसुमार सुरू आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील शेती उत्पादनावर होणार असून, वीज कपात अशा संकटाला शेतकºयांना सामोरे जावे लागणार आहे. यातून लाखो रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागणार आहे.

नदीला सात हजार शंभर क्युसेकने पाणी सोडले आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला असून, पुणे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकºयांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी आता करू लागला आहे. पुणे जिल्ह्याला वेगळा न्याय व सोलापूर जिल्ह्याला वेगळा न्याय का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

रोज एक टक्का पाणी घटतेय !- उजनीतून भीमा नदीला ७,१०० क्युसेक तर कालव्याला २,९५० क्युसेक, बोगदा ५२० क्युसेक असे १०,५२० क्युसेक पाणी सोडल्याने रोज एक टक्का पाणी कमी होत आहे. सोलापूर, पंढरपूर अशा मोठ्या शहरांना जल संकटाचा सामना करावा लागणार असून, येणाºया काळात शेतीबरोबरच शहरांनासुद्धा पाण्याचे संकट बसणार आहे. उद्योगांवरसुद्धा याचा परिणाम दिसून येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाई