शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

उजनी धरणातील पाण्यात दररोज एक टक्का होतेय घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:29 IST

गत मार्चमध्ये प्लस ५५ टक्के असलेल्या उजनीत आता वजा ११ टक्के पाणी 

ठळक मुद्देगेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लकचालू वर्षी सप्टेंबरमध्ये ११० टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेलेजवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाºया काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार

भीमानगर : उजनी धरणाची गेल्या वर्षाच्या तुलनेत कमालीची पाणीपातळी घटली आहे. बुधवारी उजनीची एकूण पाणीपातळी ४९०.११० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा मायनस १६२८.८४ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस १७३.९७ दलघमी आहे. उजनी धरणाची टक्केवारी मायनस ११.४७ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या दिवशी धरणात प्लस ५५.८५ टक्के पाणीसाठा होता. 

गेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लक होता. परंतु चालू वर्षी सप्टेंबरमध्ये ११० टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेले. म्हणजेच पाण्याचा भरपूर अपव्यय झाला आहे. याचा परिणाम येणाºया एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत जाणवणार आहे. अशात उष्णता भरपूर असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढणार आहे.

जवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाºया काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार आहे. त्यातच सोलापूर पाणीपुरवठा योजना, एनटीपीसी व बारामती एमआयडीसी या सगळ्या योजनांबरोबरच अनेक उपसा सिंचन योजनांना पाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी उपसा बेसुमार सुरू आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील शेती उत्पादनावर होणार असून, वीज कपात अशा संकटाला शेतकºयांना सामोरे जावे लागणार आहे. यातून लाखो रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागणार आहे.

नदीला सात हजार शंभर क्युसेकने पाणी सोडले आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला असून, पुणे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकºयांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी आता करू लागला आहे. पुणे जिल्ह्याला वेगळा न्याय व सोलापूर जिल्ह्याला वेगळा न्याय का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

रोज एक टक्का पाणी घटतेय !- उजनीतून भीमा नदीला ७,१०० क्युसेक तर कालव्याला २,९५० क्युसेक, बोगदा ५२० क्युसेक असे १०,५२० क्युसेक पाणी सोडल्याने रोज एक टक्का पाणी कमी होत आहे. सोलापूर, पंढरपूर अशा मोठ्या शहरांना जल संकटाचा सामना करावा लागणार असून, येणाºया काळात शेतीबरोबरच शहरांनासुद्धा पाण्याचे संकट बसणार आहे. उद्योगांवरसुद्धा याचा परिणाम दिसून येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाई